शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावू नका: आमदार मायकल लोबो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2024 07:34 IST

नव्या कायद्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सध्या सोशल मीडियावरून धर्माबद्दल पोस्ट करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. चुकीचा संदेश समाजात जाऊ लागला आहे. लोकांनी अशा प्रकारांना बळी न पडता राज्यातील धार्मिक सलोखा जपावा, असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.

धार्मिक भावना दुखवण्यासंबंधी राज्यात हल्ली घडलेल्या घटनांवर बोलताना आमदार लोबो म्हणाले, स्वघोषित नेते, काही एनजीओंकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ लागला आहे. या मीडियाचा वापर करून आपण प्रसिद्ध व्हावे असे वाटणारे लोक याचा गैरवापर करू लागले आहेत. त्यातून लोकांच्या भावना दुखवू लागल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून नये. खास करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नये. चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घेत सोशल मीडिया वापरावर लोकांनी नियंत्रण ठेवावे, असे लोबो यांनी म्हटले आहे.

गोव्यातील लोक धार्मिक सलोखा राखून शांततेने राहतात. मात्र, बाहेरील काही विघ्नसंतोषी लोक येथे येऊन स्वतःला गोमंतकीय समजून धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी सर्वांनी एकमताने एकत्रित राहणे गरजेचे आहे. 

लोकांना सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करायला हवी. त्याकरिता नवा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. विधानसभेतही आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही आमदार लोबो यांनी शेवटी सांगितले.

समाजात चांगला संदेश जाईल, सलोखा टिकून राहील अशा पोस्टसाठी सोशल मीडियाचा वापर करावा. चुकीची माहिती देण्याबरोबरच, गैरवापर करण्यापेक्षा चांगल्या समाज हिताच्या गोष्टी प्रशासनाच्या नजरेला आणून देण्याच्या प्रयत्न करावा. यात खराब झालेले रस्ते, खंडित होणारा पुरवठासारख्या समाज हिताच्या गोष्टींवर भर द्यावा. स्वतःला चुकीच्या बाबींपासून दूर ठेवत चुकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचे टाळण्याची गरज आहे. 

टॅग्स :goaगोवाSocial Mediaसोशल मीडिया