शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:23 IST

राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दिवाळी हा रोषणाईचा, लखलखत्या दिव्यांनी वातावरणातल्या अंधःकाराचं साम्राज्य दूर सारण्याचा, आयुष्य तेजोमय, प्रकाशमय करण्याचा सण. राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले.

अभ्यंग स्नान, दारात घातलेल्या रंगबिरंगी रांगोळ्या, दरावर झेंडूच्या फुलांच्या, माळांचे तोरण लावून दिव्यांच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज, लक्ष्मीपूजन, मंगळवारी दिवाळी पाडवा तर बुधवारी भाऊबीज साजरी होणार असून त्यासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी पणजीत राजधानीत मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. मिठाई, दिवे, आकाशकंदील तसेच अन्य विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. शहरातील मुख्य मार्केटसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. शहरात पणत्या, आकाशकंदील, फटाके यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे मार्केटमध्ये वाहतूककोंडी झाली.

दिवसभर लोकांची खरेदीसाठी गर्दी होती. अक्षरश: वाहने पार्क करण्यासाठी जागाही उपलब्ध नव्हती. मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. वाढत्या गर्दीमुळे लोकांना लांब अंतरावर चारचाकी गाड्या पार्क करून बाजारात यावे लागले.

नरकासुर पाहण्यासाठीही गर्दी

दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी मोठमोठे नरकासुर करण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. राज्यभरातील लोकांना नरकासुराच्या अकराळविकराळ प्रतिमा आकर्षण ठरल्या. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी गर्दीवर नियंत्रणठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. शहरातील पाटो, मळा या भागात मोठमोठे नरकासुर केले जातात. मळा परिसरात नरकासुर पाहण्यास मोठी गर्दी झाली. रात्रभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दिवाळी हा सण आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो जात, पात, धर्म यांचा विचार न करता मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला जातो. या सुंदर सणानिमित्त मी सर्व लोकांना विनंती करतो की, समाजातून वाईट गोष्टींचे उच्चाटन करा आणि देशात सामाजिक सलोखा, सद्भावना वृद्धिगत करा. -पी. एस. श्रीधनर पिल्लई, राज्यपाल

दिवाळीचा प्रकाश एकात्मतेच्या भावनेने लोकांचे मन आणि हृदय उजळून टाकू शकेल. हा सण लोकांना वाईटावर विजय मिळवून शांतता आणि जातीय सलोखा नांदेल, असा समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो. त्या दिवशीची रोषणाई आपल्याला भगवान रामाच्या उच्च आदर्शाची आठवण करून देते, जे या दिवशी अयोध्येला परतले. राज्यात 'वोकल फॉर लोकल'ला महत्त्व देऊया. -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो . आपल्या सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आनंदासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो . दिवाळीतील प्रत्येक सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येवो. - श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री 

टॅग्स :goaगोवाDiwaliदिवाळी 2023