शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

म्हादईप्रश्नी सरकारच्या भूमिकेमुळे गोवा अस्वस्थ, कर्नाटक खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 12:33 PM

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकमधील भाजपाची राजकीय लॉबी यांच्या दबावाला बळी पडून गोव्याच्या हिताचा गोवा सरकार बळी द्यायला निघाले आहे. अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरून अनेक तरूण करू लागले आहेत. शिवाय गोव्यातील पाणी प्रश्नाचे अभ्यासक तथा गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तातडीने पत्र लिहून पर्रीकर सरकार उचलत असलेल्या पावलांना आक्षेप घेतला आहे. त्यांनी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कर्नाटकचा यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास कर्नाटकवर आमचा विश्वास नाही, असे पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. पिण्याचे पाणी कुणालाही देण्यास आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही पण कर्नाटकवर सरकारने विश्वास ठेवू नये, असे मंत्री सरदेसाई यांनी म्हटले आहे. पिण्याचे पाणी दिल्यानंतर जर त्यापुढेही अन्य कोणत्या कारणास्तव गोवा सरकारने कर्नाटकला म्हादई नदीतील पाणी दिले तर मग आमच्या पक्षाचे  मंत्री जलसंसाधन हे खाते स्वत:कडे ठेवणार नाहीत, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे. सरदेसाई यांनी पिण्याचे पाणी कर्नाटकला देण्यास थेट विरोध मात्र केलेला नाही.

डॉ. नंदकुमार कामत यांनी पर्रीकर यांना पूर्णपणं सावध करणारे पत्र लिहिले आहे. गोवा म्हादई बचाव अभियानानेही पर्रीकर यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. म्हादई नदीमध्ये अगोदरच पाण्याचा तुटवडा आहे. गोव्यातील भावी पिढीला पाण्याची समस्या ख-या अर्थाने भेडसावेल, असे डॉ. कामत यांनी नमूद करून तुम्ही कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याविषयी चर्चा करण्याचे पत्र देऊ नका, अशी मागणी कामत यांनी र्पीकर सरकारकडे केली आहे. मात्र मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोवा मंत्रिमंडळाला, गोव्यातील विधानसभेला आणि विरोधी पक्षांनाही काहीच कल्पना न देता कर्नाटकचे नेते येडीयुरप्पा यांना पत्र देऊनही टाकले.

पत्र दिल्यानंतर मग ते पत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले आहे. एक-दोन मंत्री वगळता पर्रीकर सरकारमधील अनेक मंत्री आणि भाजपचे बहुतेक आमदार यांना सरकारच्या या भूमिकेमुळे धक्का बसला आहे. मात्र भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानेच कर्नाटकला पिण्याचे पाणी गोव्याकडून दिले जावे अशी भूमिका घेतलेली असल्याने व कर्नाटकमध्ये भाजपला याचा फायदा होणार असल्याने गोव्यातील भाजपचे आमदार आणि काही मंत्री सध्या शांत राहिले आहेत. ते मूका मार सहन करत असल्याची प्रतिक्रिया गोव्याच्या सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.

कर्नाटकवर विश्वास ठेवू नका, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कर्नाटक म्हादईप्रश्नी डाव खेळू शकते असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे पिण्यासाठीदेखील म्हादई नदीतील पाणी गोव्याने कर्नाटकला देणो कधीच मान्य केले नव्हते. ते काम आता पर्रीकर करू लागल्याने सर्वानाच धक्का बसल्यासारखी स्थिती आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर