शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मराठी राजभाषेसाठी निर्धार!; राजकीय बळ वाढविण्यासाठी संघटनांना एकत्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:39 IST

पणजीतील सभेस गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आजपर्यंत मराठी भाषेवर अन्यायच झाला आहे. मराठीला जर राजभाषा करायची असेल तर आता अन्यायाविरोधात पेटून उठण्याची गरज आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत आम्हाला एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यासाठी मराठी संघटनांची बांधणी करणे आवश्यक आहे. सर्व मतदारसंघात मराठी वोट बँक तयार केली पाहिजे, ज्यामुळे आम्हाला राजकीय बळ मिळू शकेल, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे सोमवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात मराठीप्रेमी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर प्रदीप घाडी आमोणकर, गुरुदास सावळ, गो. रा. ढवळीकर, गजानन मांद्रेकर, प्रकाश भगत, अनुजा जोशी, प्रा. पौर्णिमा केरकर, नेहा उपाध्ये, नितीन फळदेसाई, सागर जावडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात १९८५ ते आज २०२५ पर्यंत म्हणजेच ४० वर्षांपासून मराठीचा संघर्ष सुरू आहे. यादरम्यान मराठीच्या आंदोलनाची जबाबदारी अनेकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांनी ही ज्योत विझवू दिली नाही. आता याचे वणव्यात रूपांतर करणे आमच्या हाती आहे. त्यामुळे हा निर्णायक लढा आम्ही लढू आणि विजयीच होऊ, असेही वेलिंगकर म्हणाले.

आम्ही कोंकणीविरोधात नाही, परंतु मराठीवरील अन्याय देखील आम्हाला मान्य नाही. कोंकणीसोबत मराठीला देखील राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही हा लढा देत राहू. मराठीशी घृणास्पद राजकारण झाले आहे. सत्तेच्या राजकारणाने समाजाला देखील लाचार केले आहे. सरकारी नोकरी, पुरस्कार, मोफत सुविधा, मानसन्मान या सवलतींच्या खैरातीला सुशिक्षित लोकही बळी पडल्याने आता समाज सरकारला घाबरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे, यावर मात करून हा लढा दिला पाहिजे, असेही वेलिंगकर यांनी पुढे सांगितले.

मराठीसाठी संघर्ष करावा लागत आहे हेच मुळात दुर्दैवी आहे. गोवामुक्तीच्या अगोदरपासून राज्यात मराठी भाषा आहे, तेव्हा कोंकणीचा प्रभावच नव्हता. ख्रिस्ती देखील त्यावेळी मराठीच बोलायचे. शैणगोंयबाब त्यावेळी मुंबईत कोंकणीसाठी काम करायचे. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर कोंकणी आणि मराठी असा भाषावाद सुरू झाला. काहींना वाटले की गोवा महाराष्ट्रात विलीन होईल. या भीतीने नेहरूंना सांगून येथील भाषा कोंकणी करून घेतली, असे गो. रा ढवळीकर यांनी सांगितले.

अशी असेल रणनीती

२०२७ विधानसभा लक्षात घेत वाटचाल करणे. येत्या तीन महिन्यांत मराठी संघटनांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न. तालुकास्तरावर बैठका आणि जागृती करणे. युवकांना, महिलांना या चळवळीत मुख्य प्रवाहात आणणे. मराठी वोट बँक तयार करून राजकीयदृष्ट्या संख्याबळ वाढविण्यावर भर. मराठी राजभाषा करण्यासाठी रोमी कोंकणीला देखील राजभाषेचा दर्जा द्या, असे काही तरी कारस्थान सुरू आहे, ते बंद करणार.

१९८५ पासून अन्याय...

मुक्तीनंतर सुमारे ८० हजार लोक मराठीत शिकले, असे असूनही १९८६ मध्ये कोंकणी भाषेला राजभाषा जाहीर करण्याचे विधेयक आले आणि मंजूरही झाले. यावेळी देखील १८० पैकी १२० ग्रामपंचायतींनी मराठी राजभाषा व्हावी यासाठी ठराव घेतला. पण तरीही याकडे दुर्लक्ष झाले. त्यावेळी जे झाले ते झाले, पण आताचे डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार जे करत आहे ते सहनशीलतेच्या पलीकडचे आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीत कोंकणीची सक्ती केल्यामुळे आम्ही लढा उभारत आहोत, असेही गो. रा. ढवळीकर म्हणाले.

'त्या' दोन गंभीर चुकांचा परिणाम आम्ही भोगतोय : ढवळीकर

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सर्वांचेच हिरो आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमाविले. या गोष्टी आमच्यासाठी अभिमानास्पद आहेत. परंतु मराठीच्या बाबतीत पर्रीकर यांनी ज्या दोन गंभीर चुका केल्या त्याचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत. सत्तेवर येताच पर्रीकरांनी इंग्रजीचे अनुदान सुरूच ठेवले, आणि दुसरे म्हणजे मराठीला राजभाषेचा दर्जा दिला नाही, असेही ढवळीकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण