शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्लाप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:23 IST

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली.

पणजी : काँग्रेसच्या कार्यालयावर व महिला कार्यकर्त्यांवर भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला हा पूर्वनियोजित आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भाग घेतला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे केला. तसेच तेंडुलकर आणि इतर हल्लेखोरांविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो, दिगंबर कामत, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, प्रतिमा कुतिन्हो यांच्यासोबत चोडणकर व कवळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना कधीच भाजपच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन भाजपवाल्यांना मारहाण केली नव्हती. भाजपने मात्र राफेल प्रकरणी काँग्रेस हाऊसवर मोर्चा आणला व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर बुट व बाटल्या फेकून मारल्या असे कवळेकर यांनी सांगितले. आम्ही संयुक्त बैठकीत याचा निषेध केला आहे. तसेच ज्या भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी ही गुंडगिरी केली, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलिस प्रमुखांसमोर ठेवत असल्याचे कवळेकर म्हणाले. गोव्यात भाजप सत्तेत आहे पण भाजपच कायदा हाती घेत आहे. गृह खात्याने अशावेळी डोळ्य़ावर बांधलेली पट्टी काढावी व राज्यात काय चाललेय ते पहावे. भाजपने यापूर्वी मांडवी पूल रोखला होता व लोकांचा रोष ओढवून घेतला होता. काही वर्षापूर्वी भाजपने म्हापशातील एका हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केली होती. आता काँग्रेस हाऊसमध्ये भाजप कार्यकर्ते घुसले व रस्ताही अडवून लोकांना त्रास केला. त्यांनी लोकांची माफी मागावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली.

काँग्रेस कार्यकर्ते फूल, समोसे घेऊन उभे होतेचोडणकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष कायम शांततेच्या व लोकशाही मार्गाने जातो. भाजप मात्र नथुराम गोडसेच्या मार्गाने जातो. प्रतिमा कुतिन्हो, वरद म्हादरेळकर, विजय भिके व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो. कारण आमचे कार्यकर्ते केवळ तेरा-चौदा होते. ते काँग्रेस हाऊससमोर भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी फुले, सामोसा वगैरे घेऊन उभे होते. तिथे तेंडुलकर व अन्य दोनशे भाजप पदाधिकारी आले व त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मात्र काँग्रेस कार्यकर्ते पळून गेले नाही. त्यांनी शांततेच्याच मार्गाने त्यांचा प्रतिकार केला. प्रतिमाच्या दिशेने जो बूट भाजपने फेकून मारला. तो बुट प्रतिमाने पुन्हा भाजप कार्यकर्त्यांवर मारला नाही. दीड तास भाजपने वाहतुकीची कोंडी केली. सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. अशा अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जावी.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस हाऊसवर केलेला हल्ला हा लोकशाहीतील काळा दिवस आहे. तो लोकशाहीवर हल्ला आहे. राफेल प्रकरणी जर बाजू मांडायची असेल तर ती संसदेत मांडा, असे दिगंबर कामत, रवी नाईक म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा