शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पराभूत सिझर अन् त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 10:45 PM

तुमच्या राजकीय धारणा कोणत्याही असोत, एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. आपण आपल्या जीवनातले सर्वाधिक किळसवाणे नाट्य तूर्तास अनुभवतो आहोत.

- डॉ. ऑस्कर रिबेलोतुमच्या राजकीय धारणा कोणत्याही असोत, एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. आपण आपल्या जीवनातले सर्वाधिक किळसवाणे नाट्य तूर्तास अनुभवतो आहोत. एक व्याधीग्रस्त राजा, संविधानाच्या तोंडात मारणारी प्रशासकीय व्यवस्था, अस्तनीतल्या निखा-यांची जळजळीत सत्ताकांक्षा, वास्तवापासून विलग असलेली आणि समोर आलेला राजकीय चिखल कुठल्यातरी अंधारात ढकलत स्वच्छतेचा डिंडीम मिरवणारी महाराणी, ही या नाट्यातली पात्रे. कुणाला वाटेल हे विनोदी प्रहसन आहे; पण नाही, मित्रांनो, तुम्ही-आम्ही विनोदाचा विषय बनलो आहोत.

आणि उर्वरित जगाने आपल्याकडे पाहात हसणेही सोडून दिलेय. गोव्याला त्यांनी भंगारातच काढलेय. या नरकवासाकडल्या प्रवासासाठी मी मात्र केवळ मनोहर पर्रीकर यांना जबाबदार धरेन. कॅन्सर निर्दय हत्यारा असतो. त्याच्या भक्ष्यस्थानी कधी कोण पडेल, हे सांगणे कठीण. ज्याला तो जडतो त्याच्या शारीरिक आणि मानसिक वेदना तसेच त्याच्या निकटवर्तीयांना होणा-या यातना अवर्णनीय असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर मनोहर पर्रीकरांना उद्देशून टाकलेले कुत्सित आणि तिरस्कारयुक्त पोस्ट केवळ त्यांनाच लक्ष्य करत नाहीत तर प्रत्येक कॅन्सरग्रस्ताला नामोहरम करतात. सत्ताकांक्षा राजकारण्यांचे अध:पतन घडवत असते, हे खरे असले तरी आपणही माणुसकी विसरण्याची काहीच आवश्यकता नाही.

एवढे सांगितल्यानंतर आता हेही सांगायला हवे की मनोहर पर्रीकर आणि त्यांच्याभोवती वावरणा-यांनी लोकशाही तत्त्वांना पायदळी तुडवणा-या काही अनाकलनीय कृती केल्या आहेत. असाध्य आजाराचे निदान होऊनही पर्रीकर शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कष्टाची कामे करताहेत. सत्तेपासून दूर होण्याचे त्यांना सुचलेलेही नाही. याचाच अर्थ वटवृक्षाखालील रोपांची वाढ जशी खुंटते तद्वतच त्यांच्या पक्षात त्यांची जागा घेणारी दुसरी फळीच तयार झालेली नाही. अशी परिस्थिती उद्भवताना वटवृक्षाचे माहात्म्य नव्हे तर त्याच्या मर्यादाच दिसून येतात. गोव्याच्या भविष्याविषयीची तळमळ आणि साधनसुविधांच्या विकासाविषयी आस्था असूनदेखील पर्रीकर आजवर एखादा शाश्वत कायदा - मग तो पर्यावरणविषयक असो, शिक्षणविषयक असो किंवा स्वयंपोषक आर्थिक विकासाचा असो- करण्यास कारणीभूत ठरलेले नाहीत. जे घडलेय ते परिस्थितीवश घडलेय, राजकीय निकड म्हणून घडलेय. पर्रीकरांच्या कारकिर्दीत भाजपचे काँग्रेसीकरण झाले.केडरचा झालेला तेजोभंग पक्षाला महागात पडू शकतो. भविष्यात सुभाष वेलिंगकरांच्या मागून भाजप आणि मगोपचे कार्यकर्ते गेल्यास आश्चर्य वाटू नये. पत्त्यांचा बंगला उभा करण्यास वर्षे जातात आणि एखाद्याच घोडचुकीने तो क्षणार्धात जमीनदोस्त होत असतो.जर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पर्रीकरांनी आपल्या आरोग्याविषयीचे सत्य स्वीकारून जनतेला टेलीव्हिजनवरून संबोधन करीत त्याची कल्पना दिली असती आणि राज्याच्या भविष्याविषयीच्या आपल्या योजना विषद केल्या असत्या तर लोकशाहीचे अपहरण करत सरकार स्थापण्याच्या त्यांच्या कृतीलाही गोमंतकीयांनी माफ केले असते. तेवढा प्रांजळपणा पर्रीकरांनी दाखविला नाही. सगळ्यात मोठा प्रमाद कोणता असेल तर विरोधी पक्ष नेता असतानाच्या आपल्या हितचिंतकांना विसरण्याची त्यांची कृती. यात सुभाष वेलिंगकर आणि क्लॉड अल्वारीस यांच्यासह अन्य असंख्यांचा समावेश आहे. असे करताना त्यांनी आपल्या राजकीय शत्रूंना मात्र कवेत घेतले. त्यांनीही यांना सत्तेच्या लालसेने मिठी मारली आणि यांनीही ती मगरमिठी चालवून घेतली. आता जो नाटय़ाचा प्रवेश शिल्लक आहे, त्यात दिसतोय एक नैतिकदृष्टय़ा पराभूत झालेला सिझर आणि त्याच्या भोवती घोंगावणारे अनेक ब्रुट्स.(लेखक गोव्यातील सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत.)

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर