शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 5:20 PM

वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते.

- राजू नायक

गोवा- वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते. समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना जरी समुद्रपातळी वाढ ‘लुबान’ व ‘तितली’ या दोन चक्रीवादळांमुळे झाली आहे, असे नमूद केले असले तरी अंतिमत: तो वातावरण बदलाचाच परिणाम असल्याचे मान्य केले.

वातावरण बदलामुळे जगभर नैसर्गिक प्रतिक्रियांचे अतितीव्र परिणाम जाणवत असून तापमानाच्या वाढीमुळे आर्क्टिक व अंटार्टिकाचे हिमखंड वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रपातळी वाढ एका बाजूला होत असतानाच दुस-या बाजूला तीव्र पाऊस, वादळे, भूकंप व हवामानातील बदलामुळे पिकांवर परिणाम होऊन दुष्काळी परिस्थितीत वाढ होत आहे.

गोव्यात किनारपट्टी ही समुद्रपातळी वाढीमुळे धोक्यात येऊ शकते. तरीही किना-यावर नियम तोडून अनेक बांधकामे, हॉटेल उभी झाली आहेत. शिवाय खानपानगृहांची संख्या वाढत आहे. ही शॅक्स जरी तात्पुरती असली तरी त्यांचे बांधकाम पक्के असते व ती किना-यांच्या नैसर्गिक परिस्थितीत फेरफार करतात, शिवाय मानवी व्यवहार व कचरा यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. यावर्षी ऑलिव्ह रिडले कासवांनी या किना-यांकडे पाठ फिरविली आहे. गालजीबाग व मोरजी किना-यांवर यापूर्वी कासव येत असत.

तज्ज्ञांच्या मते, समुद्रपातळी वाढ झाली किंवा आताच्या सारखे समुद्राचे आक्रमण वाढल्याच्या घटना वारंवार घडल्या तर गोवेकरांच्या आवडीचे मासळीचे उत्पादन घटेल तसेच ‘शॅक्स’ या पर्यटकांच्या आवडीच्या विरंगुळ्याच्या ठिकाणावर संक्रांत येईल. मासळीचे उत्पादन २०१७मध्ये ११७.७  टन झाले असून, गोव्याहून ती निर्यात केली जातेय. त्याशिवाय शॅक्स व्यवसायातही करोडो रुपयांची गुंतवणूक होते. किनारी पर्यटनाच्या ओढीनेच गोव्यात पर्यटक येत असतात.गोव्यात हल्लीच्या काळात पर्यटनाला विलक्षण बरकत आली असून १५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात हंगामात ८० लाख पर्यटक येत असतात, त्यात सहा लाख विदेशी पर्यटक असतात. यंदा तर चार्टर विमानांच्या संख्येत वाढ होऊन ती हजारावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ९०० चार्टर विमाने उतरली होती. या पर्यटकांचा भर किना-यांवर असतो. त्यामुळे किना-यांवर पर्यटकांची गर्दी वाढलीय, शिवाय तेथे ब-याच बेकायदेशीर बांधकामे व अनिष्ट गोष्टींचा वेढा पडला आहे. या गोष्टी प्रदूषणात भर घालतात व त्यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. त्यातच तापमान वाढीचा धोका व समुद्रात नित्यनेमाने येणारी वादळे यांनी किना-यांचा नाश होऊन राज्यावर आर्थिक संकट येण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. डॉ. बबन इंगोले म्हणाले की, मत्स्य उत्पादनावर नक्कीच परिणाम होऊन रोजगार व आर्थिक परिस्थितीवर तीव्र परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :goaगोवा