शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 10:45 IST

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जलस्रोत खात्याने शेतीसाठी कालव्यांद्वारे दिले जाणारे पाणी तीन दिवसांपूर्वी १५ मेपासून बंद केले आहे. तरीही धरणांमधीलपाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

धरणे आटली आहेतच, शिवाय काही नद्यांमधील पाणीही कमी झाले आहे. रगाडा नदी कोरडी तर पडली आहे. अंजुणे धरणात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. आमठणे धरणात ३२ टक्के, साळावली धरणात ३० टक्के, पंचवाडी धरणात २१ टक्के, तिळारी धरणात ३३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागांमध्ये आहे. लोकांनी बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा खात्यावर घागर मोर्चेही काढले आहेत.

राज्यातील रगाडा तसेच इतर नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत याबाबत याकडे लक्ष वेधले असता जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले की, पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या एप्रिल मेमध्ये कोरड्या पडतात. रगाडा तसेच वाळवंटी, डिचोली नदीचीही हीच स्थिती आहे. खांडेपार, म्हादई नदीत पाणी असते. कच्च्या पाण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सतर्कतेचे निर्देश

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस यांनी काल सर्व खात्यांची बैठक घेतली. पावसाळ्यात दरडी कोसळणे, पूर किंवा धोकादायक स्थितीत असलेले जीर्ण वृक्ष कोसळण्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. वाळवंटी नदीला थोड्याशाही पावसात पूर येतो व साखळी, डिचोली बाजारपेठा पाण्याखाली जातात. पणजीत मांडवी नदीला भरती असली आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास मळा भागात घरांमध्ये पाणी शिरते. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असतात त्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी घाटकोपर-मुंबई येथे वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे होर्डिंग कोसळून निष्पाप बळी गेले, या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्याविषयी सतर्कता बाळगण्याविषयी चर्चा झाली.

पालिका, पंचायतींना निधी

महसूल खात्याने परिपत्रक काढून पावसाळापूर्व कामांमध्ये झाडाच्या फांद्या तोडणे किवा झाड कापणे यासाठी महापालिकेला १ लाख रुपये, 'व' श्रेणी नगर पालिकांना ५० हजार रुपये व 'क' श्रेणी नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना २५ हजार रुपये निधी दिला जाईल, असे म्हटले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून हे पैसे दिले जातील.

पाणीसाठा पुरेसा : प्रमोद बदामी

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांचे मात्र असे म्हणणे आहे की, जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये आहे. अंजुणेत केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे नजरेस आणले असता ते म्हणाले की, या धरणाची क्षमता ४४०० हेक्टर मीटर आहे. २० टक्के जरी शिल्लक राहिले असे गृहीत धरल्यास ८०० हून अधिक हेक्टर मीटर पाणी आहे. आम्ही या धरणातून दररोज दीड ते दोन हेक्टर मीटरच पाणी घेतो. साळावलीतही पुरेसा पाणीसाठा आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात