शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 10:45 IST

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जलस्रोत खात्याने शेतीसाठी कालव्यांद्वारे दिले जाणारे पाणी तीन दिवसांपूर्वी १५ मेपासून बंद केले आहे. तरीही धरणांमधीलपाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

धरणे आटली आहेतच, शिवाय काही नद्यांमधील पाणीही कमी झाले आहे. रगाडा नदी कोरडी तर पडली आहे. अंजुणे धरणात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. आमठणे धरणात ३२ टक्के, साळावली धरणात ३० टक्के, पंचवाडी धरणात २१ टक्के, तिळारी धरणात ३३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागांमध्ये आहे. लोकांनी बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा खात्यावर घागर मोर्चेही काढले आहेत.

राज्यातील रगाडा तसेच इतर नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत याबाबत याकडे लक्ष वेधले असता जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले की, पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या एप्रिल मेमध्ये कोरड्या पडतात. रगाडा तसेच वाळवंटी, डिचोली नदीचीही हीच स्थिती आहे. खांडेपार, म्हादई नदीत पाणी असते. कच्च्या पाण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सतर्कतेचे निर्देश

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस यांनी काल सर्व खात्यांची बैठक घेतली. पावसाळ्यात दरडी कोसळणे, पूर किंवा धोकादायक स्थितीत असलेले जीर्ण वृक्ष कोसळण्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. वाळवंटी नदीला थोड्याशाही पावसात पूर येतो व साखळी, डिचोली बाजारपेठा पाण्याखाली जातात. पणजीत मांडवी नदीला भरती असली आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास मळा भागात घरांमध्ये पाणी शिरते. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असतात त्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी घाटकोपर-मुंबई येथे वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे होर्डिंग कोसळून निष्पाप बळी गेले, या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्याविषयी सतर्कता बाळगण्याविषयी चर्चा झाली.

पालिका, पंचायतींना निधी

महसूल खात्याने परिपत्रक काढून पावसाळापूर्व कामांमध्ये झाडाच्या फांद्या तोडणे किवा झाड कापणे यासाठी महापालिकेला १ लाख रुपये, 'व' श्रेणी नगर पालिकांना ५० हजार रुपये व 'क' श्रेणी नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना २५ हजार रुपये निधी दिला जाईल, असे म्हटले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून हे पैसे दिले जातील.

पाणीसाठा पुरेसा : प्रमोद बदामी

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांचे मात्र असे म्हणणे आहे की, जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये आहे. अंजुणेत केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे नजरेस आणले असता ते म्हणाले की, या धरणाची क्षमता ४४०० हेक्टर मीटर आहे. २० टक्के जरी शिल्लक राहिले असे गृहीत धरल्यास ८०० हून अधिक हेक्टर मीटर पाणी आहे. आम्ही या धरणातून दररोज दीड ते दोन हेक्टर मीटरच पाणी घेतो. साळावलीतही पुरेसा पाणीसाठा आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात