शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 10:45 IST

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जलस्रोत खात्याने शेतीसाठी कालव्यांद्वारे दिले जाणारे पाणी तीन दिवसांपूर्वी १५ मेपासून बंद केले आहे. तरीही धरणांमधीलपाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

धरणे आटली आहेतच, शिवाय काही नद्यांमधील पाणीही कमी झाले आहे. रगाडा नदी कोरडी तर पडली आहे. अंजुणे धरणात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. आमठणे धरणात ३२ टक्के, साळावली धरणात ३० टक्के, पंचवाडी धरणात २१ टक्के, तिळारी धरणात ३३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागांमध्ये आहे. लोकांनी बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा खात्यावर घागर मोर्चेही काढले आहेत.

राज्यातील रगाडा तसेच इतर नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत याबाबत याकडे लक्ष वेधले असता जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले की, पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या एप्रिल मेमध्ये कोरड्या पडतात. रगाडा तसेच वाळवंटी, डिचोली नदीचीही हीच स्थिती आहे. खांडेपार, म्हादई नदीत पाणी असते. कच्च्या पाण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सतर्कतेचे निर्देश

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस यांनी काल सर्व खात्यांची बैठक घेतली. पावसाळ्यात दरडी कोसळणे, पूर किंवा धोकादायक स्थितीत असलेले जीर्ण वृक्ष कोसळण्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. वाळवंटी नदीला थोड्याशाही पावसात पूर येतो व साखळी, डिचोली बाजारपेठा पाण्याखाली जातात. पणजीत मांडवी नदीला भरती असली आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास मळा भागात घरांमध्ये पाणी शिरते. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असतात त्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी घाटकोपर-मुंबई येथे वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे होर्डिंग कोसळून निष्पाप बळी गेले, या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्याविषयी सतर्कता बाळगण्याविषयी चर्चा झाली.

पालिका, पंचायतींना निधी

महसूल खात्याने परिपत्रक काढून पावसाळापूर्व कामांमध्ये झाडाच्या फांद्या तोडणे किवा झाड कापणे यासाठी महापालिकेला १ लाख रुपये, 'व' श्रेणी नगर पालिकांना ५० हजार रुपये व 'क' श्रेणी नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींना २५ हजार रुपये निधी दिला जाईल, असे म्हटले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून हे पैसे दिले जातील.

पाणीसाठा पुरेसा : प्रमोद बदामी

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांचे मात्र असे म्हणणे आहे की, जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये आहे. अंजुणेत केवळ १८ टक्के पाणी शिल्लक राहिल्याचे नजरेस आणले असता ते म्हणाले की, या धरणाची क्षमता ४४०० हेक्टर मीटर आहे. २० टक्के जरी शिल्लक राहिले असे गृहीत धरल्यास ८०० हून अधिक हेक्टर मीटर पाणी आहे. आम्ही या धरणातून दररोज दीड ते दोन हेक्टर मीटरच पाणी घेतो. साळावलीतही पुरेसा पाणीसाठा आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात