शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

'खर्च कपातीसाठी मंत्रिमंडळाचा आकार कमी करा, तीनच मंत्री पुरे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 8:33 PM

मुख्यमंत्री कोरोनाविरोधी मदत कार्यासाठी देणग्याही मागत आहेत. त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाचा आकार कमी करावा व फक्त तीनच मंत्री ठेवावेत, अशी मागणी मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकार आर्थिक अडचणीतून जात असल्याचे प्रथमच मान्य केले आहे. ते खर्च कपातीची भाषा बोलतात व लोकांकडून सध्या कोरोनाविरोधी मदत कार्यासाठी देणग्याही मागत आहेत. त्यांनी प्रथम मंत्रिमंडळाचा आकार कमी करावा व फक्त तीनच मंत्री ठेवावेत, अशी मागणी मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

राज्यातील काही आमदारांना सरकारी सुरक्षा आहे. तीही मागे घेतली जावी व अनेक आमदारांकडे सरकारी महामंडळे आहेत. त्यांच्याकडून महामंडळे काढून घेऊन सचिव स्तरावरील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडे तो ताबा सोपवावा. कारण या सगळ्यावर राजकारणी सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी खर्च कपातीसाठीचे मोठे पाऊल म्हणून या सगळ्य़ा गोष्टी केल्या व केवळ तीनच मंत्री सरकारमध्ये ठेवले तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील व मगच लोक निधी देतील, असेही ढवळीकर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, त्यांच्यासाठी स्वतंत्र गाड्या, वेतन यावर बराच खर्च होतो, असे ढवळीकर म्हणाले.

आता कोरोनामुळे जी स्थिती आली आहे, तशीच स्थिती गोवा मुक्तीनंतर पहिली काही वर्षे गोव्यात होती. भाऊसाहेब बांदोडकरांना शून्यातून विश्व निर्माण केल्याप्रमाणो गोव्यात सगळे अस्तित्वात आणावे लागत होते व त्यावेळी ते फक्त तीनच मंत्री घेऊन काम करत होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे नव्या विकास कामांसाठी पैसा नाही. नवी कामे होऊ शकणार नाहीत. सरकारने काढलेल्या निविदा रद्द कराव्यात. राष्ट्रीय महामार्ग,पुल व अन्य पायाभूत साधनसुविधांची जी एक हजार कोटींची कामे सुरू आहेत, तीच तेवढी सरकारने सुरू ठेवावी. पंचायत, कला संस्कृती व अन्य काही खात्यांच्या मंत्र्याना आता काहीच काम असणार नाही, त्यामुळे मंत्र्यांची संख्या कमी करावी अशे ढवळीकर म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे हे ईडीसीचे चेअरमन आहेत. अन्य दोघे पदाधिकारी सरकारच्या दोन आयोगांची आयुक्तपदे घेऊन बसले आहेत, त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी बाजूला काढून सरकारी खर्च टाळावा व विश्वासाचे वातावरण अगोदर तयार करावे, असे ढवळीकर म्हणाले.

सात हजार कुटूंबांना धान्य 

आपण सरकारला तूर्त माझ्याकडील वेतन देणार नाही, कारण मंत्री, आमदार जर मोठ्या प्रमाणात सरकारी पैसा स्वत:साठी खर्च करणार असतील तर लोक कोरोना कामासाठी पैसे कसे काय देतील? मी मला मिळणारे वेतन मडकई मतदारसंघात लोकांसाठीच खर्च करीन. संकटकाळात नुकतेच सात हजार कुटूंबांर्पयत मी मोफत धान्य वाटले. त्याशिवाय झोपडपट्टीतील बाराशे कुटूंबांना धान्य वाटले, असे ढवळीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा