शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Goa : राज्य सरकारने तयार केलेल्या शिष्टाचार प्रक्रियेला विरोधी आमदारांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 15:03 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यात ‘कोविड १९’ चाचणीचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचा जो दावा करतात तो फसवा असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

ठळक मुद्देदिल्ली किंवा देशाच्या अन्य भागातून ‘कोरोना’च्या हॉटस्पॉटमधूनही येणा-या परप्रांतीयांना कोविड निगेटिव्ह अहवाल आणला की थेट प्रवेश हा कुठला न्याय? असा सवाल केला आहे.

पणजी : गोव्याबाहेरुन येणा-यांसाठी सरकारने तयार केलेली शिष्टाचार प्रक्रियेवर विरोधी आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विदेशातून येणारे खलाशी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाच पैसे भरुन सात दिवस संस्थात्मक अलगीकरण क्वारंटाइन सक्तीचे आणि दिल्ली किंवा देशाच्या अन्य भागातून ‘कोरोना’च्या हॉटस्पॉटमधूनही येणा-या परप्रांतीयांना कोविड निगेटिव्ह अहवाल आणला की थेट प्रवेश हा कुठला न्याय? असा सवाल केला आहे. 

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई तसेच पक्षाचे अन्य दोन आमदार जयेश साळगांवकर व विनोद पालयेंकर तसेच काँग्रेसी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी मुख्य सचिव परिमल राय यांना निवेदन सादर करुन शिष्टाचार प्रक्रियेत बदल करण्याची व गोव्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया निश्चित करण्याची मागणी केली. या निवेदनावर अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचीही सही आहे. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, विदेशात जहाजांवर अडकलेले खलाशी आज फार मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या नोक-या गेलेल्या आहेत, असे असतानाही आणि आधी तब्बल दोन महिने क्वारंटाइन राहिले असून गोव्यात आल्यावर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये शुल्क आकारुन सात दिवस सक्तीने संस्थात्मक अलगीकरणामध्ये क्वारंटाइन राहावे लागते. उलट देशातील अन्य भागातून येणा-यांना मात्र तीन पर्याय दिले गेलेले आहेत, हा निव्वळ पक्षपात आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यात ‘कोविड १९’ चाचणीचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचा जो दावा करतात तो फसवा असल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. सध्याचे प्रमाण पाहता एक हजार व्यक्तीमागे ८ एवढ्याच व्यक्तींची ‘कोविड १९’ चाचणी झालेली आहे, असे ते म्हणाले. ‘कोविड’ सर्वेक्षण हा निव्वळ लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार होता, अशी टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी लवकरच जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचे सूतोवाच केले आहे त्याचाही सरदेसाई यांनी समाचार घेतला. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे की निवडणुका? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स म्हणाले की, ‘ खलाशांना दोन-दोन महिने क्वारंटाइन राहूनही पुन: गोव्यात सक्तीचे ‘पेड क्वारंटाइन’ करायला लावणा-या सरकारने मंत्र्यांनी ४0 दिवस स्वत:च्या केबिनमध्ये क्वारंटाइन राहून दाखवावे. ते म्हणाले की, ‘कोरोनामुळे मध्य पूर्व राष्ट्रांमध्ये हजारो गोमंतकीय अडकलेले आहेत. त्यांना शोधून गोव्यात परत आणण्याचे काम सरकारने प्राधान्यक्रमे करावे.’  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा