शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

Coronavirus News: महाराष्ट्रासाठी वेगळी प्रक्रिया करण्याचा विचार गोवा सरकारकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:04 IST

ख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणा-या महाराष्ट्रातील प्रवाशांना यापुढे अधिक कडक व वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, असे विधान केले होते.

सदगुरू पाटीलपणजी : महाराष्ट्रातून जे प्रवासी गोव्यात येतात, केवळ त्यांच्यासाठीच वेगळी व जास्त कडक प्रक्रिया गोव्यात लागू करण्याचा विचार अखेर बुधवारी गोवा मंत्रिमंडळाने मागे घेतला. सर्वासाठीच वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठी नव्हे असे सरकारने बुधवारी स्पष्ट केले. गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 68 रुग्ण सापडले व त्यापैकी 21 रुग्ण उपचारानंतर ठीक झाले व त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज दिला गेला. मात्र गोव्यातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये 90 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणा-या महाराष्ट्रातील प्रवाशांना यापुढे अधिक कडक व वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, असे विधान केले होते.केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी आपले बोलणे सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यावेळी गोव्यातील कोरोनाविषयक स्थिती, सरकारची उपाययोजना, गोव्यात रोज येणा-या प्रवाशांची संख्या हे सगळे विचारात घेतले गेले. बरीच चर्चा झाली, सर्व मंत्र्यांची मते जाणून घेतली गेली आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया नको, सर्वच प्रवाशांसाठी वेगळी व कडक प्रक्रिया लागू करूया असे बैठकीत ठरले.मुख्यमंत्री सावंत यांनी यानंतर पत्रकार परिषदही घेतली व सविस्तर माहिती दिली.गोव्यात देशभरातून रोज चार हजार प्रवासी येतील, असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात हजार बाराशेच येतात. गोव्यात रेल्वेची संख्या मर्यादित आहे. विमानेही कमी येतात. रोज एक हजार व्यक्तींची चाचणी करण्याची गोव्याची क्षमता आहे, त्यामुळे आम्ही गोव्यात येणा-या प्रत्येकाची कोरोना चाचणी करू. महाराष्ट्रातील प्रवाशांना म्हणून वेगळी प्रक्रिया नसेल. जो प्रवासी नो कोरोना प्रमाणपत्र घेऊन येईल, त्याची चाचणी केली जाणार नाही. अशा प्रकारचे प्रमाणपत्र 48 तास अगोदर प्रयोगशाळेतून घेतलेले असावे. प्रमाणपत्र नसलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करू व ती नकारात्मक आली तर त्यास होम क्वारंटाईनचा पर्याय दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवा