शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:25 IST

Coronavirus : भाजीपाला आणि कडधान्य किराणामालाची दुकाने उघडी असली तरी मासळीबाजार मात्र लॉकडाऊनलोडमुळे बंद आहे.

पणजी - खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे ट्रॉलर्स मासेमारीसाठी जाण्याचे बंद झाले आह. गोव्यातील प्रमुख मालिम मासेमारी जेटीवर शेकडो ट्रॉलर्स नांगरून ठेवण्यात आले आहेत. भाजीपाला आणि कडधान्य किराणामालाची दुकाने उघडी असली तरी मासळीबाजार मात्र लॉकडाऊनलोडमुळे बंद आहे.

काही ठिकाणी गेल्या दोन दिवसात फिरत्या वाहनांमधून मासेविक्री करण्यात आली. परंतु ही वाहनेही आता बंद झाली आहेत. पर्वरी भागात शुक्रवारी एक-दोन किरकोळ मासेविक्री वाहने आली होती. परंतु काही तासातच मासळी संपल्यावर ती परतली. आज शनिवारी ही वाहने फिरकलीच नाहीत. त्यामुळे मत्स्य खवय्यांचे हाल झाले आहेत. गोव्यातील प्रमुख अन्न म्हणजे भात आणि मासळीची आमटी, परंतु मासेच मिळत नसल्याने जेवणाचा घास तोंडात जात नाही, अशी गोवेकरांची स्थिती झालेली आहे.

हंगाम संपण्याआधी व्यवसाय बंद

 मच्छिमारीचा हंगाम संपण्याआधीच ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून नांगरावे लागले आहेत. 

राज्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेटी असलेल्या मालिम जेटीवर गेल्या दोन-तीन दिवसात सुमारे २५० ट्रॉलर्स नांगरून ठेवले आहेत. एकही ट्रॉलर मासेमारीसाठी गेलेेला नाही. 

मांडवी फिशरमेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब म्हणाले की,  मासे विकण्यासाठी बाजारपेठा बंद केलेला आहेत. शिवाय ट्रक बंद आहेत त्यामुळे निर्यातही होत नाही. जे अवघे काहीट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी गेले होते, तेही परतले आहेत. गोव्यात मे महिनाअखेरपर्यंतच मासेमारी करायला मिळते. १ जूनपासून पावसाळ्यात दोन महिने मासेमारीवर बंदी असते. मात्र लॉकडाऊनमुळे ही बंदी आतापासूनच लागू झालेली आहे. ट्रॉलर नांगरुन ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नसल्याचे मालिम येथील अन्य एका ट्रॉलरमालकाने सांगितले. 

शेजारी राज्यातील खलाशी अडकले

शेजारी कर्नाटक, महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगढ, ओडिशा येथील खलाशीही गोव्यातील ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात काम करतात. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असल्याने ते गांवी जातात. तेथे शेतीची कामे करतात. ही कामे आटोपल्यानंतरच ते गोव्यात परततात. गोव्यात ट्रॉलरवर काम करण्यासाठी खलाशी मिळत नसल्याने या कामगारांवरच ट्रॉलरमालकांना सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. मोठ्या ट्रॉलरवर साधारणपणे ४0 तर छोट्या ट्रॉलरवर १५ ते २0 खलाशी लागतात. हे खलाशीही  ट्रॉलर्सवर अडकले असून  गावी जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने ट्रॉलरमालकांना त्यांना  बसूनच पगार द्यावा लागत आहे, अशी माहिती या ट्रॉलरमालकाने दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक

Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgoaगोवा