शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

राज्यघटनेविषयी विरियातो यांच्या विधानाने खळबळ; भाजपची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2024 13:18 IST

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोमंतकीय जनतेवर भारतीय राज्यघटना लादल्याचा आरोप करून दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी जे विधान केले आहे, त्याचा भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी समाचार घेतला आहे.

'विरियातो यांनी केलेली टिप्पणी दुर्दैवी आहे. माजी नौदल अधिकारी म्हणून मला त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. तरीही, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, ते सातत्याने राष्ट्रीय हितसंबंधांचा विश्वासघात करणारी भूमिका घेतात. ध्वजारोहणावेळी भारतीय नौदलाचा विरोध असो किंवा राज्यघटनेविषयीची त्यांची सध्याची टिप्पणी असो, हे अत्यंत खेदजनक आहे. इंडिया आघाडी घटनेचे समर्थन करत नाही का?, असा सवाल वेर्णेकर यांनी केला. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर विरियातो यांनी मुक्तीनंतर भारतीय घटना गोव्यावर लादण्यात आली, असे विधान राहुल गांधी यांनी २०१९च्या बैठकीत केले होते, असे सांगितले. 

हा मुद्दा विरियातो यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणल्याचे प्रचारावेळी एका भाषणात म्हटले होते. दरम्यान, रात्री विरियातोंनी द्विट करून आपल्या विधानाचा विपर्यास करू नये असे म्हटले आहे.

मनोज परब यांची टीका

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना त्याच संविधानाच्या नावाने शपथ घेतली आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की ते तुमच्यावर जबरदस्तीने लादले गेले असेल तर तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी काम कराल असे वाटत नाही, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री संतप्त

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. उलट काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे बेपर्वा भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे. काँग्रेसपासून आपल्या लोकशाहीला धोका आहे.' 

टॅग्स :goaगोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाcongressकाँग्रेसgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा