शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:20 IST

भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा दावा

पणजी : गोवा  सरकारच्या सुमार कामगिरीवर तोफ डागताना प्रदेश काँग्रेसने वेगवेगळ्या निकषांवर सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीकेची झोड उठविली आहे. पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दहा निकष लावून केलेल्या सर्वेक्षणात सरकारची कामगिरी अगदीच सुमार आढळून आलेली आहे. रोजगार संधी, कचरा विल्हेवाट, दर नियंत्रण या बाबतीत सरासरीपेक्षाही बरेच कमी गुण राज्य सरकारला मिळाले आहेत.’ स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत तिजोरी साफ केली. मात्र कचरा काही साफ झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे सोडून आहेत त्याही गमावल्या. खाणी बंद झाल्याने लोकांचा रोजगार गेला. नोटाबंदीमुळे देशभरात नोकऱ्या गेल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांच्या बाबतीतही सरकार अपयशी ठरले. हा अहवाल नजरेसमोर ठेवून लोकसभेसाठी आगामी निवडणुकीत दोन्ही जागा तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत जनता भाजपला धुडकावून लावील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, ‘या अहवालाबाबत मुळीच प्रश्न उपस्थित करता येणार नाही. कारण शास्रोक्त पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे. राज्यात भाजप आघाडी सरकार सुशिक्षितांना नोकऱ्या देऊ शकलेले नाही. कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.’

मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप दरम्यान, कारवार येथे निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कन्नडिगांना गोव्यात नोकºया देण्याचे जे कथित विधान केले त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. डिमेलो यांनी या विधानाला हरकत घेताना ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ याचा उद्घोष करणारे गप्प का असा सवाल केला आहे. पत्रकार परिषदेस अमरनाथ पणजीकर तसेच अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव शंकर गौडा पाटील हेही उपस्थित होते.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस