शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

काँग्रेस पक्षाने माझ्यावर 'अन्याय'च केला: दिगंबर कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:57 IST

मडगाव मतदारसंघामध्ये कितीही विरोधक आले तरी त्याची पर्वा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसला मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले, परंतु मी कायद्याच्या कचाट्यात सापडलो तेव्हा त्याच काँग्रेसने मला कोणतीच मदत केली नाही. मला सत्ता हवी असती तर सप्टेंबर २०२२ पूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो. काँग्रेसने २०२२ साली व नंतरही मला माझे योग्य स्थान दिले नाही, अशी खंत मंत्री दिगंबर कामत यांनी काल व्यक्त केली.

दिगंबर कामत यांनी २००५ साली प्रथम भाजप सोडला होता, तेव्हा त्यांनी आपली भाजपमध्ये घुसमट झाली होती अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती व स्वतःच्या कृतीचे स्पष्टीकरणही दिले होते. काल मात्र कामत यांनी प्रथमच जाहीरपणे काँग्रेसला दोष दिला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपण पाच वर्षे स्थिरपणे सरकार चालून दाखवले पण आपल्याला २०२२ साली काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. आपल्याला विरोधी पक्षनेते पदाऐवजी आम्ही अन्य काही तरी देऊ पाहतो असे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते, पण तसे काही घडले नाही, असे काल कामत म्हणाले. 

अर्थात २०१२ सालच्या निवडणुकीवेळी गोव्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते व त्यानंतर मात्र काँग्रेस आमदारांची संख्या वाढली होती, पण २०१७ साली लुईझिन फालेरो व कामत यांच्यातील नेतृत्वाच्या विषयामुळे गोव्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. काल कामत यांनी या विषयाला स्पर्श केला नाही.

काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देऊनही त्या पक्षाशी प्रतारणा केली, असे वाटत नाही का? यावर ते म्हणाले की, काँग्रेसने २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर केले नाही. मला विरोधी पक्षनेतेपदही दिले नाही. काँग्रेसने मला बाहेर टाकल्यासारखे केले.

पर्रीकर व सावंत यांच्यात नेतृत्वगुण व एकूणच बाबतीत आपण काय फरक पाहता आहात ? असा प्रश्न केला असता कामत म्हणाले की, पर्रीकर बुद्धिमान माणूस होते. मला ठाऊक नाही की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना होत्या. जो माणूस हयात नाही त्याच्याबद्दल बोलणे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. लोक मला देवाचा माणूस म्हणतात. देवाचा माणूस कटू कसा असू शकतो?

भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते का? या प्रश्नावर कामत म्हणाले की, सप्टेंबर २०२२ मध्ये भाजप प्रवेशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलावून घेत काय हवे? असे विचारले होते. माझ्या जागी अन्य कोणी असता तर मागितले असते. मी माझे भवितव्य तुमच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपवतो, एवढेच सांगून मी गोव्यात परतलो. आज माझा मंत्रिपदाने यथोचित सन्मान झालेला आहे. नशिबात असेल तर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

मडगावमध्ये मी भक्कम

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मडगावमध्ये अनेकांनी कंबर कसली आहे. तुम्ही याकडे कसे पाहता, याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, मडगावकर आणि दामबाबच्या आशीर्वादाने मी भक्कम आहे. अनेकजण आले आणि गेले. जोपर्यंत मला मडगावच्या लोकांचा पाठिंबा आणि दामबाबचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कोणीही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मला त्याची पर्वा नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस