शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

काँग्रेस पक्षाने माझ्यावर 'अन्याय'च केला: दिगंबर कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:57 IST

मडगाव मतदारसंघामध्ये कितीही विरोधक आले तरी त्याची पर्वा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसला मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले, परंतु मी कायद्याच्या कचाट्यात सापडलो तेव्हा त्याच काँग्रेसने मला कोणतीच मदत केली नाही. मला सत्ता हवी असती तर सप्टेंबर २०२२ पूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो. काँग्रेसने २०२२ साली व नंतरही मला माझे योग्य स्थान दिले नाही, अशी खंत मंत्री दिगंबर कामत यांनी काल व्यक्त केली.

दिगंबर कामत यांनी २००५ साली प्रथम भाजप सोडला होता, तेव्हा त्यांनी आपली भाजपमध्ये घुसमट झाली होती अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती व स्वतःच्या कृतीचे स्पष्टीकरणही दिले होते. काल मात्र कामत यांनी प्रथमच जाहीरपणे काँग्रेसला दोष दिला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपण पाच वर्षे स्थिरपणे सरकार चालून दाखवले पण आपल्याला २०२२ साली काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. आपल्याला विरोधी पक्षनेते पदाऐवजी आम्ही अन्य काही तरी देऊ पाहतो असे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते, पण तसे काही घडले नाही, असे काल कामत म्हणाले. 

अर्थात २०१२ सालच्या निवडणुकीवेळी गोव्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते व त्यानंतर मात्र काँग्रेस आमदारांची संख्या वाढली होती, पण २०१७ साली लुईझिन फालेरो व कामत यांच्यातील नेतृत्वाच्या विषयामुळे गोव्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. काल कामत यांनी या विषयाला स्पर्श केला नाही.

काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देऊनही त्या पक्षाशी प्रतारणा केली, असे वाटत नाही का? यावर ते म्हणाले की, काँग्रेसने २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर केले नाही. मला विरोधी पक्षनेतेपदही दिले नाही. काँग्रेसने मला बाहेर टाकल्यासारखे केले.

पर्रीकर व सावंत यांच्यात नेतृत्वगुण व एकूणच बाबतीत आपण काय फरक पाहता आहात ? असा प्रश्न केला असता कामत म्हणाले की, पर्रीकर बुद्धिमान माणूस होते. मला ठाऊक नाही की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना होत्या. जो माणूस हयात नाही त्याच्याबद्दल बोलणे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. लोक मला देवाचा माणूस म्हणतात. देवाचा माणूस कटू कसा असू शकतो?

भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते का? या प्रश्नावर कामत म्हणाले की, सप्टेंबर २०२२ मध्ये भाजप प्रवेशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलावून घेत काय हवे? असे विचारले होते. माझ्या जागी अन्य कोणी असता तर मागितले असते. मी माझे भवितव्य तुमच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपवतो, एवढेच सांगून मी गोव्यात परतलो. आज माझा मंत्रिपदाने यथोचित सन्मान झालेला आहे. नशिबात असेल तर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

मडगावमध्ये मी भक्कम

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मडगावमध्ये अनेकांनी कंबर कसली आहे. तुम्ही याकडे कसे पाहता, याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, मडगावकर आणि दामबाबच्या आशीर्वादाने मी भक्कम आहे. अनेकजण आले आणि गेले. जोपर्यंत मला मडगावच्या लोकांचा पाठिंबा आणि दामबाबचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कोणीही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मला त्याची पर्वा नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस