शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाने माझ्यावर 'अन्याय'च केला: दिगंबर कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:57 IST

मडगाव मतदारसंघामध्ये कितीही विरोधक आले तरी त्याची पर्वा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसला मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले, परंतु मी कायद्याच्या कचाट्यात सापडलो तेव्हा त्याच काँग्रेसने मला कोणतीच मदत केली नाही. मला सत्ता हवी असती तर सप्टेंबर २०२२ पूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो. काँग्रेसने २०२२ साली व नंतरही मला माझे योग्य स्थान दिले नाही, अशी खंत मंत्री दिगंबर कामत यांनी काल व्यक्त केली.

दिगंबर कामत यांनी २००५ साली प्रथम भाजप सोडला होता, तेव्हा त्यांनी आपली भाजपमध्ये घुसमट झाली होती अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती व स्वतःच्या कृतीचे स्पष्टीकरणही दिले होते. काल मात्र कामत यांनी प्रथमच जाहीरपणे काँग्रेसला दोष दिला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपण पाच वर्षे स्थिरपणे सरकार चालून दाखवले पण आपल्याला २०२२ साली काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. आपल्याला विरोधी पक्षनेते पदाऐवजी आम्ही अन्य काही तरी देऊ पाहतो असे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते, पण तसे काही घडले नाही, असे काल कामत म्हणाले. 

अर्थात २०१२ सालच्या निवडणुकीवेळी गोव्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते व त्यानंतर मात्र काँग्रेस आमदारांची संख्या वाढली होती, पण २०१७ साली लुईझिन फालेरो व कामत यांच्यातील नेतृत्वाच्या विषयामुळे गोव्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. काल कामत यांनी या विषयाला स्पर्श केला नाही.

काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देऊनही त्या पक्षाशी प्रतारणा केली, असे वाटत नाही का? यावर ते म्हणाले की, काँग्रेसने २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर केले नाही. मला विरोधी पक्षनेतेपदही दिले नाही. काँग्रेसने मला बाहेर टाकल्यासारखे केले.

पर्रीकर व सावंत यांच्यात नेतृत्वगुण व एकूणच बाबतीत आपण काय फरक पाहता आहात ? असा प्रश्न केला असता कामत म्हणाले की, पर्रीकर बुद्धिमान माणूस होते. मला ठाऊक नाही की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना होत्या. जो माणूस हयात नाही त्याच्याबद्दल बोलणे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. लोक मला देवाचा माणूस म्हणतात. देवाचा माणूस कटू कसा असू शकतो?

भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते का? या प्रश्नावर कामत म्हणाले की, सप्टेंबर २०२२ मध्ये भाजप प्रवेशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलावून घेत काय हवे? असे विचारले होते. माझ्या जागी अन्य कोणी असता तर मागितले असते. मी माझे भवितव्य तुमच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपवतो, एवढेच सांगून मी गोव्यात परतलो. आज माझा मंत्रिपदाने यथोचित सन्मान झालेला आहे. नशिबात असेल तर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

मडगावमध्ये मी भक्कम

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मडगावमध्ये अनेकांनी कंबर कसली आहे. तुम्ही याकडे कसे पाहता, याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, मडगावकर आणि दामबाबच्या आशीर्वादाने मी भक्कम आहे. अनेकजण आले आणि गेले. जोपर्यंत मला मडगावच्या लोकांचा पाठिंबा आणि दामबाबचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कोणीही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मला त्याची पर्वा नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस