शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 1:39 PM

भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केला.काँग्रेसचे दहा आमदार भाजपामध्ये नुकतेच येऊ पाहत होते पण आम्ही त्यांना भाजपामध्ये घेतले नाही, अशी माहिती बुधवारीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती.

पणजी - भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.

काँग्रेसचे दहा आमदार भाजपामध्ये नुकतेच येऊ पाहत होते पण आम्ही त्यांना भाजपामध्ये घेतले नाही, अशी माहिती बुधवारीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व हळर्णकर यांनी काँग्रेसची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. हळर्णकर म्हणाले, की पूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे ध्येय आहे असे भाजपाचे राष्ट्रीय नेते सांगतात. मग जर काँग्रेसच्या एकूण पंधरापैकी दहा आमदार भाजपामध्ये येत होते ही गोष्ट खरी असेल तर तेंडुलकर यांनी ती संधी कशी सोडली असा प्रश्न निर्माण होतो. कारण दहा आमदार पक्षाला सोडून भाजपामध्ये गेले तर गोवा काँग्रेसमुक्त करण्याच्या दिशेने ते भाजपाचे मोठे पाऊल ठरले असते. भाजपाचे नेते खोटे बोलतात. 

हळर्णकर म्हणाले, की यापूर्वी शिरोडकर यांचा 70 कोटींच्या जमिनीच्या विषयावरून भाजपाने छळ केला व शिरोडकर कंटाळून भाजपामध्ये गेले. सोपटेंच्या मतदारसंघातही भाजपाने विकास कामे रोखली होती व त्यामुळे सोपटेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या आमदारांचा अशा प्रकारे छळ करणे हे भाजपाचे तंत्र आहे. आपण तर भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा जन्मच सॅक्युलर पक्षासाठी झाला आहे.

चोडणकर म्हणाले, की भाजपाचे नेते साठ कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन फिरत होते. काँग्रेसच्या आमदारांनी ते पॅकेज नाकारले. आम्ही भाजपाची पॅकेज पद्धत उघडी पाडली व त्यानंतर स्वत:ची लाज राखण्यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे दहा आमदार फुटण्यासाठी प्रस्ताव घेऊन आले होते, अशी खोटी कथा तयार केली. भाजपाच्या नेत्यांनी कधी तरी खरे बोलावे. भाजपावाले कॅसिनो जुगारप्रश्नी सध्या जे काही बोलतात ते ऐकून लोक त्यांना हसतात.

 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाcongressकाँग्रेस