शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:31 IST

सांताक्रूझ येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या कित्येक वर्षानंतर आता सांताक्रूझ मतदारसंघात विकास होताना दिसत आहे. आमदार रुदोल्फ फर्नाडिस हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर हा विकास झालेला आहे. काँग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नाडिस (मामी) यांना असाच विकास हवा होता, पण काँग्रेसने त्यांना कधीच सहकार्य केले नाही. उलट प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना त्रास दिला. काँग्रेस महाभयंकर आहे. ते आपल्या लोकांचादेखील छळ करतात', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सांताक्रूझ येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार रुदोल्फ फर्नाडिस, सांताक्रूझ भाजप मंडळचे अध्यक्ष संदेश शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकांची उपस्थिती पाहून भारावलो

मुख्यमंत्री म्हणाले की, 'भर पावसात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती पाहून मी भारावलो. त्यामुळे आगामी २०२७ च्या निवडणुकीत २७ जागांसह राज्यात डबल इंजिनचे सरकार येईल हे आता स्पष्ट झाले आहे. सबका साथ, सबका विकास या तत्त्वावरच भाजप सरकारने आतापर्यंत राज्यात काम केले. आम्ही मतदारसंघाच्या, राज्याच्या विकासासाठी काम करीत आहोत. लोकांचा विकास कसा करता येईल, यावर आम्ही भर दिला आहे. युवकांनी कौशल्य विकसित करावे, त्यांना रोजगार देण्याची जबाबदारी आमची आहे.

मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा : रुदोल्फ

आमदार रुदोफ्ल फर्नाडिस म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नेहमीच पाठिंबा आम्हाला मिळाला आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम घेऊन गेलो की पूर्ण होतेच. मतदारसंघातील अनेक विकासकामे त्यांच्यामार्फतच करण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानेच मतदारसंघाचा विकास करू शकलो. युवकांना नोकऱ्या मिळवून देऊ शकलो. यापुढेदेखील त्यांचे पाठबळ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

केंद्राच्या ८० टक्के योजना लोकांपर्यंत

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात वेगवेगळ्या योजना आम्ही राबविल्या आणि जवळपास १०० टक्के लोकांपर्यंत आम्ही योजना पोहचविल्या देखील. पण एवढ्यावरच समाधान न मानता केंद्र सरकारच्या १३ प्रमुख योजनांपैकी सुमारे ८० टक्के योजना १०० टक्के लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत. असे करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या प्रमुख योजनेंपैकी पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, वंदना योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण