शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 09:49 IST

पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही.

गोव्यात काँग्रेसने कोणताही नेता प्रभारी म्हणून दिला, तरी गोव्यातील काँग्रेसची गाडी रुळावर आणण्यासाठी बराच काळ लागणार आहे. हा पक्ष गोव्यात आमदारांनी खिळखिळा केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार भाजपमध्ये जात राहिले. त्यामुळे गोव्यात आता काँग्रेसची घडी पूर्ण विस्कटलेली आहे. पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही. आमदार गेले की, आमदारांसोबत कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात, गोव्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अगदीच भुसभुशीत आहे. त्यामुळे फुटू पाहणाऱ्या आमदारांचेही फावते.

कालच्या शनिवारी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती गोव्यात काँग्रेसचे प्रभारी म्हणून झाली आहे. ठाकरे यांचे स्वागत, ठाकरे यांना गोव्यात काँग्रेससमोर कोणती कठीण आव्हाने आहेत हे लवकर कळून येईलच, माणिकम टागोर हेही गोव्यात काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांचे काम नीट सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडील गोव्याची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. २०१२ पासून भाजपकडे सत्ता गेली आणि गोव्यातील काँग्रेसमध्ये मोठे स्फोट होणे सुरू झाले. आज काँग्रेसकडे फक्त तीन आमदार आहेत आणि त्यापैकी दोघे राजकीयदृष्ट्या संशयितच असल्यासारखे आहेत. भाजपकडून त्यांना ऑफर्स येत आहेत.

विरोधी बाकांवर बसून काँग्रेसचे काम पुढे नेणे हे दिव्यच असते. कारण, काँग्रेसचे राजकारण हे संघटनात्मक बळावर कधी चालत नाही, ते आमदाराचा प्रभाव आणि आमदाराकडील निधी याच्याच बळावर चालत असते. बाबू कवळेकर यांच्यासारखा नेता केपेतील तळागाळात पोहोचला होता, पण त्यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. दिगंबर कामत यांच्यासारख्या आमदाराला मडगावमध्ये पराभूत करता येत नाही. एवढी त्यांची मतदारसंघावर पकड आहे, पण विरोधात तेही राहिले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये उडी टाकली, दिनेश गुंडू राव प्रभारी होते तेव्हा त्यांनी गोव्यात चांगले काम केले होते. काही नव्या उमेदवारांना हेरून तिकीटही दिले होते. मात्र, काहीजणांनी पक्षाला दगा दिलाच. 

संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, मायकल लोबो, रुदोल्फ फर्नाडिस वगैरेंनी लगेच काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला, काँग्रेस पक्ष ज्यांना विरोधी पक्षनेतेपद देतो, तो नेता हमखास फुटतो. रवी नाईकांपासून ती परंपरा २००० साली सुरू झाली, अगोदर मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात काँग्रेसची शकले उडवली व नंतर केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसला भगदाड पाडण्याचे उर्वरित काम पूर्ण केले, पूर्वी गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहूनदेखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघांमध्ये प्रबळ गट समित्या नाहीत. 

मडकई, प्रियोळ, म्हापसा, फातोर्डा असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे काँग्रेस सहसा जिंकत नाही. कुडतरीसारखा मतदारसंघही आज काँग्रेसकडे नाही. तिथे अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड हे आमदार आहेत. नावेलीसारखा मतदारसंघही काँग्रेसला राखता आला नाही. तिथे भाजपचे आमदार उल्हास नाईक हे नेतृत्व करत आहेत. कुडतरी, नावेली, साळगाव, पर्ये अशा विविध मतदारसंघांतून पुढे आलेले नेते एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये राज्यात मुख्यमंत्री होते. आज हे चार तसेच मडगावही काँग्रेसच्या ताब्यात नाही. 

आमदार गेल्यानंतर नवे उमेदवारही अशा मतदारसंघांत तयार झाले नाहीत. काँग्रेसचे है अपयश आहे. काँग्रेसचे पणजीतील काँग्रेस हाऊस केवळ निवडणुकीवेळीच गजबजत असते. काँग्रेसचे गोव्यातील सगळे पदाधिकारी केवळ पत्रकार परिषदा घेणे व पत्रके काढून प्रसिद्धी मिळवणे एवढेच काम करतात त्यांना गावोगावी पाठवून काँग्रेसचे काम वाढवून घेण्याचे कौशल्य कुणी प्रभारी दाखवतच नाही. पूर्वी काँग्रेसचे काही प्रभारी हे तिकीट वाटपात प्रचंड घोळ करायचे, आता नवे प्रभारी ठाकरे यांना गोव्यात खूप अनुभव येतील. काँग्रेसमधील सेटिंग व गटबाजीही कळून येईल, गोवा की काँग्रेस अजीब है असे कदाचित बोलण्याची वेळ त्यांच्यावर एक दिवस येईल. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस