शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 09:49 IST

पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही.

गोव्यात काँग्रेसने कोणताही नेता प्रभारी म्हणून दिला, तरी गोव्यातील काँग्रेसची गाडी रुळावर आणण्यासाठी बराच काळ लागणार आहे. हा पक्ष गोव्यात आमदारांनी खिळखिळा केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार भाजपमध्ये जात राहिले. त्यामुळे गोव्यात आता काँग्रेसची घडी पूर्ण विस्कटलेली आहे. पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही. आमदार गेले की, आमदारांसोबत कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात, गोव्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अगदीच भुसभुशीत आहे. त्यामुळे फुटू पाहणाऱ्या आमदारांचेही फावते.

कालच्या शनिवारी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती गोव्यात काँग्रेसचे प्रभारी म्हणून झाली आहे. ठाकरे यांचे स्वागत, ठाकरे यांना गोव्यात काँग्रेससमोर कोणती कठीण आव्हाने आहेत हे लवकर कळून येईलच, माणिकम टागोर हेही गोव्यात काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांचे काम नीट सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडील गोव्याची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. २०१२ पासून भाजपकडे सत्ता गेली आणि गोव्यातील काँग्रेसमध्ये मोठे स्फोट होणे सुरू झाले. आज काँग्रेसकडे फक्त तीन आमदार आहेत आणि त्यापैकी दोघे राजकीयदृष्ट्या संशयितच असल्यासारखे आहेत. भाजपकडून त्यांना ऑफर्स येत आहेत.

विरोधी बाकांवर बसून काँग्रेसचे काम पुढे नेणे हे दिव्यच असते. कारण, काँग्रेसचे राजकारण हे संघटनात्मक बळावर कधी चालत नाही, ते आमदाराचा प्रभाव आणि आमदाराकडील निधी याच्याच बळावर चालत असते. बाबू कवळेकर यांच्यासारखा नेता केपेतील तळागाळात पोहोचला होता, पण त्यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. दिगंबर कामत यांच्यासारख्या आमदाराला मडगावमध्ये पराभूत करता येत नाही. एवढी त्यांची मतदारसंघावर पकड आहे, पण विरोधात तेही राहिले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये उडी टाकली, दिनेश गुंडू राव प्रभारी होते तेव्हा त्यांनी गोव्यात चांगले काम केले होते. काही नव्या उमेदवारांना हेरून तिकीटही दिले होते. मात्र, काहीजणांनी पक्षाला दगा दिलाच. 

संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, मायकल लोबो, रुदोल्फ फर्नाडिस वगैरेंनी लगेच काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला, काँग्रेस पक्ष ज्यांना विरोधी पक्षनेतेपद देतो, तो नेता हमखास फुटतो. रवी नाईकांपासून ती परंपरा २००० साली सुरू झाली, अगोदर मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात काँग्रेसची शकले उडवली व नंतर केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसला भगदाड पाडण्याचे उर्वरित काम पूर्ण केले, पूर्वी गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहूनदेखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघांमध्ये प्रबळ गट समित्या नाहीत. 

मडकई, प्रियोळ, म्हापसा, फातोर्डा असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे काँग्रेस सहसा जिंकत नाही. कुडतरीसारखा मतदारसंघही आज काँग्रेसकडे नाही. तिथे अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड हे आमदार आहेत. नावेलीसारखा मतदारसंघही काँग्रेसला राखता आला नाही. तिथे भाजपचे आमदार उल्हास नाईक हे नेतृत्व करत आहेत. कुडतरी, नावेली, साळगाव, पर्ये अशा विविध मतदारसंघांतून पुढे आलेले नेते एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये राज्यात मुख्यमंत्री होते. आज हे चार तसेच मडगावही काँग्रेसच्या ताब्यात नाही. 

आमदार गेल्यानंतर नवे उमेदवारही अशा मतदारसंघांत तयार झाले नाहीत. काँग्रेसचे है अपयश आहे. काँग्रेसचे पणजीतील काँग्रेस हाऊस केवळ निवडणुकीवेळीच गजबजत असते. काँग्रेसचे गोव्यातील सगळे पदाधिकारी केवळ पत्रकार परिषदा घेणे व पत्रके काढून प्रसिद्धी मिळवणे एवढेच काम करतात त्यांना गावोगावी पाठवून काँग्रेसचे काम वाढवून घेण्याचे कौशल्य कुणी प्रभारी दाखवतच नाही. पूर्वी काँग्रेसचे काही प्रभारी हे तिकीट वाटपात प्रचंड घोळ करायचे, आता नवे प्रभारी ठाकरे यांना गोव्यात खूप अनुभव येतील. काँग्रेसमधील सेटिंग व गटबाजीही कळून येईल, गोवा की काँग्रेस अजीब है असे कदाचित बोलण्याची वेळ त्यांच्यावर एक दिवस येईल. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस