शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

काँग्रेस गोव्यात अडचणीतच; आमदारांनी पक्ष खिळखिळा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 09:49 IST

पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही.

गोव्यात काँग्रेसने कोणताही नेता प्रभारी म्हणून दिला, तरी गोव्यातील काँग्रेसची गाडी रुळावर आणण्यासाठी बराच काळ लागणार आहे. हा पक्ष गोव्यात आमदारांनी खिळखिळा केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार भाजपमध्ये जात राहिले. त्यामुळे गोव्यात आता काँग्रेसची घडी पूर्ण विस्कटलेली आहे. पक्ष कधी आमदारांवर अवलंबून नसतो असे भाजपविषयी म्हणता येते. कारण तिथे संघटनात्मक बांधणीची तटबंदी मजबूत असते काँग्रेसमध्ये गोव्यात तरी तशी स्थिती कधीच असत नाही. आमदार गेले की, आमदारांसोबत कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात, गोव्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अगदीच भुसभुशीत आहे. त्यामुळे फुटू पाहणाऱ्या आमदारांचेही फावते.

कालच्या शनिवारी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती गोव्यात काँग्रेसचे प्रभारी म्हणून झाली आहे. ठाकरे यांचे स्वागत, ठाकरे यांना गोव्यात काँग्रेससमोर कोणती कठीण आव्हाने आहेत हे लवकर कळून येईलच, माणिकम टागोर हेही गोव्यात काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांचे काम नीट सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याकडील गोव्याची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. २०१२ पासून भाजपकडे सत्ता गेली आणि गोव्यातील काँग्रेसमध्ये मोठे स्फोट होणे सुरू झाले. आज काँग्रेसकडे फक्त तीन आमदार आहेत आणि त्यापैकी दोघे राजकीयदृष्ट्या संशयितच असल्यासारखे आहेत. भाजपकडून त्यांना ऑफर्स येत आहेत.

विरोधी बाकांवर बसून काँग्रेसचे काम पुढे नेणे हे दिव्यच असते. कारण, काँग्रेसचे राजकारण हे संघटनात्मक बळावर कधी चालत नाही, ते आमदाराचा प्रभाव आणि आमदाराकडील निधी याच्याच बळावर चालत असते. बाबू कवळेकर यांच्यासारखा नेता केपेतील तळागाळात पोहोचला होता, पण त्यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. दिगंबर कामत यांच्यासारख्या आमदाराला मडगावमध्ये पराभूत करता येत नाही. एवढी त्यांची मतदारसंघावर पकड आहे, पण विरोधात तेही राहिले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये उडी टाकली, दिनेश गुंडू राव प्रभारी होते तेव्हा त्यांनी गोव्यात चांगले काम केले होते. काही नव्या उमेदवारांना हेरून तिकीटही दिले होते. मात्र, काहीजणांनी पक्षाला दगा दिलाच. 

संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, मायकल लोबो, रुदोल्फ फर्नाडिस वगैरेंनी लगेच काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला, काँग्रेस पक्ष ज्यांना विरोधी पक्षनेतेपद देतो, तो नेता हमखास फुटतो. रवी नाईकांपासून ती परंपरा २००० साली सुरू झाली, अगोदर मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात काँग्रेसची शकले उडवली व नंतर केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसला भगदाड पाडण्याचे उर्वरित काम पूर्ण केले, पूर्वी गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहूनदेखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघांमध्ये प्रबळ गट समित्या नाहीत. 

मडकई, प्रियोळ, म्हापसा, फातोर्डा असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे काँग्रेस सहसा जिंकत नाही. कुडतरीसारखा मतदारसंघही आज काँग्रेसकडे नाही. तिथे अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड हे आमदार आहेत. नावेलीसारखा मतदारसंघही काँग्रेसला राखता आला नाही. तिथे भाजपचे आमदार उल्हास नाईक हे नेतृत्व करत आहेत. कुडतरी, नावेली, साळगाव, पर्ये अशा विविध मतदारसंघांतून पुढे आलेले नेते एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये राज्यात मुख्यमंत्री होते. आज हे चार तसेच मडगावही काँग्रेसच्या ताब्यात नाही. 

आमदार गेल्यानंतर नवे उमेदवारही अशा मतदारसंघांत तयार झाले नाहीत. काँग्रेसचे है अपयश आहे. काँग्रेसचे पणजीतील काँग्रेस हाऊस केवळ निवडणुकीवेळीच गजबजत असते. काँग्रेसचे गोव्यातील सगळे पदाधिकारी केवळ पत्रकार परिषदा घेणे व पत्रके काढून प्रसिद्धी मिळवणे एवढेच काम करतात त्यांना गावोगावी पाठवून काँग्रेसचे काम वाढवून घेण्याचे कौशल्य कुणी प्रभारी दाखवतच नाही. पूर्वी काँग्रेसचे काही प्रभारी हे तिकीट वाटपात प्रचंड घोळ करायचे, आता नवे प्रभारी ठाकरे यांना गोव्यात खूप अनुभव येतील. काँग्रेसमधील सेटिंग व गटबाजीही कळून येईल, गोवा की काँग्रेस अजीब है असे कदाचित बोलण्याची वेळ त्यांच्यावर एक दिवस येईल. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस