शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पाच वर्षांनंतरची आव्हाने; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची कारकीर्द अन् गोव्यातील राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2024 07:58 IST

आमच्याशी बोलताना ते रिलॅक्स दिसले. 

कोठंबी, पाळीसारख्या गावातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील एक तरुण पुढे येतो. सामाजिक कार्य करताना आयुर्वेदाची पदवी घेतो. ग्रामीण भागात खासगी दवाखाना चालत नाही म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश करतो. तिथे अवधीच वर्षे काम करून राजकारणात प्रवेश करतो. याच काळात साखळी, वेळगे, कुडणे, नावेली, पाळी आणि सत्तरी, डिचोलीच्या पट्टयात मायनिंग धंद्याला जबरदस्त तेजी आलेली असते. प्रत्येकाच्या खिशात चार पैसे खुळखुळत असतात. मायनिंगची झिंगही चढत असते. 

या पार्श्वभूमीवर हा तरुण भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवतो. पहिल्यांदा पोटनिवडणूक हरतो. नंतर २०१२ सालच्या भाजपच्या लाटेत तो दुसऱ्यांदा निवडणूक लढवून जिंकतो. विधानसभेत प्रवेश करतो. या तरुणाचे वय २०१२ साली ३८ वर्षे होते. त्याचे नाव अर्थातच डॉ. प्रमोद सावंत. काल १९ रोजी सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. आता त्यांचे वय ५० झाले आहे. गेल्या बारा वर्षात अनेक राजकीय अनुभव त्यांनी घेतले. गेल्या आठवड्यात सर्व संपादकांना एकत्र भेटले. आमच्याशी बोलताना ते रिलॅक्स दिसले. 

'मला २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत साखळीत कमी मतांची आघाडी मिळाली. फक्त सहाशे मतांनी मी जिंकलो; पण त्यामागील कारणे तुम्हालाही ठाऊक आहेत. त्या निवडणुकीपासून मात्र मी बदललो, अधिक आक्रमक झालो आहे. आता येत्या लोकसभा निवडणुकीवेळी साखळीत भाजपला किती मते मिळतात ते तुम्ही पाहा,' अशा आव्हानात्मक भाषेत सावंत बोलले. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

अर्थात गेल्या पाच वर्षात साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी काहीतरुणांना नोकऱ्या दिल्या असाव्यात. मुख्यमंत्रिपदी बसणाऱ्या नेत्याला आपल्या मतदारसंघातील काही जणांच्या पदरी नोकऱ्यांचे माप रिकामे करण्याची संधी मिळते. पूर्वी सत्तरी तालुक्यात अनेकांना नोकऱ्या मिळायच्या; पण ते दिवस मागे पडले, असे जाणवले. मुख्यमंत्री सावंत यांनी चलाखीने राज्य कर्मचारी निवड आयोग अस्तित्वात आणला. त्याद्वारे नोकर भरतीची प्रक्रिया ही ठरावीक मंत्र्यांच्या तावडीतून किंवा कचाट्यातून सावंत यांनी सोडवून घेतली आहे. त्यांनी नोकर भरतीची शेंडी मात्र स्वतःच्या हाती ठेवली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत अनेक नवे कायदे आणले, त्यातील कृषी जमीन विकण्यावरील बंदीची कायदेशीर तरतूद हा उल्लेखनीय, सरकारने एखादी समिती नेमून या तरतुदीची अंमलबजावणी कशी होत आहे, त्या कायद्यामुळे किती जमिनी विक्रीपासून वाचल्या ते तपासून पाहायला हवे, अन्यथा सगळी जनता मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहे आणि बिल्डर, भाटकार, कुळे मिळून जमिनी विकत आहेत असे व्हायला नको. शेवटी (काही) कायदे गाढव असतात हेही तेवढेच खरे. राज्यातील काही जमीन बळकाव प्रकरणे मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढली. खोटी कागदपत्रे तयार करून जमिनी विकणाऱ्या भामट्यांना अटक झाली. एसआयटी नेमली गेली. विशेष आयोगही नेमून अहवाल तयार करून घेतला गेला. मुख्यमंत्र्यांची पाच वर्षे बऱ्यापैकी गेली. त्यात कोविडचे मोठे संकट येऊन गेले. तो काळ अत्यंत कठीण होता. गोव्यात कोविडने चार हजार लोकांचे बळी घेतले.

गोमेकॉ इस्पितळात तेव्हा ऑक्सिजनकांडच घडले होते. यापुढील काळात मुख्यमंत्र्यांनी गोव्याला काही चांगले, मोठे व कल्याणकारी प्रकल्प देण्याची गरज आहे. प्रशासन लोकांच्या प्रश्नांप्रति अधिक संवेदनशील व कृतिशील करण्याची गरज आहे. अजूनही सामान्य माणूस सरकारी कार्यालयांसमोर ताटकळतो. ग्रामीण भागातील गरिबांची कामे ऑनलाइन पद्धतीने होत नाहीत. काही पोलिस अधिकारी व सरकारी अधिकारी लोकांना पिडतात. मुख्यमंत्र्यांना कडक व्हावे लागेल. 

लाडली लक्ष्मी, गृह आधारसारख्या योजना सरकार अजून नीट चालवू शकत नाही. सामाजिक सुरक्षा, गृह आधार यांच्या लाभार्थीना दर महिन्यास पैसे देण्यात सरकार कमी पडतेय. (स्व.) मनोहर पर्रीकर यांच्यामुळे सुरुवातीला सावंत यांच्या राजकीय जीवनास आकार मिळाला, पर्रीकर यांनी स्वतः सीएम पदी असताना कार्यक्षम व स्वच्छ प्रशासनाचा शक्य तो आग्रह धरला होता. त्यांच्या काळात सरकारी नोकऱ्या विकल्या जात नव्हत्या. सावंत यांना त्याबाबतही आता मोठी उपयोजना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत