शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

प्रथमच दोघे केंद्रीय मंत्री गोमंतकीयांच्या रोषास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:16 PM

गोव्यात प्रथमच लागोपाठ दोघे केंद्रीय मंत्री गोमंतकीयांच्या रोषास कारण ठरले आहेत. गोव्यात येऊन एनजीओंवर कडवट टीका केल्याने प्रथम केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल हे गोव्यातील विविध घटकांच्या टीकेचे कारण ठरले.

सदगुरू पाटील

पणजी - गोव्यात प्रथमच लागोपाठ दोघे केंद्रीय मंत्री गोमंतकीयांच्या रोषास कारण ठरले आहेत. गोव्यात येऊन एनजीओंवर कडवट टीका केल्याने प्रथम केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल हे गोव्यातील विविध घटकांच्या टीकेचे कारण ठरले आणि आता म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरुद्ध गोमंतकीयांचा रोष उफाळून आला आहे. जावडेकर यांच्यावर तर गोवा सरकारही नाराज झाले. परिणामी जावडेकर यांना चोवीस तासांच्या आत त्यांचे एक ट्वीट डिलिट करावे लागले.

पाच-सहा वर्षापूर्वी गोव्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या विषयावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यातील विरोधी पक्षांच्या टीकेचे धनी बनले होते. गडकरी यांच्याविरोधातील टीकेची धार नंतर कमी झाली. गेल्याच आठवडय़ात केंद्रीय मंत्री गोयल हे गोव्यात आले होते. त्यांनी व्हायब्रंट गोवा या उद्योजकांच्या परिषदेत बोलताना गोव्यातील एनजीओंवर टीका केली. गोव्यात कोणताही प्रकल्प केंद्र सरकार आणू पाहते तेव्हा एनजीओ अडथळे निर्माण करतात, असा आक्षेप गोयल यांनी घेतला होता. मोपा विमानतळाचे काम बंद पडल्याचा संदर्भ गोयल यांनी देत एनजीओंविरुद्ध गोमंतकीयांनी उठाव करावा, असे आवाहन केले होते. लगेच एनजीओंनी गोयल यांच्या या विधानाचा निषेध केला. गोयल यांचे विधान लोकशाहीविरोधी व पर्यावरणविरोधी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी करून गोयल यांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला होता.

बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी गोव्यात खळबळ उडवून दिली. गेली अनेक वर्षे म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवू नये म्हणून गोवा सरकार कायद्याची लढाई लढत आहे. म्हादईच्या काठावरील कर्नाटकच्या कळसा भंडुरी पाणी पुरवठा प्रकल्पाला केंद्राने मान्यता देऊ नये अशी विनंती गोवा सरकार सातत्याने करत आले. मात्र त्याची पर्वा न करता जावडेकर यांनी या प्रकल्पाला पर्यावरणीय दाखला देण्यात आल्याचे जाहीर केले व यामुळे खळबळ उडाली. कर्नाटकचे नेते तथा केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत लगेच जावडेकर यांचे आभारही मानले. जावडेकर यांच्या भूमिकेवर गोव्यातून जोरदार टीका सुरू झाली. केंद्राने गोव्याचा विश्वासघात केला अशी टीका विरोधी पक्षांनी केली. म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही टीका केली. कामत यांनी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवा, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली. सावंत यांनी रात्री उशिरा आपली भूमिका मांडली. पर्यावरणीय दाखला देण्यात आल्याचे अधिकृतरित्या कुणीही आम्हाला कळविलेले नाही, जर दाखला दिलाच तर त्यास कायदेशीर आव्हान दिले जाईल, म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड केली जाणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी मांडली. याच कालावधीत जावडेकर यांच्या ट्विट वरून कळसा भंडुरी प्रकल्पाविषयीचे त्यांचे ट्विट गायब झाले. ते रद्द केले गेले. मात्र म्हादईप्रश्नी पर्यावरण मंत्रालयावरील गोमंतकीयांचा विश्वास उडाला आहे. 

टॅग्स :goaगोवाpiyush goyalपीयुष गोयलBJPभाजपा