शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

उद्यापासून कळंगुट पंचायतीची भटक्या गुरांविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:44 IST

राज्यातील पर्यटन हंगाम दारावर असताना कळंगुट पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

म्हापसा : राज्यातील पर्यटन हंगाम दारावर असताना कळंगुट पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी डिचोली तालुक्यातील मये-सिकेरी येथील गोमंतक गोसेवा महासंघाची नेमणूक केली आहे. तसा करार महासंघासोबत पंचायतीने केला आहे. २ ऑक्टोबरपासून मोहीम सुरू केली जाणार असून, कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पंचायतीने दिला आहे.  जवळ आलेल्या पर्यटन हंगामापूर्वी सदरची मोहीम हातात घेण्यात आल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली. भटक्या गुरांमुळे पंचायत क्षेत्रातील लोकांना तसेच येणा-या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. त्या प्रकारच्या अनेक तक्रारी पंचायतीजवळ दाखल करण्यात आलेल्या असे मार्टिन्स म्हणाले. येणा-या पर्यटकांना कळंगुट परिसरात चांगले वातावरण उपलब्ध व्हावे या दृष्टीने हे पावूल उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगतले.कळंगुट पंचायतीने महासंघासोबत केलेल्या करारानुसार पंचायत क्षेत्रातील भटक्या गुरांवर महासंघाच्या वतिने कारवाई केली जाईल. तेथून ती नंतर थेट गोशाळेत पालक पोषणासाठी ठेवली जाणार आहे. केलेल्या कराराची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून केली जाणार आहे. त्यामुळे गुरांच्या मालकांनी आपली गुरे रस्त्यावर भटकण्यासाठी सोडू नये अशी विनंती पंचायतीकडून गुरांच्या मालकांना करण्यात आली आहे. गोशाळेत ठेवलेल्या गुरांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार आहे. त्यांना तेथे खाद्य पुरवले जाणार असून गरज भासल्यास आवश्यक अशा इतर सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या जातील. बहुतेक गुरे रस्त्याबरोबर किनाºयावर तसेच शेतात सुद्धा आढळून आली आहे. पंचायत क्षेत्रात वाढत जाणाºया या भटक्या गुरांमुळे अपघातात वाढ झाली असून रस्त्यावर सांडलेल्या शेणामुळे वाहने घसरण्याचे प्रकारही घडले आहेत. सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत क्षेत्रातील तसेच शेजारील भागातील गुरांच्या मालकांनी आपल्या गुरांची योग्य काळजी घ्यावी. गुरे रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.कारवाई केलेल्या गुरावर मालकी हक्क सांगण्यासाठी एखाद्या व्यक्ती पुढे आल्यास त्याला कारवाई केलेली गुरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पंचायतीजवळ अर्ज सादर करावा लागेल. संबंधी गुरे त्याच्याच मालकीची असल्याचे त्याला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. तसा पुरावा पंचायतीजवळ सादर करावा लागणार आहे. केलेला अर्ज पशु संवर्धन खात्याच्या संचालकाजवळ त्याचे मत आजमावण्यासाठी पाठवला जाणार आहे. त्यांनी सदर मालकास मान्यता दिली तर ताब्यात घेतलेली गुरे मालकाला सुपूर्द केली जाणार आहे. संबंधीत गुरे मालकाच्या ताब्यात देण्यापूर्वी लागू केलेला दंड जमा करून नंतरच ती ताब्यात दिली जाणार आहेत. ७ दिवसाच्या आत दावा केल्यास ३ हजार रुपये तर १५ दिवसाच्या आत दावा केल्यास ५ हजार रुपये दंडाच्या रुपात जमा करावे लागणार आहे. ताब्यात घेतलेल्या गुरावर १५ दिवसांच्या आत मालकी हक्क सांगणारा दावा न केल्यास गोशाळेला गुरांचा लिलाव करून ती विकण्यासाठीची मुभा गोवा भटकी गुरे व्यवस्थापन योजना २०१३ खाली परवानगी दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीजवळ दोनपेक्षा जास्त गुरे असेल अशा लोकांनाच ती विकण्याची परवानगी दिली जाणार आहे.