शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

उद्यापासून कळंगुट पंचायतीची भटक्या गुरांविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:44 IST

राज्यातील पर्यटन हंगाम दारावर असताना कळंगुट पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

म्हापसा : राज्यातील पर्यटन हंगाम दारावर असताना कळंगुट पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी डिचोली तालुक्यातील मये-सिकेरी येथील गोमंतक गोसेवा महासंघाची नेमणूक केली आहे. तसा करार महासंघासोबत पंचायतीने केला आहे. २ ऑक्टोबरपासून मोहीम सुरू केली जाणार असून, कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पंचायतीने दिला आहे.  जवळ आलेल्या पर्यटन हंगामापूर्वी सदरची मोहीम हातात घेण्यात आल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली. भटक्या गुरांमुळे पंचायत क्षेत्रातील लोकांना तसेच येणा-या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. त्या प्रकारच्या अनेक तक्रारी पंचायतीजवळ दाखल करण्यात आलेल्या असे मार्टिन्स म्हणाले. येणा-या पर्यटकांना कळंगुट परिसरात चांगले वातावरण उपलब्ध व्हावे या दृष्टीने हे पावूल उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगतले.कळंगुट पंचायतीने महासंघासोबत केलेल्या करारानुसार पंचायत क्षेत्रातील भटक्या गुरांवर महासंघाच्या वतिने कारवाई केली जाईल. तेथून ती नंतर थेट गोशाळेत पालक पोषणासाठी ठेवली जाणार आहे. केलेल्या कराराची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून केली जाणार आहे. त्यामुळे गुरांच्या मालकांनी आपली गुरे रस्त्यावर भटकण्यासाठी सोडू नये अशी विनंती पंचायतीकडून गुरांच्या मालकांना करण्यात आली आहे. गोशाळेत ठेवलेल्या गुरांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार आहे. त्यांना तेथे खाद्य पुरवले जाणार असून गरज भासल्यास आवश्यक अशा इतर सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या जातील. बहुतेक गुरे रस्त्याबरोबर किनाºयावर तसेच शेतात सुद्धा आढळून आली आहे. पंचायत क्षेत्रात वाढत जाणाºया या भटक्या गुरांमुळे अपघातात वाढ झाली असून रस्त्यावर सांडलेल्या शेणामुळे वाहने घसरण्याचे प्रकारही घडले आहेत. सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत क्षेत्रातील तसेच शेजारील भागातील गुरांच्या मालकांनी आपल्या गुरांची योग्य काळजी घ्यावी. गुरे रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.कारवाई केलेल्या गुरावर मालकी हक्क सांगण्यासाठी एखाद्या व्यक्ती पुढे आल्यास त्याला कारवाई केलेली गुरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पंचायतीजवळ अर्ज सादर करावा लागेल. संबंधी गुरे त्याच्याच मालकीची असल्याचे त्याला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. तसा पुरावा पंचायतीजवळ सादर करावा लागणार आहे. केलेला अर्ज पशु संवर्धन खात्याच्या संचालकाजवळ त्याचे मत आजमावण्यासाठी पाठवला जाणार आहे. त्यांनी सदर मालकास मान्यता दिली तर ताब्यात घेतलेली गुरे मालकाला सुपूर्द केली जाणार आहे. संबंधीत गुरे मालकाच्या ताब्यात देण्यापूर्वी लागू केलेला दंड जमा करून नंतरच ती ताब्यात दिली जाणार आहेत. ७ दिवसाच्या आत दावा केल्यास ३ हजार रुपये तर १५ दिवसाच्या आत दावा केल्यास ५ हजार रुपये दंडाच्या रुपात जमा करावे लागणार आहे. ताब्यात घेतलेल्या गुरावर १५ दिवसांच्या आत मालकी हक्क सांगणारा दावा न केल्यास गोशाळेला गुरांचा लिलाव करून ती विकण्यासाठीची मुभा गोवा भटकी गुरे व्यवस्थापन योजना २०१३ खाली परवानगी दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीजवळ दोनपेक्षा जास्त गुरे असेल अशा लोकांनाच ती विकण्याची परवानगी दिली जाणार आहे.