शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:17 PM

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत.

पणजी - 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत. यापुढे लोकसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिलिंद नाईक यांना मंत्रिपद देणे व सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून फोडून स्वत:कडे वळविणे हा याच योजनेचा भाग आहे, असे मानले जात आहे. मात्र आयाराम-गयाराम राजकारण हे अशाच मतदारांमधील अनेकांना मान्य नाही व भाजपाचेही माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री त्यावर टीका करत असल्याने भाजपासाठी वाट निसरडी बनली आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने भंडारी समाजातील एकूण 10 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नऊजण पराभूत झाले. या उलट काँग्रेसच्या तिकीटावर बहुजन समाजातील जास्त उमेदवार निवडून आले. एसटी समाजातील जास्त नेते भाजपकडे नसले तरी, अनुसूचित जमातीतील (एसटी) मतदारांना भाजपाने गृहित धरलेले आहे. एसटींची लोकसंख्या गोव्यात 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भंडारी समाजातील अधिकाधिक मते स्वत:कडे वळली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवेळी धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना भाजपाला आहे. अगोदरच खनिज खाणी बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेला सांगे, डिचोली, सत्तरी, केपे या चार तालुक्यांमधील हिंदू बहुजन समाजत अस्वस्थ आहे. खाण बंदीबाबत बरेच लोक मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही अप्रत्यक्षरित्या दोष देत आहेत. भाजपाने प्रथम मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिले व आता भंडारी समाजातीलच सुभाष शिरोडकर सोपटे यांना आपल्याबाजूने घेऊन भाजपाने शिरोडा व मांद्रे मतदारसंघातील बहुजन व्होट बँकेवर दावा सांगितला आहे. मात्र काँग्रेसचे दोन आमदार फोडणे व त्यांना भाजपामध्ये प्रवेश देणे हे लोकांच्या पचनी पडलेले नाही. जे कट्टर भाजपा समर्थक आहेत, त्यांच्याकडूनच या फुटीचे समर्थन केले जात आहे.  खुद्द ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नव्या फुटीच्या विषयावरून भाजपाच्या नेतृत्वावर टीका केली आहे तर माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी फुटीच्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश चोडणकर हे भंडारी समाजातीलच नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक आपल्याकडे ओढण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालविले आहेत. श्रीपाद नाईक यांना आता पक्षात थोडे तरी महत्त्व दिले जात आहे. मात्र भाजपा स्वत:च्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होईल काय हे आगामी काळातच कळून येईल. श्रीपाद नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली तर, भाजपाला ते जास्त उपयुक्त ठरेल अशी भाषा पक्षातील एक गट करत आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर