शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:34 IST

चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगोपसोबत युती कायम ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पक्षाचे संघटन मजबूत करणे ही असून सर्व चाळीसही मतदारसंघात आम्ही भाजप मजबूत करणार आहोत, असे दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. विधानसभा निवडणुकीला आता केवळ २० महिने बाकी आहेत. आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये आमचे काम चालू केले आहे. चाळीसही मतदारसंघात आमच्या मंडळ समित्या स्थापन झालेल्या आहेत. आतापर्यंत कळंगुट, मांद्रे, डिचोली, प्रियोळ, वास्को, दाबोळी, कुडचडे व सांगे अशा आठ मतदारसंघांमध्ये मेळावे झालेले आहेत. आज, बुधवारी साळगाव व पर्वरी येथे, ३ रोजी, पर्ये व वाळपई येथे, ४ रोजी साखळी व ५ रोजी काणकोण व केपे येथे कार्यकर्ता मेळावे होतील, असेही नाईक म्हणाले. ८ व ९ रोजी ज्यांनी पन्नासहून अधिक सदस्य बनवले आहेत त्या सक्रिय कार्यकर्त्यांचे अनुक्रमे दक्षिण व उत्तर गोव्यात मेळावे घेतले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या स्थापनादिनापासून म्हणजेच येत्या ६ तारीखपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा, असे आवाहन करुन २०२७ च्या निवडणुकीत भाजपला २७पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात यादृष्टिने काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आगामी काळातील निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. एकत्र येत सर्वांनी पक्षासाठी काम करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

श्रेष्ठींना आम्ही आमचे म्हणणे लिहून दिलेय

मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, पक्षाच्या व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही करणे आवश्यक आहे, असे पक्षाला वाटते ते सर्व मी श्रेष्ठींना लिहून दिलेले आहे. या विषयावर श्रेष्ठी मला व मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा बोलावतील.

राजभाषेचा विषय कधीच संपला आहे...

कोअर कमिटीच्या बैठकीत मराठी राजभाषेचा विषय उपस्थित झाला. त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, राजभाषेचा विषय कधीच संपलेला आहे. त्याकाळी 'म्हालगड्यांनी' हा प्रश्न निकालात काढलेला आहे. त्यावर मला आणखी भाष्य करायचे नाहीय. दरम्यान, मगोविरोधात यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर ढवळीकर बंधूंनी थेट दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, आमच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मी कोणालाही अडवू शकत नाही. आमचे सरकार स्थिर असून हा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. अशा गोष्टी सहज होऊ शकत नाहीत. त्यासाठी आधी सर्वेक्षण असते. स्थानिक पातळीवर बैठका होतात. त्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत