शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:34 IST

चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगोपसोबत युती कायम ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पक्षाचे संघटन मजबूत करणे ही असून सर्व चाळीसही मतदारसंघात आम्ही भाजप मजबूत करणार आहोत, असे दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. विधानसभा निवडणुकीला आता केवळ २० महिने बाकी आहेत. आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये आमचे काम चालू केले आहे. चाळीसही मतदारसंघात आमच्या मंडळ समित्या स्थापन झालेल्या आहेत. आतापर्यंत कळंगुट, मांद्रे, डिचोली, प्रियोळ, वास्को, दाबोळी, कुडचडे व सांगे अशा आठ मतदारसंघांमध्ये मेळावे झालेले आहेत. आज, बुधवारी साळगाव व पर्वरी येथे, ३ रोजी, पर्ये व वाळपई येथे, ४ रोजी साखळी व ५ रोजी काणकोण व केपे येथे कार्यकर्ता मेळावे होतील, असेही नाईक म्हणाले. ८ व ९ रोजी ज्यांनी पन्नासहून अधिक सदस्य बनवले आहेत त्या सक्रिय कार्यकर्त्यांचे अनुक्रमे दक्षिण व उत्तर गोव्यात मेळावे घेतले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या स्थापनादिनापासून म्हणजेच येत्या ६ तारीखपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा, असे आवाहन करुन २०२७ च्या निवडणुकीत भाजपला २७पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात यादृष्टिने काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आगामी काळातील निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. एकत्र येत सर्वांनी पक्षासाठी काम करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

श्रेष्ठींना आम्ही आमचे म्हणणे लिहून दिलेय

मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, पक्षाच्या व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही करणे आवश्यक आहे, असे पक्षाला वाटते ते सर्व मी श्रेष्ठींना लिहून दिलेले आहे. या विषयावर श्रेष्ठी मला व मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा बोलावतील.

राजभाषेचा विषय कधीच संपला आहे...

कोअर कमिटीच्या बैठकीत मराठी राजभाषेचा विषय उपस्थित झाला. त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, राजभाषेचा विषय कधीच संपलेला आहे. त्याकाळी 'म्हालगड्यांनी' हा प्रश्न निकालात काढलेला आहे. त्यावर मला आणखी भाष्य करायचे नाहीय. दरम्यान, मगोविरोधात यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर ढवळीकर बंधूंनी थेट दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, आमच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मी कोणालाही अडवू शकत नाही. आमचे सरकार स्थिर असून हा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. अशा गोष्टी सहज होऊ शकत नाहीत. त्यासाठी आधी सर्वेक्षण असते. स्थानिक पातळीवर बैठका होतात. त्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत