शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:34 IST

चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगोपसोबत युती कायम ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पक्षाचे संघटन मजबूत करणे ही असून सर्व चाळीसही मतदारसंघात आम्ही भाजप मजबूत करणार आहोत, असे दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. विधानसभा निवडणुकीला आता केवळ २० महिने बाकी आहेत. आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये आमचे काम चालू केले आहे. चाळीसही मतदारसंघात आमच्या मंडळ समित्या स्थापन झालेल्या आहेत. आतापर्यंत कळंगुट, मांद्रे, डिचोली, प्रियोळ, वास्को, दाबोळी, कुडचडे व सांगे अशा आठ मतदारसंघांमध्ये मेळावे झालेले आहेत. आज, बुधवारी साळगाव व पर्वरी येथे, ३ रोजी, पर्ये व वाळपई येथे, ४ रोजी साखळी व ५ रोजी काणकोण व केपे येथे कार्यकर्ता मेळावे होतील, असेही नाईक म्हणाले. ८ व ९ रोजी ज्यांनी पन्नासहून अधिक सदस्य बनवले आहेत त्या सक्रिय कार्यकर्त्यांचे अनुक्रमे दक्षिण व उत्तर गोव्यात मेळावे घेतले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या स्थापनादिनापासून म्हणजेच येत्या ६ तारीखपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा, असे आवाहन करुन २०२७ च्या निवडणुकीत भाजपला २७पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात यादृष्टिने काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आगामी काळातील निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. एकत्र येत सर्वांनी पक्षासाठी काम करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

श्रेष्ठींना आम्ही आमचे म्हणणे लिहून दिलेय

मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, पक्षाच्या व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही करणे आवश्यक आहे, असे पक्षाला वाटते ते सर्व मी श्रेष्ठींना लिहून दिलेले आहे. या विषयावर श्रेष्ठी मला व मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा बोलावतील.

राजभाषेचा विषय कधीच संपला आहे...

कोअर कमिटीच्या बैठकीत मराठी राजभाषेचा विषय उपस्थित झाला. त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, राजभाषेचा विषय कधीच संपलेला आहे. त्याकाळी 'म्हालगड्यांनी' हा प्रश्न निकालात काढलेला आहे. त्यावर मला आणखी भाष्य करायचे नाहीय. दरम्यान, मगोविरोधात यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर ढवळीकर बंधूंनी थेट दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, आमच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मी कोणालाही अडवू शकत नाही. आमचे सरकार स्थिर असून हा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. अशा गोष्टी सहज होऊ शकत नाहीत. त्यासाठी आधी सर्वेक्षण असते. स्थानिक पातळीवर बैठका होतात. त्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत