शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम; विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आंबेडकर भवनावरून भाजप सरकार राजकारण करत असून, गेली अनेक वर्षे आंबेडकर भवन बांधण्याचे आश्वासन देत आहे. या भाजप सरकारकडून दलितांची फसवणूक केली जात आहे. भाजपकडून दलितांचा मतासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४व्या जयंतीनिमित्त पणजीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसच्यागोवा प्रभारी अंजली निंबाळकर, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस, आमदार कार्ल्स फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे हिंदुत्व खोटे : अंजली निंबाळकर

काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर म्हणाल्या, भाजप प्रत्येक वेळी खोटे हिंदुत्व पसरवत देशभर मते मिळवत आहे. लोकांमध्ये, जाती धर्मामध्ये फूट घालत आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा ते योग्य वापर करत नाहीत. बाबासाहेबांनी दलित समाज पुढे यावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्य केले होते; पण भाजपने दलितांच्या विकासाचा कधी विचार केला नाही.

भीतीचे वातावरण : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर केला आहे. आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला होता; पण आता भाजप सरकारकडून देशभर जात, धर्म, भाषा याच्यावर लोकांना वेगळे केले जात आहे. भाजपने जातीवर राजकारण करून लोकांना नाहक त्रास दिला आहे. दलितांवर या भाजप सरकारने अन्याय केला आहे. भाजप सरकारने हुकूमशाही राबविली आहे. जे कोण सरकारविरोधात बोलतात त्यांना कायद्याची भीती दाखविली जाते. त्यामुळे आज कोणीच सरकार विरोधात बोलायला जात नाही. अल्पसंख्याक लोकांमध्ये या भाजप सरकारने देशभर भीतीची वातावरण तयार केले आहे.

भाजपकडून दलितांची फसवणूक : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने दलितांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेली ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहेत; पण सरकारला आंबेडकर भवन बांधता आले नाही. ते नुसती आश्वासने देत आहेत. आताही त्यांनी सहा महिन्यांत पायाभरणी करणार, असे म्हणत लोकांची दिशाभूल केली आहे. भाजप बाबासाहेबांचे विचार, संविधान हे मानत नाही. सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी कामे केली. सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्हाला हवे. 

टॅग्स :goaगोवाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीcongressकाँग्रेस