शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम; विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आंबेडकर भवनावरून भाजप सरकार राजकारण करत असून, गेली अनेक वर्षे आंबेडकर भवन बांधण्याचे आश्वासन देत आहे. या भाजप सरकारकडून दलितांची फसवणूक केली जात आहे. भाजपकडून दलितांचा मतासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४व्या जयंतीनिमित्त पणजीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसच्यागोवा प्रभारी अंजली निंबाळकर, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस, आमदार कार्ल्स फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे हिंदुत्व खोटे : अंजली निंबाळकर

काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर म्हणाल्या, भाजप प्रत्येक वेळी खोटे हिंदुत्व पसरवत देशभर मते मिळवत आहे. लोकांमध्ये, जाती धर्मामध्ये फूट घालत आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा ते योग्य वापर करत नाहीत. बाबासाहेबांनी दलित समाज पुढे यावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्य केले होते; पण भाजपने दलितांच्या विकासाचा कधी विचार केला नाही.

भीतीचे वातावरण : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर केला आहे. आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला होता; पण आता भाजप सरकारकडून देशभर जात, धर्म, भाषा याच्यावर लोकांना वेगळे केले जात आहे. भाजपने जातीवर राजकारण करून लोकांना नाहक त्रास दिला आहे. दलितांवर या भाजप सरकारने अन्याय केला आहे. भाजप सरकारने हुकूमशाही राबविली आहे. जे कोण सरकारविरोधात बोलतात त्यांना कायद्याची भीती दाखविली जाते. त्यामुळे आज कोणीच सरकार विरोधात बोलायला जात नाही. अल्पसंख्याक लोकांमध्ये या भाजप सरकारने देशभर भीतीची वातावरण तयार केले आहे.

भाजपकडून दलितांची फसवणूक : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने दलितांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेली ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहेत; पण सरकारला आंबेडकर भवन बांधता आले नाही. ते नुसती आश्वासने देत आहेत. आताही त्यांनी सहा महिन्यांत पायाभरणी करणार, असे म्हणत लोकांची दिशाभूल केली आहे. भाजप बाबासाहेबांचे विचार, संविधान हे मानत नाही. सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी कामे केली. सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्हाला हवे. 

टॅग्स :goaगोवाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीcongressकाँग्रेस