शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम; विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आंबेडकर भवनावरून भाजप सरकार राजकारण करत असून, गेली अनेक वर्षे आंबेडकर भवन बांधण्याचे आश्वासन देत आहे. या भाजप सरकारकडून दलितांची फसवणूक केली जात आहे. भाजपकडून दलितांचा मतासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४व्या जयंतीनिमित्त पणजीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसच्यागोवा प्रभारी अंजली निंबाळकर, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नाडिस, आमदार कार्ल्स फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे हिंदुत्व खोटे : अंजली निंबाळकर

काँग्रेसच्या गोवा प्रभारी अंजली निंबाळकर म्हणाल्या, भाजप प्रत्येक वेळी खोटे हिंदुत्व पसरवत देशभर मते मिळवत आहे. लोकांमध्ये, जाती धर्मामध्ये फूट घालत आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा ते योग्य वापर करत नाहीत. बाबासाहेबांनी दलित समाज पुढे यावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्य केले होते; पण भाजपने दलितांच्या विकासाचा कधी विचार केला नाही.

भीतीचे वातावरण : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अनादर केला आहे. आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला होता; पण आता भाजप सरकारकडून देशभर जात, धर्म, भाषा याच्यावर लोकांना वेगळे केले जात आहे. भाजपने जातीवर राजकारण करून लोकांना नाहक त्रास दिला आहे. दलितांवर या भाजप सरकारने अन्याय केला आहे. भाजप सरकारने हुकूमशाही राबविली आहे. जे कोण सरकारविरोधात बोलतात त्यांना कायद्याची भीती दाखविली जाते. त्यामुळे आज कोणीच सरकार विरोधात बोलायला जात नाही. अल्पसंख्याक लोकांमध्ये या भाजप सरकारने देशभर भीतीची वातावरण तयार केले आहे.

भाजपकडून दलितांची फसवणूक : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने दलितांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेली ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहेत; पण सरकारला आंबेडकर भवन बांधता आले नाही. ते नुसती आश्वासने देत आहेत. आताही त्यांनी सहा महिन्यांत पायाभरणी करणार, असे म्हणत लोकांची दिशाभूल केली आहे. भाजप बाबासाहेबांचे विचार, संविधान हे मानत नाही. सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी कामे केली. सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्हाला हवे. 

टॅग्स :goaगोवाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीcongressकाँग्रेस