शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपला नाही-यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:04 IST

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष चालला आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे.

पणजी : गेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपा नेत्यांना राहिलेले नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष चालला आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे.  दोन दिवसांच्या गोवा दौ-यावर आले असता दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये काही निवडक निमंत्रितांनी त्यांच्याशी संवाद साधला. सिन्हा एका प्रश्नावर म्हणाले की, ‘माझ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मुद्दा नाही. तर त्यांचे विचार आणि ध्येयधोरणांना माझा विरोध आहे. देशात जे काही चालले आहे ते पाहता लोकशाहीच्या संवर्धनासाठी पर्यायी अजेंड्याची गरज आहे. आज जिकडे तिकडे मोदी यांचाच जयघोष चालला आहे. भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी लोकांना जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली आहे किंवा नाही हे पाहण्याचे कोणालाही भान नाही.’

‘पुत्राला भाजपाने तिकीट दिली तरी काम करणार नाही’

आगामी लोकसभा निवडणुकीत हजारीबाग मतदारसंघात भाजपाने पुत्र जयंत सिन्हा यांना तिकीट दिली तरी त्याच्यासाठी काम करणार नाही, असे स्पष्ट उत्तर सिन्हा यांनी एका प्रश्नावर दिले. जयंत सिन्हा हे केंद्रात हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बंडखोर पित्याचे मत जाणून घेण्यात आले. आगामी निवडणुकीत हजारीबाग मतदारसंघात तुमच्या पुत्राला भाजपाने तिकीट दिली तर त्याच्यासाठी काम करणार काय, या खोचक प्रश्नावर सिन्हा यांनी तात्काळ ‘मुळीच नाही’, असे उत्तर दिले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सत्ताधारी सरकारकडून गोलमाल केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करुन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपत्रिकांचाच वापर व्हावा यासाठी चळवळ उभारा, असे आवाहन सिन्हा यांनी केले. निवडणूक आयोग स्वत:च किती इव्हीएम आहेत आणि त्यांची निर्मिती कुठे होते याबाबत अंधारात असून कोणताही हिशोब आयोगाकडे नसल्याचा ठाम दावाही सिन्हा यांनी  केला. 

जीना यांची तसबीर का काढावी? 

अलिगड मुस्लिम विद्यापीठात असलेली मोहम्मद अली जीना यांची तसबीर काढून टाकण्याची मागणी करणा-यांवर सिन्हा यांनी तोफा डागल्या. ते म्हणाले की, इतकी वर्षे ही तसबीर या ठिकाणी आहे ती का म्हणून काढावी. या देशात खरे तर अल्पसंख्यांकांनी असुरक्षिततेची भीती व्यक्त केली तर तर एकवेळ समजता येण्यासारखे आहे. परंतु बहुसंख्य असलेला समाज अशा मागण्या करुन लागला आहे ही धोकादायक बाब आहे. १५ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत हिंदूना कोणी संरक्षण दिले? गोव्यात पोर्तुगीजांनी मंदिरांच्याबाबतीत आगळीक केली तेव्हा कोण उभे राहिले? असे सवाल त्यांनी के ले. असहिष्णूतेच्या बाबतीत त्यानी कडक ताशेरे ओढले. 

खोचक प्रश्नाला असे उत्तर!

दरम्यान, बुद्धीभेदासाठी तुम्हाला भाजपानेच कशावरुन पेरले नसावे या अत्यंत खोचक प्रश्नावर सिन्हा म्हणाले की, ‘विश्वास दाखवा आणि नंतर तपासून घ्या किंवा आधी तपासून घ्या आणि नंतरच विश्वास दाखवा’, अशा दोन गोष्टी करता येतील. पण एक लक्षात ठेवा की, आजही लोकांचा आदर्श महात्मा गांधी हेच आहेत. हिटलर नव्हे!’ त्यांचा हा अप्रत्यक्ष टोला मोदी यांच्यासाठीच होता. लोकशक्तीवर विश्वास ठेवा, आज आमची संख्या भली कमी असेल परंतु एक दिवस ती निश्चितच वाढेल.’

'चळवळ उभारा, आम्ही पाठीशी राहू’

गोव्यात विकासाच्या नियोजनाच्या बाबतीत जे भयंकर गैरव्यवहार चालले आहेत ते पाहता एक दिवस गोमतंकीयांना हातात बंदुका घेऊनच रस्त्यावर उतरावे लागेल, असे मत एका उपस्थिताने व्यक्त केले असता हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत. ‘तुम्ही चळवळ उभारा आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

‘आप’चे नेते एल्विस गोम्स, ‘सिटीझन फॉर डेमोक्रेसी’ संघटनेचे निमंत्रक मनोज कामत यावेळी व्यासपीठावर होते. उपस्थितांमध्ये आमदार नीळकंठ हळर्णकर, भाभासुमंचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचा समावेश होता. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपा