शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्षही ठरेल पक्षनिष्ठेच्या कसोटीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2024 12:40 IST

परुळेकर, मांद्रेकरांचा पक्षाच्या नव्या धोरणाला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी येत्या जानेवारीत निवडणूक प्रक्रिया होणार आहे. भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष तसेच सरचिटणीस हे पक्षनीष्ठांपैकीच असावे असे नवे धोरण भाजपने स्वीकारले आहे. या धोरणाचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर आदींनी जोरदार स्वागत केले आहे. नवा प्रदेशाध्यक्ष देखील पक्षनीष्ठांपैकीच असावा व पक्षनीष्ठेचीच पूर्णपणे कदर केली जावी अशी भूमिका परुळेकर, मांद्रेकर आदींनी घेतली आहे.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांनिमित्त प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. भाजप प्रभारी आशिष सूद हेही गोव्यात आले आहेत. बूथ समित्या निवडण्याचे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण होईल. नंतर मंडल समित्या व जिल्हा समित्या निवडल्या जातील. नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड जानेवारीच्या पूर्वाधात होऊ शकते. पदासाठी माजी मंत्री दिलीप परुळेकर व दयानंद मांद्रेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, दामू नाईक, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर शर्यतीत आहेत.

पक्षाचे धोरण योग्य : दयानंद मांद्रेकर

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पक्षाशी एकनिष्ठ व्यक्तीलाच प्रदेशाध्यक्षपद देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला असेल तर त्याचे स्वागतच स्वा आहे. मीच एकमेव पक्षाशी सुरवातीपासून एकनिष्ठ आहे. चारवेळा आमदार म्हणून निवडून आलो. मंत्री म्हणूनही काम केले आहे. माझ्याकडे अनुभव आहे. पक्ष नेतृत्त्वाने संधी दिली तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा मी निश्चीतच स्वीकारीन. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, तेव्हा पर्रीकरांनी १४ पूल बांधले. दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी योजना आमच्याच काळात सुरू झाल्या.

पक्षनिष्ठेची कदर करावीच : परुळेकर

दरम्यान, माजी मंत्री दिलीप परुळेकर म्हणाले की पक्षाच्या नव्या धोरणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी धोरणाचे स्वागत करतो. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जे कुणी पक्षनीष्ठ आहेत, त्यांना मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस अशी महत्त्वाची पदे मिळायलाच हवी. नवा प्रदेशाध्यक्ष देखील निवडताना पक्षनीष्ठा हाच मुख्य निकष असावा. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सतत केले की त्यांना महत्त्वाचे पद मिळते हे दाखवून देण्यास ही संधी आहे. एखादा नेता पक्ष सोडून गेला म्हणून त्याच्यासोबत मंडळ अध्यक्ष किंवा सरचिटणीस किंवा इतर कार्यकर्त्यांनी जाऊ नये. यासाठी नवे धोरण हे पूर्णपणे हिताचे आहे. पक्षनीष्ठेची कदर भाजपमध्ये होते असा मला विश्वास आहेच.

संघटनेमध्ये एकनिष्ठेच्या बाबतीत तडजोड नाहीच : महानंद अस्नोडकर

भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'जी तत्त्वे घेऊन पक्ष पुढे आलेला आहे, त्या तत्त्वांचे पालन व्हायलाच हवे. एकवेळ सरकार स्थापनेच्या बाबतीत मध्यंतरी काही तडजोडी झाल्या असतील. परंतु पक्ष संघटनेकडे एकनिष्ठतेबाबतीत कोणत्याही तडजोडी आतापर्यंत पक्षामध्ये झालेल्या नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत.'

पक्षनीष्ठांनाच महत्त्वाच्या पदांवर संधी द्यावी असा निर्णय भाजपने राष्ट्रीय स्तरावर घेतला आहे. पक्षश्रेष्ठींनी मंडल अध्यक्ष, सर- चिटणीसपदी पक्षाकडे एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीचीच निवड करावी, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. हेच धोरण प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतीतही लागू आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी शर्यतीत जे नेते आहेत, त्यापैकी परुळेकर, मांद्रेकर आदींची बाजू भक्कम झाली आहे. अर्थात सावईकर, दामू नाईकही पक्षनीष्ठच आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा