शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

हॅलो, तुम्हाला न्यायालयाचे समन्स आलेय...; असा कॉल आपणासही आला का? वेळीच सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2024 09:00 IST

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, सावधगिरी बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सायबर गुन्हेगारांकडून सर्वत्र सीबीआय व ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात असतानाच आता उच्च न्यायालयाने समन्स जारी केल्याची भीती घालत लोकांच्या लुबाडणुकीचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधला आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या स्तरावर जनजागृती केली जात आहे.

उच्च न्यायालयाच्या नावाने सध्या काहीजणांना बनावट फोन कॉल्स, तसेच ई मेल पाठविले जात आहेत. यात 'अमली पदार्थ, मनी लॉड्रिंग प्रकरणात तुम्ही गुंतल्याचा पुरावा आढळला आहे. त्यासाठी तुमच्या नावे समन्स जारी झाले आहे. हे समन्स तुम्हाला पाठविले आहेत. ते स्वीकारले नाही तर कारवाई करू', असे सांगितले जाते. न्यायालयाकडून आपल्या नावे समन्स आल्याचे समजल्यानंतर लोक निश्चितच घाबरतात. त्यामुळे अशा प्रकरणातून सुटका व्हावी यासाठी काहीजण त्या फोन क्रमांकावर व ई मेलद्वारे पुन्हा या सायबर गुन्हेगारांशी संपर्क साधतात. 

यावेळी सायबर गुन्हेगार त्यांना आपण उच्च न्यायालयातून अधिकारी पदावरील व्यक्ती बोलत असल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत तुमचे बँक खाते गोठविले जाईल. त्यामुळे बँक खात्यातील रक्कम सरकारच्या खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करावी. चौकशी पूर्ण होताच रक्कम परत केली जाईल असे सांगताहेत. या प्रकाराची कोठेही वाच्यता करू नये असेही बजावले जाते. यामुळे लोक घाबरून संबंधित सांगतात त्या बँक खात्यावर पैसे जमा करतात. कालांतराने आपण फसविलो गेल्याचे त्यांना लक्षात येते, असे प्रकार शेजारील राज्यांत काही ठिकाणी घडले आहेत

लोकांनी अशा कुठल्याही सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये, असे आवाहन गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षाने केले आहे. सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन 'हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. '१९३०' या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून नागरिकांनी यासंबंधीची तक्रार करावी, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.

दिवसाला १२ तक्रारी 

सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी स्वीकारण्यासाठी पोलिसांनी १९३० ही हेल्पलाईन, तसेच ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज सरासरी आठ, तर ऑनलाईन पोर्टलवर चार ते पाच तक्रारी सायबर गुन्ह्यांशी संबंधित येतात. राज्यात उच्च न्यायालयाच्या नावाने फ्रॉड होत असल्याची अद्याप आलेली नाही. तरीही लोकांनी सावध राहावे. अशा सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये. - विद्यानंद पवार, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे विभाग

 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी