शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:00 IST

'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : स्मार्ट सिटीची कामे अर्धवट राहिल्याने पावसाळ्यात काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चिंतायुक्त भीती व्यक्त करीत उत्पल पर्रीकर यांनी महापालिकेत व मतदारसंघात सत्ताबदल झाल्याशिवाय राजधानी शहराला चांगले दिवस येणे कठीण असल्याचे भाष्य केले आहे.

'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही. महापालिकेत गेली २० वर्षांपासून फॅमिलीराज चालले आहे. आता तर आमदाराने खुद्द पुत्राला महापौरपदाच्या खुर्चीवर बसवलेय. महापालिकेत सत्ताबदल व्हायला हवा. तसेच आमदारालाही लोकांनी घरी पाठवायला हवे. पणजीवासीयांना मी पर्याय दिला होता, याचीही आठवण पर्रीकर यांनी करून दिली.

एका प्रश्नावर उत्पल म्हणाले की, स्मार्ट सिटीसाठी निधी केंद्र सरकारकडून मिळलेला आहे. कालांतराने मी केंद्राकडे या एकूण प्रकल्पाच्या खर्चाचे ऑडिट जनतेसाठी जाहीर करावे, अशी मागणी करणार आहे.

उत्पल म्हणाले की, आयएएस अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांना स्मार्ट सिटीच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने खास आणलेले आहे. त्यांना काही अवधी द्यावा लागेल. संजित यांनी महापालिका आयुक्त म्हणून पूर्वी काम केले आहे. त्यांना शहराची खडानखडा माहिती असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. शेवटी काही ना काही तोडगा यायला हवा आणि शहरवासीयांना दिलासा मिळायला हवा.

उत्पल म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी या प्रश्नावर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. पावसाळ्यात शहरवासीयांच्या तसेच राजधानीला भेट देणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल, हे मी त्यांना सांगितले आहे.

धोका दूर नाही.....

स्मार्ट सिटीचे ज्या प्रकारचे काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. १५ ट्रक रुतले ही गंभीर बाब आहे. कालांतरानेही शहरात अशा दुर्घटना घडू शकतात. येत्या पावसाळ्यात पणजी बुडणार की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल. त्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही; परंतु, अर्धवट राहिलेली कामे पाहता हा धोका दूर नाही. पाऊस नसताना रस्ते खचले मग पावसाळ्यात काय संकट ओढवेल, याचा विचारच न केलेला बरा, अशी भीती पर्रीकर यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर