शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

साहेबांची मर्जी राखण्यासाठी कायद्याचा बळी नको

By वासुदेव.पागी | Updated: July 5, 2024 13:19 IST

चारित्र्य मलीन होण्याची जोखीम असलेला दबाव का स्वीकारावा? कारकीर्द कलंकित करणाऱ्या गोष्टी का कराव्यात या अधिकाऱ्यांनी?

वासुदेव पागी, ज्येष्ठ प्रतिनिधी, लोकमत.

एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभावे अशा फिल्मीस्टाईलने आसगावमध्ये भर दिवसा झालेला बाउन्सरचा नंगा नाच हा गोव्याची अब्रू धुळीला मिळवून गेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे बॉस असलेल्या पोलिस प्रमुखावरच या प्रकरणात अंगुलीनिर्देश होत असला तरी वरिष्ठांच्या मर्जीसाठी कायद्याचा खून करणाऱ्या प्रवृत्तीही वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. कारण आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी जेव्हा वर बोट दाखविले गेले, तेव्हा वर आणि खाली एकाचबरोबर साफ करण्याची ही वेळ आहे.

अलीकडे सर्वाधिक गाजलेले गोव्यातील कोणते गाव असेल तर ते आसगाव. राज्यात झालेल्या जमिनी बळकाव प्रकरणाचेही हे गाव केंद्रबिंदू ठरले. त्यानंतर आता बाउन्सरकडून पोलिसांदेखत घर पाडण्याच्या प्रकारामुळे हे गाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत आहे. कुठून तरी बाउन्सर येतात आणि गुंडगिरी करून घर पाडू लागतात आणि पोलिस बघ्याची भूमिका घेतात, असा हा एखाद्या चित्रपटाच्या कथानकाचा भाग शोभावा असे हे दृश्य साक्षरतेच्या बाबतीत अग्रणी असलेल्या गोव्यात घडते हे दुर्दैव आहे.

आता या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे, पण तो केवळ डोळ्यांना तेल लावणारा नसावा, तर सखोल तपास व्हावा, बाउन्सर नावाची गुंडांची प्रजाती आणि त्यांना साथ देणाऱ्या खाकीतील गुंडांच्या कारनाम्याचा पंचनामा झालाच पाहिजे. आज जेव्हा पोलिस प्रमुखच या प्रकरणात अडकले आहेत, तेव्हा महासंचालकापासून संबंधित कॉन्स्टेबलपर्यंतची या प्रकरणातली भूमिका तपासली जावी आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. डीजीपींकडे बोट दाखवून हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी फार मोठा पराक्रम केल्यासारखा त्यांचे कौतुक करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे आज तेच चौकशीच्या घेऱ्यात आले असले तरी केवळ डीजीपींवर खापर फोडून या प्रकरणावर पडदा पाडू दिला जाऊ नये.

पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रानुसार डीजीपी सिंग यांनीच आसगाव प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला होता, हे १०० टक्के सत्य आहे असे आपण तूर्तास मानून चाललो तरी त्यांचा तो कथित बेकायदेशीर आदेश मानणाऱ्या निरीक्षकाला काय म्हणावे? पोलिस सेवेत रुजू होताना कायद्याचे पालन करण्याची शपथ घेतली जाते. वरिष्ठांचे बेकायदेशीर आदेश पाळण्याची शपथ दिली जात नाही. आज डीजीपींच्या बेकायदेशीर आदेशामुळे जर पोलिस घर पाडणाऱ्या गुंडांना अभय देतात, तर उद्या दुसरा कुणी तरी अधिकारी अशाच एका अलिखित बेकायदेशीर आदेशामुळे खून होत असतानाही बघ्याची भूमिका घेईल. पोलिसांनी आपल्या वर्दीशी प्रामाणिक असावे, आपल्याला सोयीची पोस्टिंग देणाऱ्या अधिकाऱ्यांशी नव्हे.

अनेकवेळा ज्येष्ठ मंडळी पोलिस सेवेत खूप तडजोडी कराव्या लागतात, वरून दबाव असतो अशा घासून गुळगुळीत झालेल्या सबबी सांगतात. या सबबी नसून आपला नाकर्तेपणा लपविण्याच्या चोरवाटा असतात. किंबहुना अमुक प्रकरणात अडकवीन आणि तमुक प्रकरणात अडकवीन वगैरे धमक्या अशाच माणसांना देणे सोपे असते, जे अशा प्रकरणात गुंतलेले असतात. कर नसेल त्याला डर नसते असे म्हणतात. असे समजून चला की आपल्या कामाप्रती प्रामाणिक असलेल्या अधिकाऱ्याला अमुक प्रकरणात गुंतविण्याची धमकी कुणी वरिष्ठांनी दिली, तरी त्यामुळे किती प्रमाणात तडजोड करावी यालाही काही तरी मर्यादा असाव्यात.

कितीही दबाव असला तरी स्वतःचे चारित्र्य मलीन होण्याची जोखीम असलेला दबाव का स्वीकारावा माणसांनी? कर्तव्यनिष्ठा वगैरे झाल्या दूरच्या गोष्टी, परंतु स्वतःची कारकीर्द कलंकित करणाऱ्या गोष्टी का कराव्यात या अधिकाऱ्यांनी? पोलिस सेवेत किंवा कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असताना आपल्या प्राथमिकता काय आहेत यावरून त्या अधिकाऱ्याची त्या सेवेतील कारकीर्द ठरत असते, एखादा अधिकारी आपला सेवाकाळ हा किमान निष्कलंक राखण्यासाठी अधिक महत्त्व देत असेल तर तो अशी कृत्ये कधीच करणार नाही. परंतु, आपली अमुक जागी पोस्टिंग हवी, अमुक तमुक प्रकरणे हाताळायला हवीत, अशा प्राथमिकता जर असतील तर अशा अधिकाऱ्यांसाठी दबाव ही केवळ सोयीची पळवाट असते. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस