शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी

By समीर नाईक | Updated: November 23, 2023 16:31 IST

कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते.

पणजी: जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते. अभिनय करताना ज्या वेगवेगळ्या भावनांतून आम्हाला जावे लागते, तेच भावना खऱ्या आयुष्यात नाती सांभाळताना येत असतात. फक्त फरक एवढाच असतो, की खऱ्या जीवनात आमची परिस्थीतीच तशी असते, तर अभिनय करताना मात्र परिस्थीती निर्माण करावी लागतात, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी केले.

कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते. भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी त्यांची मुलाखत घेतली. दरम्यान आपल्या साधेपणा व सोप्या उत्तरांनी पंकज त्रिपाठी यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आयुष्यात जे आपण करतो, तेच अभिनयात केले जाते, असे वाटत असल्याने सर्वांनाच वाटते की मी देखील अभिनेता बनु शकतो, पण सेटवर गेल्यावर स्थिती वेगळीच असते. खऱ्या आयुष्यात त्या भावनेने गोष्टी आपोआप घडून जातात, कारण ती आपली माणसे असतात. त्यामुळे भावना देखील खऱ्या असतात. पण अभिनय क्षेत्रात पुढचा व्यक्ती नावापुर्ती नात्यात असतो, त्यामुळे त्यांच्याकडे ती भावना सहज येत नाही, ती आणावी लागतात. यासाठी अभिनय शिकणे, रस जाणणे गरजेचे बनते, असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.

अभिनय कला फक्त तुम्हाला स्टार करत नाही, तर त्याचा आणखी फायदा आहे की तुम्हाला चांगले नागरिक बनवतात. नम्र, दयाळू, व साधेपणा हे गुण कला आपोआप तुम्हाला देतात. याचे कारण म्हणजे, आम्ही वेगवेगळी पात्रांचे अभिनय करतो, त्यावेळेस त्या पात्राचा संघर्ष, दुख, वाईट काळ याचाही अनुभव आम्हाला येतो. यातून खऱ्या जीवनात देखील समोरच्या व्यक्ती कुठल्या भावनातून जात असते, याचा अंदाज येत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमनीवरच असणे आवश्यक आहे. असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.

ओटीटी काळाची गरज आहे

ओटीटी व्यासपिठ जेव्हा देशात आले तेव्हा मोठमोठ्या अभिनेत्यांना वाटले की हे एकाप्रकारचा टी.व्ही आहे. त्यामुळे त्यांनी याला जास्त प्राधान्य दिले नाही. पण मी साधा कलाकार आहे, मी कुठल्याही भूमिकेला सहसा नाही म्हणत नाही,त्यामुळे ओटीटीला देखील स्विकारले. आज ओटीटीचा बोलबाला आणि मला ओटीटीचा मोठा स्टार मानला जातो. शेवटी कॅमेरा, सेट या पलिकडेही देवाचा मोठा कॅमेरा असतो, जो आम्हाला पाहत असतो. प्रामाणिक काम केले तर तुम्ही केव्हाच अयशस्वी होत नाही, असे त्रिपाठी यांनी ओटीटीबद्दल बोलताना सांगितले.

टॅग्स :Pankaj Tripathiपंकज त्रिपाठीgoaगोवाbollywoodबॉलिवूड