शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
4
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
5
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
7
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
8
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
9
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
10
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
11
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
12
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
13
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
14
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
15
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
16
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
17
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
18
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
19
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
20
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी

By समीर नाईक | Updated: November 23, 2023 16:31 IST

कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते.

पणजी: जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते. अभिनय करताना ज्या वेगवेगळ्या भावनांतून आम्हाला जावे लागते, तेच भावना खऱ्या आयुष्यात नाती सांभाळताना येत असतात. फक्त फरक एवढाच असतो, की खऱ्या जीवनात आमची परिस्थीतीच तशी असते, तर अभिनय करताना मात्र परिस्थीती निर्माण करावी लागतात, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी केले.

कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते. भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी त्यांची मुलाखत घेतली. दरम्यान आपल्या साधेपणा व सोप्या उत्तरांनी पंकज त्रिपाठी यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आयुष्यात जे आपण करतो, तेच अभिनयात केले जाते, असे वाटत असल्याने सर्वांनाच वाटते की मी देखील अभिनेता बनु शकतो, पण सेटवर गेल्यावर स्थिती वेगळीच असते. खऱ्या आयुष्यात त्या भावनेने गोष्टी आपोआप घडून जातात, कारण ती आपली माणसे असतात. त्यामुळे भावना देखील खऱ्या असतात. पण अभिनय क्षेत्रात पुढचा व्यक्ती नावापुर्ती नात्यात असतो, त्यामुळे त्यांच्याकडे ती भावना सहज येत नाही, ती आणावी लागतात. यासाठी अभिनय शिकणे, रस जाणणे गरजेचे बनते, असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.

अभिनय कला फक्त तुम्हाला स्टार करत नाही, तर त्याचा आणखी फायदा आहे की तुम्हाला चांगले नागरिक बनवतात. नम्र, दयाळू, व साधेपणा हे गुण कला आपोआप तुम्हाला देतात. याचे कारण म्हणजे, आम्ही वेगवेगळी पात्रांचे अभिनय करतो, त्यावेळेस त्या पात्राचा संघर्ष, दुख, वाईट काळ याचाही अनुभव आम्हाला येतो. यातून खऱ्या जीवनात देखील समोरच्या व्यक्ती कुठल्या भावनातून जात असते, याचा अंदाज येत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमनीवरच असणे आवश्यक आहे. असे त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.

ओटीटी काळाची गरज आहे

ओटीटी व्यासपिठ जेव्हा देशात आले तेव्हा मोठमोठ्या अभिनेत्यांना वाटले की हे एकाप्रकारचा टी.व्ही आहे. त्यामुळे त्यांनी याला जास्त प्राधान्य दिले नाही. पण मी साधा कलाकार आहे, मी कुठल्याही भूमिकेला सहसा नाही म्हणत नाही,त्यामुळे ओटीटीला देखील स्विकारले. आज ओटीटीचा बोलबाला आणि मला ओटीटीचा मोठा स्टार मानला जातो. शेवटी कॅमेरा, सेट या पलिकडेही देवाचा मोठा कॅमेरा असतो, जो आम्हाला पाहत असतो. प्रामाणिक काम केले तर तुम्ही केव्हाच अयशस्वी होत नाही, असे त्रिपाठी यांनी ओटीटीबद्दल बोलताना सांगितले.

टॅग्स :Pankaj Tripathiपंकज त्रिपाठीgoaगोवाbollywoodबॉलिवूड