शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काजू आधारभूत किंमतीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करणे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 16:22 IST

राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे विभागीय कृषी कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जात आहेत. यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता या आधारभूत किंमतीच्या लाभासाठी अर्ज केले आहेत.

यंदा काजू उत्पादनही कमी त्यात दरही ११२ ते ११५ प्रती किलोपर्यंत मिळाला यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या वर्षी काजू दर प्रती किलो १२५ होता यंदा त्याहूनही कमी मिळाला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना १५० रुपये प्रतिकिलो अशी आधारभूत किंमत मिळाली होती. म्हणजे वरील प्रतिकिलाे २५ रुपये कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिले होते. यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने १८० ते २०० रुपये आधारभूत किंमत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत.

आता मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. काजू हंगाम संपला आहे त्यामुळे अनेक शेतकरी सध्या काजू बियावर आधारभूत किंमतीची वाट पाहत होते. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत कारखानदाराकडून काजू बील घेऊन हे अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. कृषी खात्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना किमान ४०० किलोपर्यंत काजूवर आधारभूत मिळू शकते. गेल्यावर्षीही एवढ्याच किलोवर आधारभूत देण्यात आली होती.

सत्तरीचे शेतकरी रामचंद्र गावकर म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केही काजूचे उत्पादन झाले नाही. गेल्या वर्षी दरही जास्त होता. यंदा दरही कमी आणि त्यात उत्पादनही घटले आहे. त्यामुळे कृषी खात्याने किमान २०० रुपये आधारभूत किंमत देणे गरजेचे आहे. अन्यथा आता काजू शेतीकरणे परवडणार नाही. सरकारने यंदा शेतकऱ्यांची दखल घेऊन आधारभूत किंमतीत वाढ करावी.

कृषी संचालक नेविल अफोन्सो आधारभूत किंमतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज घेणे कृषी खात्याने सुरु केले आहे. यंदा गेल्या वर्षीसारखी १५० रुपये आधारभूत आहे. शेतकऱ्यांकडून १८० ते २०० रुपये मागणी केली जात आहे. पण सध्या आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यावर सरकारकडून याच्यावर योग्य तो प्रस्ताव येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयात आधारभूत किंमतीसाठी अर्ज करावे. सर्व कार्यलयात हे अर्ज उपलब्ध आहे. यासाठी कृषी कार्ड अनिवार्य आहे.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी