शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काजू आधारभूत किंमतीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करणे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 16:22 IST

राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे विभागीय कृषी कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जात आहेत. यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता या आधारभूत किंमतीच्या लाभासाठी अर्ज केले आहेत.

यंदा काजू उत्पादनही कमी त्यात दरही ११२ ते ११५ प्रती किलोपर्यंत मिळाला यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या वर्षी काजू दर प्रती किलो १२५ होता यंदा त्याहूनही कमी मिळाला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना १५० रुपये प्रतिकिलो अशी आधारभूत किंमत मिळाली होती. म्हणजे वरील प्रतिकिलाे २५ रुपये कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिले होते. यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने १८० ते २०० रुपये आधारभूत किंमत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत.

आता मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. काजू हंगाम संपला आहे त्यामुळे अनेक शेतकरी सध्या काजू बियावर आधारभूत किंमतीची वाट पाहत होते. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत कारखानदाराकडून काजू बील घेऊन हे अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. कृषी खात्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना किमान ४०० किलोपर्यंत काजूवर आधारभूत मिळू शकते. गेल्यावर्षीही एवढ्याच किलोवर आधारभूत देण्यात आली होती.

सत्तरीचे शेतकरी रामचंद्र गावकर म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केही काजूचे उत्पादन झाले नाही. गेल्या वर्षी दरही जास्त होता. यंदा दरही कमी आणि त्यात उत्पादनही घटले आहे. त्यामुळे कृषी खात्याने किमान २०० रुपये आधारभूत किंमत देणे गरजेचे आहे. अन्यथा आता काजू शेतीकरणे परवडणार नाही. सरकारने यंदा शेतकऱ्यांची दखल घेऊन आधारभूत किंमतीत वाढ करावी.

कृषी संचालक नेविल अफोन्सो आधारभूत किंमतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज घेणे कृषी खात्याने सुरु केले आहे. यंदा गेल्या वर्षीसारखी १५० रुपये आधारभूत आहे. शेतकऱ्यांकडून १८० ते २०० रुपये मागणी केली जात आहे. पण सध्या आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यावर सरकारकडून याच्यावर योग्य तो प्रस्ताव येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयात आधारभूत किंमतीसाठी अर्ज करावे. सर्व कार्यलयात हे अर्ज उपलब्ध आहे. यासाठी कृषी कार्ड अनिवार्य आहे.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी