शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

काजू आधारभूत किंमतीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करणे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 16:22 IST

राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे विभागीय कृषी कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जात आहेत. यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता या आधारभूत किंमतीच्या लाभासाठी अर्ज केले आहेत.

यंदा काजू उत्पादनही कमी त्यात दरही ११२ ते ११५ प्रती किलोपर्यंत मिळाला यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. गेल्या वर्षी काजू दर प्रती किलो १२५ होता यंदा त्याहूनही कमी मिळाला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना १५० रुपये प्रतिकिलो अशी आधारभूत किंमत मिळाली होती. म्हणजे वरील प्रतिकिलाे २५ रुपये कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिले होते. यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने १८० ते २०० रुपये आधारभूत किंमत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत.

आता मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. काजू हंगाम संपला आहे त्यामुळे अनेक शेतकरी सध्या काजू बियावर आधारभूत किंमतीची वाट पाहत होते. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत कारखानदाराकडून काजू बील घेऊन हे अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. कृषी खात्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना किमान ४०० किलोपर्यंत काजूवर आधारभूत मिळू शकते. गेल्यावर्षीही एवढ्याच किलोवर आधारभूत देण्यात आली होती.

सत्तरीचे शेतकरी रामचंद्र गावकर म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केही काजूचे उत्पादन झाले नाही. गेल्या वर्षी दरही जास्त होता. यंदा दरही कमी आणि त्यात उत्पादनही घटले आहे. त्यामुळे कृषी खात्याने किमान २०० रुपये आधारभूत किंमत देणे गरजेचे आहे. अन्यथा आता काजू शेतीकरणे परवडणार नाही. सरकारने यंदा शेतकऱ्यांची दखल घेऊन आधारभूत किंमतीत वाढ करावी.

कृषी संचालक नेविल अफोन्सो आधारभूत किंमतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज घेणे कृषी खात्याने सुरु केले आहे. यंदा गेल्या वर्षीसारखी १५० रुपये आधारभूत आहे. शेतकऱ्यांकडून १८० ते २०० रुपये मागणी केली जात आहे. पण सध्या आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यावर सरकारकडून याच्यावर योग्य तो प्रस्ताव येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयात आधारभूत किंमतीसाठी अर्ज करावे. सर्व कार्यलयात हे अर्ज उपलब्ध आहे. यासाठी कृषी कार्ड अनिवार्य आहे.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी