शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:58 IST

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

पणजी - विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सत्तानाटय़ात भाजपचे हात पोळले गेल्यानंतर शहा यांनी आता प्रथमच दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गोवा आणि मणिपुरविषयी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकांचा कौल भाजपला होता. भाजप तिथे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आम्ही सरकार घडविण्यासाठी दावा केला. गोवा व मणिपुरमध्ये जरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी सरकार घडविण्यासाठी त्यांनी दावा केला नव्हता. सर्वात मोठा पक्ष ठरून देखील गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो शक्य होत नव्हते म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सरकार घडवले. भाजपने गोवा राज्यपालांकडे जाऊन दावा केला म्हणून राज्यपालांनी आम्हाला सरकार बनविण्यासाठी बोलावले, असे शहा म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतासाठी केवळ सात जागा कमी पडल्या. यावरून लोकांचा कौल कळून येतो. आम्ही जर सरकार बनविण्यावर दावा केला नसता तर ते जनादेशाविरुद्ध ठरले असते. म्हणून आम्ही सरकार घडविले होते. काँग्रेसकडून पराभव देखील विजय म्हणून साजरा केला जातो. काँग्रेसची ही नवी पद्धत 2019 सालार्पयत कायम रहावी. म्हणजे आमचे काम सोपे होईल, असा टोला शहा यांनी लगावला. काँग्रेसचा आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रंवर विश्वास आहे असेही शहा मार्मिकपणो म्हणाले. 

दरम्यान, गेल्यावर्षी गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शहा यांनी लगेच दिल्लीत विधान केले होते, की कोणत्याही स्थितीत गोव्यात देखील भाजपचे सरकार अधिकारावर यायला हवे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठविले गेले होते आणि गडकरी यांनी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व अपक्ष आमदारांशी संपर्क साधून व त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार घडविले हा इतिहास ताजा आहे. काँग्रेस पक्ष नेता निवडत बसला होता व तत्पूर्वीच भाजपने एकवीसजणांचे संख्याबळ जमविले व राज्यपालांकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहgoaगोवाBJPभाजपा