शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:58 IST

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

पणजी - विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सत्तानाटय़ात भाजपचे हात पोळले गेल्यानंतर शहा यांनी आता प्रथमच दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गोवा आणि मणिपुरविषयी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकांचा कौल भाजपला होता. भाजप तिथे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आम्ही सरकार घडविण्यासाठी दावा केला. गोवा व मणिपुरमध्ये जरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी सरकार घडविण्यासाठी त्यांनी दावा केला नव्हता. सर्वात मोठा पक्ष ठरून देखील गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो शक्य होत नव्हते म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सरकार घडवले. भाजपने गोवा राज्यपालांकडे जाऊन दावा केला म्हणून राज्यपालांनी आम्हाला सरकार बनविण्यासाठी बोलावले, असे शहा म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतासाठी केवळ सात जागा कमी पडल्या. यावरून लोकांचा कौल कळून येतो. आम्ही जर सरकार बनविण्यावर दावा केला नसता तर ते जनादेशाविरुद्ध ठरले असते. म्हणून आम्ही सरकार घडविले होते. काँग्रेसकडून पराभव देखील विजय म्हणून साजरा केला जातो. काँग्रेसची ही नवी पद्धत 2019 सालार्पयत कायम रहावी. म्हणजे आमचे काम सोपे होईल, असा टोला शहा यांनी लगावला. काँग्रेसचा आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रंवर विश्वास आहे असेही शहा मार्मिकपणो म्हणाले. 

दरम्यान, गेल्यावर्षी गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शहा यांनी लगेच दिल्लीत विधान केले होते, की कोणत्याही स्थितीत गोव्यात देखील भाजपचे सरकार अधिकारावर यायला हवे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठविले गेले होते आणि गडकरी यांनी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व अपक्ष आमदारांशी संपर्क साधून व त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार घडविले हा इतिहास ताजा आहे. काँग्रेस पक्ष नेता निवडत बसला होता व तत्पूर्वीच भाजपने एकवीसजणांचे संख्याबळ जमविले व राज्यपालांकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहgoaगोवाBJPभाजपा