शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:58 IST

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

पणजी - विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सत्तानाटय़ात भाजपचे हात पोळले गेल्यानंतर शहा यांनी आता प्रथमच दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गोवा आणि मणिपुरविषयी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकांचा कौल भाजपला होता. भाजप तिथे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आम्ही सरकार घडविण्यासाठी दावा केला. गोवा व मणिपुरमध्ये जरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी सरकार घडविण्यासाठी त्यांनी दावा केला नव्हता. सर्वात मोठा पक्ष ठरून देखील गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो शक्य होत नव्हते म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सरकार घडवले. भाजपने गोवा राज्यपालांकडे जाऊन दावा केला म्हणून राज्यपालांनी आम्हाला सरकार बनविण्यासाठी बोलावले, असे शहा म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतासाठी केवळ सात जागा कमी पडल्या. यावरून लोकांचा कौल कळून येतो. आम्ही जर सरकार बनविण्यावर दावा केला नसता तर ते जनादेशाविरुद्ध ठरले असते. म्हणून आम्ही सरकार घडविले होते. काँग्रेसकडून पराभव देखील विजय म्हणून साजरा केला जातो. काँग्रेसची ही नवी पद्धत 2019 सालार्पयत कायम रहावी. म्हणजे आमचे काम सोपे होईल, असा टोला शहा यांनी लगावला. काँग्रेसचा आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रंवर विश्वास आहे असेही शहा मार्मिकपणो म्हणाले. 

दरम्यान, गेल्यावर्षी गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शहा यांनी लगेच दिल्लीत विधान केले होते, की कोणत्याही स्थितीत गोव्यात देखील भाजपचे सरकार अधिकारावर यायला हवे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठविले गेले होते आणि गडकरी यांनी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व अपक्ष आमदारांशी संपर्क साधून व त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार घडविले हा इतिहास ताजा आहे. काँग्रेस पक्ष नेता निवडत बसला होता व तत्पूर्वीच भाजपने एकवीसजणांचे संख्याबळ जमविले व राज्यपालांकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहgoaगोवाBJPभाजपा