शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:58 IST

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

पणजी - विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सत्तानाटय़ात भाजपचे हात पोळले गेल्यानंतर शहा यांनी आता प्रथमच दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गोवा आणि मणिपुरविषयी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकांचा कौल भाजपला होता. भाजप तिथे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आम्ही सरकार घडविण्यासाठी दावा केला. गोवा व मणिपुरमध्ये जरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी सरकार घडविण्यासाठी त्यांनी दावा केला नव्हता. सर्वात मोठा पक्ष ठरून देखील गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो शक्य होत नव्हते म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सरकार घडवले. भाजपने गोवा राज्यपालांकडे जाऊन दावा केला म्हणून राज्यपालांनी आम्हाला सरकार बनविण्यासाठी बोलावले, असे शहा म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतासाठी केवळ सात जागा कमी पडल्या. यावरून लोकांचा कौल कळून येतो. आम्ही जर सरकार बनविण्यावर दावा केला नसता तर ते जनादेशाविरुद्ध ठरले असते. म्हणून आम्ही सरकार घडविले होते. काँग्रेसकडून पराभव देखील विजय म्हणून साजरा केला जातो. काँग्रेसची ही नवी पद्धत 2019 सालार्पयत कायम रहावी. म्हणजे आमचे काम सोपे होईल, असा टोला शहा यांनी लगावला. काँग्रेसचा आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रंवर विश्वास आहे असेही शहा मार्मिकपणो म्हणाले. 

दरम्यान, गेल्यावर्षी गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शहा यांनी लगेच दिल्लीत विधान केले होते, की कोणत्याही स्थितीत गोव्यात देखील भाजपचे सरकार अधिकारावर यायला हवे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठविले गेले होते आणि गडकरी यांनी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व अपक्ष आमदारांशी संपर्क साधून व त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार घडविले हा इतिहास ताजा आहे. काँग्रेस पक्ष नेता निवडत बसला होता व तत्पूर्वीच भाजपने एकवीसजणांचे संख्याबळ जमविले व राज्यपालांकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहgoaगोवाBJPभाजपा