शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

मद्यपी पर्यटकांना अटक होणार, किनाऱ्यांवर पोलिसांचीही नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:05 IST

'सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे.'

पणजी : राज्यातील किनाऱ्यांवर  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आयआरबीचे काही पोलिसही नियुक्त केले जातील. सार्वजनिक ठिकाणी जे पर्यटक दारू पितात व अन्य उपद्रव करतात, त्यांना यापुढे अटक केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे दिला.

अलिकडे वारंवार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू होत आहे. किनाऱ्यांवर जीवरक्षक असूनही सात पर्यटकांचा या मोसमात मृत्यू झाला तर सुमारे 135 पर्यटकांना बुडताना वाचविले गेले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की आपण बैठक घेतली व स्थितीचा आढावा घेतला आहे.

परवा बेळगावच्या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांना समुद्रात उतरू नका, कारण समुद्र खवळलेला आहे, अशी सूचना जीवरक्षकांनी केली होती. पण ते समुद्रात उतरलेच. काहीजण मद्य पिऊन समुद्रात उतरतात व जीव गमावून बसतात. ज्यांनी कधी समुद्रच पाहिलेला नसतो ते समुद्रकिनारा पाहून खूप बेपर्वा वागतात.

मुख्यमंत्री म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे. अशा पर्यटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना आपण पोलिसांना केली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणा-यांना अटकच होईल. पूर्वी अशी मोहीम राबवली गेली होती, आता नव्याने कारवाई व्यापक केली जाईल. तसेच ज्या किना-यांवर जीवरक्षकांसोबत आयआरबीचे अतिरिक्त पोलिसही नियुक्त करण्याची गरज आहे, अशा काही ठिकाणी पोलिसांचीही नियुक्ती केली जाईल.

सर्वच किना-यांवर पोलीस नियुक्त करता येणार नाहीत पण ज्या जागा धोकादायक आहेत, तिथे आयआरबीचे पोलीस निश्चितच नियुक्त होतील.  सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांनी कोणताच उपद्रव करू नये व जीवरक्षकांच्या सूचना ऐकाव्यात असे अपेक्षित आहे.

टॅग्स :goaगोवा