शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर गोव्यात प्रथमच अनाथालयाची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 2:37 PM

गोव्यातील अनाथाश्रम आणि बालसंगोपन केंद्रातील अनागोंदी कारभाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून इशारा मिळाल्यानंतर आता प्रथमच गोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे. गोव्यातील सुमारे 78 बाल संगोपन केंद्रात दोन हजारपेक्षा अधिक मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे.स्कॅन-गोवा या बिगर सरकारी संघटणेकडून उच्च न्यायालयात गोव्यातील अनाथाश्रमातील अनागोंदी संदर्भात जी रिट याचिका दाखल करण्यात आली.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील अनाथाश्रम आणि बालसंगोपन केंद्रातील अनागोंदी कारभाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून इशारा मिळाल्यानंतर आता प्रथमच गोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे. या अभ्यासानंतर तयार करण्यात येणारा अहवाल दोन महिन्यात उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे. सध्या गोव्यातील सुमारे 78 बाल संगोपन केंद्रात दोन हजारपेक्षा अधिक मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे.

स्कॅन-गोवा या बिगर सरकारी संघटणेकडून उच्च न्यायालयात गोव्यातील अनाथाश्रमातील अनागोंदी संदर्भात जी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. महिला व बाल कल्याण खात्याने गोव्यातील विविध अनाथाश्रमात सुमारे 2090 मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे स्वत:च मान्य केले होते. या 78 केंद्रांपैकी केवळ दहा ते पंधरा केंद्राचाच व्यवहार योग्यप्रकारे चालतो हेही यावेळी स्पष्ट झाले होते. या दहा-पंधरा केंद्राव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रात केवळ मुलांना रहाण्याची सोय आहे. तरीही ही केंद्रे ‘स्पेशल होम्स’ या संकल्पनेखाली सर्व फायदे उकळीत असल्याचेही उघडकीस आले होते. यानंतर उच्च न्यायालयाने या सर्व बाल संगोपन केंद्राची चौकशी करा असा आदेश राज्यातील मुख्य सचिवांना दिला होता.

2015 च्या बाल न्याय कायद्याप्रमाणे केवळ कायदेशीर तंटय़ातून पालकांपासून विलग झालेल्या किंवा अत्याचाराला बळी ठरलेल्या बालकांनाच अशा अनाथाश्रमात ठेवता येते. मात्र त्यापूर्वी या मुलाची केस बाल कल्याण समितीपुढे न्यावी लागते. सदर मुलाला संगोपनाची आणि संरक्षणाची गरज आहे असा निर्वाळा या समितीने दिल्यानंतरच त्यांना अनाथाश्रमात ठेवता येते. मात्र गोव्यात अनाथाश्रमात असलेले एकही मुल अशी प्रक्रिया करुन अनाथाश्रमात न पाठविल्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या वैधतेवरच प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले होते. 

महिला व बालविकास खात्याकडून जी आकडेवारी मिळाली आहे. त्यात सुमारे 2090 मुलांना अनाश्रमात ठेवून घेतल्याचे उघड झाले आहे. मात्र त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे ती पार पाडली गेली नाही. यापूर्वीही बालकल्याण समितीकडून अशा अनाथालयाची पहाणी केली असता, त्यात कित्येक गैरव्यवहार सापडले होते. या अनाथाश्रमात ठेवलेली मुले स्थलांतरित कामगारांची असल्याचे उघडकीस आले होते. एवढेच नव्हे तर या अनाथालयात गेली कित्येक वर्षे  नोंदीही व्यवस्थित ठेवल्या जात नसल्याचे उघडकीस आले होते. काही अनाथालय केवळ मुलांना आश्रय देण्याव्यतिरिक्त अन्य कुठलेही सुविधा देत नसतानाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेत असल्याचेही उघडकीस आले होते. बाल न्याय कायद्याच्या 31 कलमाखाली हे सर्व बेकायदेशीर असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबद्दल डोळेझाकच केली होती. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय