शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
4
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
5
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
7
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
8
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
9
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
10
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
11
Pravin Tarde राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
12
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
13
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
14
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
15
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
16
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
17
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
18
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

राज्यातील २५ हजार युवक-युवतींना देणार उद्योगांना पूरक प्रशिक्षण: राजीव चंद्रशेखर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 8:34 AM

तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे आणि बॅचेसचा मडगावातून शुभारंभ.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्यातील २५ हजार युवक-युवतींना वर्षभरात उद्योगांना पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भविष्यात प्रत्येक युवकाजवळ कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी जागतिक स्तरावरील कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मडगाव रवींद्र भवन येथे केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बोलत होते. यावेळी राज्यातील तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे व बॅचेसचा शुभारंभ व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कौशल्य विकास केंद्रीय सचिव दीपक तिवारी व प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.

यावेळी राज्यातील कारागिरांचा गुरू सन्मान देऊन मंत्री चंद्रशेखर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना चंद्रशेखर म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्याचबरोबर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. काम करणाऱ्या प्रत्येक युवकाला शिक्षण व कौशल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या जागतिक पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था असून, लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र देशात सर्वप्रथम सुरू करण्याचा मान गोव्याला प्राप्त झाला आहे. १८ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ३२ कंपन्यांजवळ करार करण्यात आला आहे. यापुढे नोकरीसाठी पदवी शिक्षण, असे होणार नाही. पदवी शिक्षण घेताना आयटीआय प्रशिक्षणही घेता येईल. मात्र, यापुढे सरकारी नोकरीसाठी अप्रेंटीशीप असणे बंधनकारक असेल. किमान एक वर्ष कामाचा अनुभव असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, ती शिपायाची असो व कारकुनाची असो, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

कारागिरांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण दिल्या नंतर टूल किट खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये व प्रशिक्षण खर्च अडीच हजार रुपये. त्यानंतर व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नारीशक्ती, युवाशक्त्ती, किसानशक्त्ती व गरीब कल्याण या तत्त्वावर सरकारचे काम सुरू आहे. हर घर जल, हर घर फायबर, हर घर वीज, हर घर शौचालय व हर घर कौशल्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण