शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भाजपा नेत्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणातील कारवाई थांबली, काँग्रेसचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 29, 2023 13:29 IST

२०१२ साला पासून भाजप सरकार राज्यातील वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्याचे आश्वासन देत आहे.

पणजी: न्हयबाग - पेडणे येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायात गुंतलेल्या होडया मोडण्याची करवाई ही भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरुन बंद पाडण्यात  आली. सदर प्रकार हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असून त्याची न्यायालयाने स्वेच्छा दखल घ्यावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

२०१२ सालापासून भाजप सरकार राज्यातील वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्याचे आश्वासन देत आहे. मात्र १३ वर्ष उलटली तरी आश्वासनपूर्ती झाली नाही. उलट  बेकायदेशीर वाळू व्यवसाय सुरु आहे.  यामुळे पारंपरिकरित्या वाळू उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसल्याची टीका त्यांनी केली.

कवठणकर म्हणाले, की राज्यातील भाजप सरकार हे डबल इंजिन सरकार असल्याचे म्हणते. मग वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्यास त्यांना कोण रोखत आहे ? यापूर्वी वाळूच्या एका ट्रीपची किंमत ७ ते ८ हजार रुपये इतकी होती. मात्र आता हीच ट्रीप ३६ हजारांवर पोहचली आहे. या स्थितीत गोमंतकीयांनी आपली घरे कशी बांधायची. त्यांना इतकी महाग वाळू घरे बांधण्यासाठी कशी परवडणार याचा विचार व्हायला हवा. या सर्व गोंधळास सरकार जबाबदार आहे. बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायावर नियंत्रण आणण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा