शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गोव्यात ९७ मुले शिक्षणापासून वंचित! धक्कादायक माहिती : समग्र शिक्षा अधिकारी लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 10:33 IST

आरटीआय उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार शहरी भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण जास्त आहे.

पणजी : तब्बल ८७.४ टक्के साक्षरता प्रमाण असलेल्या गोव्यात सुमारे ९७ मुले  शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून प्राप्त झाली आहे. या सर्व मुलांना मुख्य प्रवाहात आणून नजीकच्या शाळांमध्ये दाखल करण्यासाठी समग्र शिक्षा अधिकाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत.

या प्रतिनिधीला आरटीआय उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार शहरी भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण जास्त आहे. बार्देस तालुक्यात ६२, तिसवाडीत १३ तर मुरगांव तालुक्यात २१ मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. 

गोव्यात इमारतींचे बांधकाम करण्यासाठी बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधून हजारो मजूर कुटुंब -कबिल्यासह गोव्यात येत असतात. औद्योगिक वसाहतींमध्ये पोलाद कारखान्यांमध्येही मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून ते गोव्यात येतात व त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. समग्र शिक्षा अधिकाऱ्यांना शाळाबाह्य आढळलेली मुले अधिकतर परप्रांतीयच आहेत. 

दरम्यान, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी  सरकारने शिक्षण हक्क कायदा लागू केला. मात्र या कायद्याचा मुळ उद्देश सफल होताना दिसत नाही. या कायद्याचा प्रसार तळागाळातील पालकांमध्ये खास करून मजूर कुटुंबामध्ये होत नसल्याने हेतू साध्य होत नसून होत नसून, त्याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जूनपासून किंवा त्याआधीच शाळेत  दाखल करून घेणार 

- शंभू घाडी, संचालक, एससीईआरटी

एससीईआरटीचे संचालक शंभू घाडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'समग्र शिक्षा' अंतर्गत प्रत्येक तालुक्यात आमचे ६ क्लस्टर रिसोर्स पर्सन (सीआरपी) काम करतात. वंचित मुलांपर्यंत ते जातात व त्यांना शाळेत दाखल करून घेतात. वरील ९७ मुलांनाही येत्या जूनपासून किंवा त्याआधीच शाळेत दाखल करून घेतले जाईल.'

गोव्यात ग्रामीण भागांमध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या अगदीच नगण्य आहे. शहरी भागांमध्येच शाळाबाह्य मुले आढळण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, 'अधिकतर बांधकाम मजुरांच्या मुलांच्या बाबतीतच हा प्रकार आढळून आलेला आहे. काही ठिकाणी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मुलेही शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. ही मुले अन्य राज्यांमध्ये शिकत असतात. परंतु कामानिमित्त आई-वडील स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनाही जावे लागते. अशा मुलांच्या बाबतीत आम्ही शाळा सोडल्याचा दाखला वगैरे आणण्याची सक्ती करत नाही. मुलांच्या वयाप्रमाणे इयत्ता आठवीपर्यंत त्या त्या इयत्तेत त्यांना दाखल करून घेतले जाते. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. 'समग्र शिक्षा' अंतर्गत या गोष्टीची आम्ही काटेकोर काळजी घेतो.'

घाडी पुढे म्हणाले की, 'आमचे क्लस्टर रिसोर्स पर्सन (सीआरपी) ठिकठिकाणी भेट देत असतात. ज्या ज्या ठिकाणी सीआरपींना अशी शाळाबाह्य मुले आढळतात. त्या त्या ठिकाणच्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना नेऊन  दाखल करून घेतले जाते.'

तालुकावार संख्या

पेडणे                     ००

बार्देस                    ६२

तिसवाडी                १३

डिचोली                  ०१

सत्तरी                    ००

फोंडा                    ००

सासष्टी                  ००

केपें                       ००

मुरगांव                   २१

धारबांदोडा              ००

सांगे                       ००

काणकोण               ००

...............................‌.....

एकूण                      ९७

टॅग्स :Schoolशाळा