शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

70 हजार शौचालये बांधणे राहिले कागदावरच, अनेक आश्वासने अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 19:14 IST

राज्यभरातील विविध गावांमध्ये व शहरात मिळून सरकार एकूण 70 हजार शौचालये बांधेल, अशा प्रकारची घोषणा ही कागदावरच राहिली आहे.

पणजी : राज्यभरातील विविध गावांमध्ये व शहरात मिळून सरकार एकूण 70 हजार शौचालये बांधेल, अशा प्रकारची घोषणा ही कागदावरच राहिली आहे. गेल्या फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात सरकारने जाहीरपणे ही घोषणा केली तरी, प्रत्यक्षात तीन महिने झाले तरी या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलू शकलेले नाही.

राज्यातील 25 हजार घरांकडे शौचालये नाहीत असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र 70 हजार शौचालये ओपन डेफिकेशन फ्री योजनेंतर्गत बांधली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 13 फेब्रुवारी 2018 रोजी केली होती. कुठच्याही सरकारी खात्याने मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे आढळून येत आहे. वास्तविक राज्याला 70 हजार शौचालयांची खरोखर गरज आहे काय, असा प्रश्न काही सरकारी अधिका-यांनाही पडला आहे. सरकार काही वेळा मोठ्या घोषणा करत असते व त्या घोषणा वस्तुस्थितीशी विसंगत असतात व त्यामुळे आश्वासनांची पूर्ती होऊ शकत नाही असाही अनुभव येतो. राज्यात नवी घरे बांधताना लोक शौचालयांचीही व्यवस्था करत आहे. यापूर्वी जी शौचालये घराच्या बाहेर लोकांनी बांधली, त्याचा वापर ग्रामीण भागात तरी जळाऊ लाकडे ठेवण्यासाठी स्टोर रूमप्रमाणे होत आहे. गोवा राज्य येत्या  2 ऑक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त केले जाईल, अशीही घोषणा सरकारने गेल्या फेब्रुवारीत केली होती. पण प्रत्यक्षात त्याविषयी काही घडलेले नाही. फक्त राजधानी पणजीत काही प्रभाग हे हागणदारीमुक्त झालेले आहेत. 

कुळांना शौचालये मिळायला हवीत म्हणून स्वतंत्र कायदा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी 1 फेब्रुवारी 2018 रोजी केली होती. तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी, कोणताही कायदा अस्तित्वात आलेला नाही किंवा कायद्याचा मसुदा देखील तयार झालेला नाही. अनेक कूळ व मुंडकारांना शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी भाटकारांकडून ना हरकत दाखला अजुनही मिळत नाही अशा तक्रारी आहेत. जिथे बांधकाम चालते, तिथे महिला मजुरांसाठी सॅनिटरी पॅड्सचे मोफत वितरण केले जाईल, असेही राज्य सरकारने घोषित केले होते. ती घोषणाही गेले साडेतीन महिने कागदावरच राहिली आहे.

टॅग्स :goaगोवा