शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सरकारी बैठकांसह शासकीय सोहळ्यात 2 ऑक्टोबरपासून प्लॅस्टिक बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:06 IST

सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे.

पणजी: सरकारी कार्यालयसोबतच सरकारी बैठका आणि शासकीय सोहळ्यांमध्ये पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या, बश्या आणि ग्लास आगामी 2 ऑक्टोबरपासून वापरायचे नाहीत असे बजाविणारे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी जारी केले आहे. सरकारी खात्यांच्या उपहारगृहांनाही (कॅण्टीन) हा बंदी आदेश लागू करण्यात येत आहे.

इको-फ्रेण्डली बश्या, बाटल्या व कप वापरावेत असे सरकारने बजावले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मान्यता घेतल्यानंतर सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या अव्वल सचिवांनी याबाबतचा आदेश जारी केला असून येत्या 2 रोजी गांधी जयंतीच्या दिवसापासून सरकार पूर्णपणो पर्यावरणासपूरक अशी भूमिका घेण्यास कटीबद्ध होत आहे.

सरकारी खात्यांच्या बैठकांवेळी पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टीक बाटल्या वापरल्या जात आहेत. तसेच सरकारी सरकारी कार्यालयांच्या सोहळ्य़ांवेळीही प्लॅस्टीक बाटल्यांचे पाणी दिले जाते. चहा देण्यासाठीही काहीवेळा प्लॅस्टीक ग्लास वापरले जातात. यापुढे अशा वस्तूंचा वापर करायचा नाही असे बजाविले गेले आहे. सरकारच्या प्रत्येक खात्याकडे कॅण्टीन आहे. अशा उपहारगृहांतही यापुढे प्लॅस्टीकच्या बाटल्या, ग्लास व प्लॅस्टीक बश्यांचा वापर करता येणार नाही.

बाजारपेठा व अन्यत्र यापूर्वीच सरकारने व पालिकांनी प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. प्लॅस्टीक कुजत नसल्याने ते पर्यावरणास अतिशय हानीकारक ठरते. तरीही काही बाजारपेठांमध्ये बेकायदा पद्धतीने प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. पणजी बाजारपेठेत यापूर्वी महापालिकेने प्लॅस्टीकविरोधी मोठी कारवाई मोहीम राबवली होती. यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पूर्णपणो थांबवला होता. आता हळूहळू काहीजणांनी छुप्या पद्धतीने हा वापर सुरू केला आहे. महापालिका त्याविरुद्ध पुन्हा कारवाई सुरू करण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा