शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

किन्हाळाच्या युवकाने चाैदा एकरात फुलविली विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे.

अरविंद घुटके लाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला व लागूनच असलेली गावे भाजीपाला लागवडीकरीता प्रसिद्ध आहेत. उन्हाळी भाजीपाला लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु भर पावसाळ्यात भाजीपाला उत्पादनाकरिता पाण्याचा योग्य निचरा हाेणारी शेतजमीन आवश्यक आहे. अशी जमीन या भागात नसल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची फारशी लागवड होत नाही. मात्र, किन्हाळा येथील तानाजी ठाकरे या ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने पावसाळ्यात तब्बल चौदा एकरात कारले, चवळीशेंग, मुंगना, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांची लागवड करून परिसरातीलच नव्हे तर अन्य शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह, चैतन्य व प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात पीक घेणे सुरू असल्याने या भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. परंतु कारले आणि चवळीशेंगांचे दर कमी असल्याने अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत त्याने लोकमतजवळ व्यक्त केली. कारले आणि चवळीशेंगा वेलीकरीता मांडवपद्धती वापरली आहे. दर दोन दिवसाला चवळीशेंगा पाच क्विंटल तर दर आठवड्याला वीस ते पंचवीस क्विंटल कारल्याचे उत्पादन हाेत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. अन्य भाजीपाल्यामधूनही पैसे येणे सुरू आहे. या संपूर्ण लागवडीकरीता व शेतात अन्य सुविधा निर्माण करण्याकरीता आतापर्यंत एकूण आठ ते नऊ लाख रुपये खर्च झाले. 

शेतात लावले सीसीटीव्ही कॅमेरे शेतात अतिशय चांगल्या दर्जाचा भाजीपाला आहे. तसेच शेतात अत्याधुनिक पद्धतीची यंत्रे आहेत. ही यंत्रे चाेरून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहित्य व भाजीपाला चाेरीला जाऊ नये यासाठी तानाजी यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे ते जिल्ह्यातील पहिले शेतकरी असावेत. चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील शेतात लावले आहेत.

पाच लाखांचा भाजीपाला विकला; पुन्हा ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा

आजवर एकूण पाच लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री झाली. अजून चार ते पाच महिने उत्पन्न देण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. येणाऱ्या दिवसात योग्य भाव मिळाला तर ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, अशी भावना तानाजी ठाकरे यांनी बोलून दाखविली. शेतीवर नवनवीन प्रयोग करणे हा तानाजी यांचा छंदच आहे. त्याचे कार्य गडचिराेली जिल्ह्यातील इतर बेराेजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

 

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी