शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

किन्हाळाच्या युवकाने चाैदा एकरात फुलविली विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे.

अरविंद घुटके लाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला व लागूनच असलेली गावे भाजीपाला लागवडीकरीता प्रसिद्ध आहेत. उन्हाळी भाजीपाला लागवड येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु भर पावसाळ्यात भाजीपाला उत्पादनाकरिता पाण्याचा योग्य निचरा हाेणारी शेतजमीन आवश्यक आहे. अशी जमीन या भागात नसल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची फारशी लागवड होत नाही. मात्र, किन्हाळा येथील तानाजी ठाकरे या ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने पावसाळ्यात तब्बल चौदा एकरात कारले, चवळीशेंग, मुंगना, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांची लागवड करून परिसरातीलच नव्हे तर अन्य शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह, चैतन्य व प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. तानाजी या तरुणास शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला आहे. ज्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली ती शेती देसाईगंज येथील एका व्यापाऱ्याची आहे. तानाजीने ती भाड्याने घेतली आहे. या भाड्याच्या शेतात त्याने ठिबक सिंचन व्यवस्था केली. पाच हाॅर्सपाॅवरचा मोटारपंप लावला. गादी वाफ्यांवर प्लास्टिक मलचींग लावली. संपूर्णपणे शेणखत वापरले. किड लागू नये म्हणून शेतातच दशपर्णी औषधी तयार करून फवारणी करणे सुरू आहे. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात पीक घेणे सुरू असल्याने या भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. परंतु कारले आणि चवळीशेंगांचे दर कमी असल्याने अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत त्याने लोकमतजवळ व्यक्त केली. कारले आणि चवळीशेंगा वेलीकरीता मांडवपद्धती वापरली आहे. दर दोन दिवसाला चवळीशेंगा पाच क्विंटल तर दर आठवड्याला वीस ते पंचवीस क्विंटल कारल्याचे उत्पादन हाेत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. अन्य भाजीपाल्यामधूनही पैसे येणे सुरू आहे. या संपूर्ण लागवडीकरीता व शेतात अन्य सुविधा निर्माण करण्याकरीता आतापर्यंत एकूण आठ ते नऊ लाख रुपये खर्च झाले. 

शेतात लावले सीसीटीव्ही कॅमेरे शेतात अतिशय चांगल्या दर्जाचा भाजीपाला आहे. तसेच शेतात अत्याधुनिक पद्धतीची यंत्रे आहेत. ही यंत्रे चाेरून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहित्य व भाजीपाला चाेरीला जाऊ नये यासाठी तानाजी यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे ते जिल्ह्यातील पहिले शेतकरी असावेत. चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील शेतात लावले आहेत.

पाच लाखांचा भाजीपाला विकला; पुन्हा ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा

आजवर एकूण पाच लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री झाली. अजून चार ते पाच महिने उत्पन्न देण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. येणाऱ्या दिवसात योग्य भाव मिळाला तर ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, अशी भावना तानाजी ठाकरे यांनी बोलून दाखविली. शेतीवर नवनवीन प्रयोग करणे हा तानाजी यांचा छंदच आहे. त्याचे कार्य गडचिराेली जिल्ह्यातील इतर बेराेजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

 

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी