अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:40+5:30

तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले.

Workers stranded in Telangana get admission | अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

ठळक मुद्देपाठपुराव्यानंतर महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी : गोंडपिपरी व राजुरा तहसीलदारांनी केली जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर आता परतायला लागले आहेत. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर अडकवून ठेवले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी २ मेच्या रात्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सदर मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात आला.
तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहित झाली. ते रात्रीच सीमावर्ती भागात पोहोचले. सर्वप्रथम गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क केला असता, तीन ते चार दिवसात नियोजन करून त्यांना परत आणू, असे सांगितले. त्यानंतर आमदार डॉ.होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याही सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मजुरांची आरोग्य तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे मजुरांना स्वगावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. रविवारी जवळपास तीन हजार मजूर विविध वाहनांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून खासगी वाहनाने पुन्हा त्यांना स्वगावी पाठविण्यात आले. राजुरा व गोंडपिपरीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केली. तसेच डॉ. होळी यांनी काही मजुरांसाठी काळी-पिवळी वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांचा प्रवास सुखर झाला.

पायदळच गाठली सीमा
काही मजुरांना वाहन न मिळाल्याने या मजुरांनी रात्रभर पायदळ प्रवास करून आष्टी गाठले. आष्टी येथील काही नागरिक तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी वाहनाने स्वगावी पाठविण्यात आले.

Web Title: Workers stranded in Telangana get admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.