शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अतिदुर्गम चिटूरमध्ये पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:22 IST

धरण उशाला, कोरड घशाला: मूलभूत सुविधांपासून गाव वंचित

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिटूर गावात सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावीे लागत आहे. या गावालगत तेलंगणाचे मेडीगट्टा धरण आहे, पण त्याचा काहीही फायदा चिटूरला होत नसल्याने पाणीसमस्या कायम आहेे.

अमरेली मार्गावर चिटूर हे सव्वाशे उंबरे व सहाशे लोकसंख्येचे गाव आहे. तेलंगणापासून जवळच असलेल्या या गावात उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाई सुरू होते. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पण याचा काहीही फायदा झाला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावात अद्याप पाणी योजना राबविलेली नाही, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावकरी वणवण भटकत असल्याचे दिसत आहे. गावालगत चिलमेला ओढा आहेे, त्या ठिकाणी झरा तयार करून डोक्यावर घागर व इतर भांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.

ना रस्ता ना आरोग्य सुविधा

चिटूरमध्ये अद्याप पक्का रस्ताही नाही, आरोग्य सुविधेचा अभाव आहे. गावात दर पाच वर्षांनी निवडणुकीत मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात, पुन्हा फिरकतही नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होत आली, पण येथील विकासाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत.

चिलमेला ओढ्याचाच एकमेव आधार

गावात पाणीयोजना राबविलेल्या नाहीत. उन्हाळ्यात विहिरी कोरड्याठाक पडतात, बोअरचे पाणीही आटते. त्यामुळे एकमेव चिलमेला ओढ्याचाच गावकऱ्यांना आधार आहे. विजेच्या समस्येचे भिजत घाेंगडे कायम आहे, त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढत चालली आाहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGadchiroliगडचिरोली