शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:05 AM

राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. वास्तविक हा जिल्हा त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यांचा गृहजिल्हा चंद्रपूरमधूनच गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याशी त्यांचे भावनिक आणि पारिवारिक ऋणानुबंध आहेत. ही बाब गडचिरोली जिल्हावासियांशी जास्त महत्वाची आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाºया नेत्यांमध्ये अलिकडच्या काळात स्व.आर.आर.पाटील यांचे नाव लोक अजूनही घेतात. या जिल्ह्याला खºया अर्थाने भौतिक सुविधांसह विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामे अविस्मरणीय ठरली. त्याच्यानंतरही जिल्ह्यात अनेक कामे झाली, पण त्या ताकदीची कामे दुर्दैवाने होऊ शकली नाही. जिल्ह्याच्या गरजांची जाण ठेवून मुंबईतही त्यासाठी वजन वापरत हवे ते पदरी पाडून घेण्याची आर.आर.पाटलांची तगमग वादातीत होती. सर्वसामान्यांशी नाळ जुळवून त्यांच्यापासून कायमचे दूर गेल्यानंतर असा पालकमंत्री आता होणे नाही, अशीच प्रतिक्रिया आतापर्यंत लोकांच्या तोंडून उमटत होती. पण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आल्यानंतर जिल्हावासियांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.विपूल वनसंपदा असूनही त्यावर आधारित रोजगार निर्मितीचा अभाव, अर्धवट स्थितीत बंद पडलेला लोहखनिज उद्योग, अतिशय धिम्या गतीने सुरू असलेली महामार्ग व इतर रस्त्यांची कामे, कित्येक वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही कामाला सुरूवात न झालेले सिंचन प्रकल्प, त्यामुळे दुबार पिकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कोंडी असे कितीतरी प्रश्न या जिल्ह्याच्या विकासात अडथळा बनून उभे आहेत. पण त्याकडे राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री, वनमंत्री अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभळणाºया मुनगंटीवारांना या जिल्ह्याच्या प्रश्नांची बऱ्यापैकी जाणीव आहे. लालफितशाहीत अडकलेली कामे मार्गी लावण्याची त्यांची सचोटी आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी त्यांना आपले काम दाखविण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळणार आहे, पण त्यातही ते आपली छाप पाडतील आणि या जिल्ह्याच्या भल्यासाठी चार गोष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा जिल्हावासियांचा विश्वास आहे. तो विश्वास कायम ठेवत वाढलेल्या अपेक्षा मुनगंटीवार नक्कीच पूर्ण करतील, अशी आशा करूया.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार