शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

पदोन्नतीतील आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST

भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने आरक्षण कायदा २००१ तयार करून २५ मे २००४ च्या शासन निर्णयान्वये मागासवर्गीय ...

भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने आरक्षण कायदा २००१ तयार करून २५ मे २००४ च्या शासन निर्णयान्वये मागासवर्गीय एससी.,एसटी. व व्हीजेएनटी. या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. ओबीसींकरिता मात्र शासनाने ते लागू केले नव्हते. त्यामुळे ओबीसींनाही पदोन्नतीतील आरक्षण लागू करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघासोबत लढा द्यावा. संविधानविरोधी असलेल्या काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केल्याने त्यावर सुनावणी करून निकाल देताना आरक्षण कायदा वैध ठरवून सुधारित माहिती सादर करण्यास न्यायालयाने २०१७ ला सुचविले होते; परंतु याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन शासनाने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीतील आरक्षणच रद्द केले. शासन बदलले तरी ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामुळे तसेच सुरू ठेवून एकंदरीत मागासवर्गीयांवर अन्याय करणे सुरूच आहे. या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, स्वतंत्र मजदूर युनियन, बिरसा मुंडा क्रांती दल आदी संघटना न्यायालयीन लढा लढत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाशी जुळून लढा तीव्र करण्यास मोलाचे सहकार्य करावे, असेही केंद्रप्रमुख विजय बन्सोड, गौतम मेश्राम व सदानंद ताराम यांनी म्हटले आहे.