शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

पदोन्नतीतील आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST

भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने आरक्षण कायदा २००१ तयार करून २५ मे २००४ च्या शासन निर्णयान्वये मागासवर्गीय ...

भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने आरक्षण कायदा २००१ तयार करून २५ मे २००४ च्या शासन निर्णयान्वये मागासवर्गीय एससी.,एसटी. व व्हीजेएनटी. या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. ओबीसींकरिता मात्र शासनाने ते लागू केले नव्हते. त्यामुळे ओबीसींनाही पदोन्नतीतील आरक्षण लागू करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघासोबत लढा द्यावा. संविधानविरोधी असलेल्या काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केल्याने त्यावर सुनावणी करून निकाल देताना आरक्षण कायदा वैध ठरवून सुधारित माहिती सादर करण्यास न्यायालयाने २०१७ ला सुचविले होते; परंतु याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन शासनाने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीतील आरक्षणच रद्द केले. शासन बदलले तरी ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामुळे तसेच सुरू ठेवून एकंदरीत मागासवर्गीयांवर अन्याय करणे सुरूच आहे. या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, स्वतंत्र मजदूर युनियन, बिरसा मुंडा क्रांती दल आदी संघटना न्यायालयीन लढा लढत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाशी जुळून लढा तीव्र करण्यास मोलाचे सहकार्य करावे, असेही केंद्रप्रमुख विजय बन्सोड, गौतम मेश्राम व सदानंद ताराम यांनी म्हटले आहे.