शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

पेसा निधीतून वन्यजीव संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:29 IST

पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना शासनामार्फत लोकसंख्येच्या आधारावर पाच टक्के अबंध निधी मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिला जात आहे. प्राप्त निधीपैकी काही निधी ग्रामसभा वन्यजीव संवर्धनासाठी वापरत आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन कोटींचा खर्च : पूर्वापार चालत आलेल्या आदिवासी व वन्यजीवांमधील नात्याला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना शासनामार्फत लोकसंख्येच्या आधारावर पाच टक्के अबंध निधी मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिला जात आहे. प्राप्त निधीपैकी काही निधी ग्रामसभा वन्यजीव संवर्धनासाठी वापरत आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या निधीतून वन्यजीव संवर्धनासाठी ग्रामसभांच्या मार्फतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.आदिवासी बहुल गावे जंगलांनी वेढली आहेत. आदिवासींनी जंगल व वन्यजीवांचे आजपर्यंत संवर्धन केल्याने वन्यजीव व जंगल टिकून आहे. वन्यजीव व आदिवासी यांचे अतुट नाते आहे. हे नाते आणखी बळकट करण्यासाठी शासनाने ग्रामसभांना प्राप्त होणाºया अबंध निधीपैकी काही निधी वन्यजीव संवर्धनावर खर्च करणे सक्तीचे केले आहे. वन्यजीव व जंगलाचे महत्त्व आदिवासींना माहित असल्याने आदिवासींनी यात कोणतीही कसर न सोडता शासनाकडून प्राप्त निधीपैकी काही निधी वन्यजीव संवर्धनासाठी खर्च केला आहे.२०१५-१६ या वर्षापासून पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना पाच टक्के अबंध निधी देण्यास सुरूवात केली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६०० गावांपैकी जवळपास १३०० गावे पेसामध्ये मोडतात. या सर्वच गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासन निधी उपलब्ध करून देत आहे. २०१५-१६ या वर्षात सुमारे १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यापैकी ग्रामसभांनी वन्यजीव संवर्धनावर ६४ लाख ८२ हजार रुपये खर्च केले आहेत. २०१६-१७ या वर्षात १६ कोटी ४२ लाख ६७ हजार ९१६ रुपये प्राप्त झाले. त्यापैकी ६४ लाख ९ हजार रुपये वन्यजीव संवर्धनावर खर्च करण्यात आले आहेत. २०१७-१८ या वर्षात १६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी वन्यजीव संवर्धनावर ६७ लाख १२ हजार ३६५ रुपये खर्च झाले आहेत.७९१ कामांना मंजुरीपेसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामसभांनी आपल्या गावासभोवताल वन्यजीव संवर्धनासाठी २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षात सुमारे ७९१ कामे मंजूर केली. त्यापैकी ४४४ कामे पूर्ण केली आहेत. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला अबंध निधी कशावर खर्च करावा, यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. मात्र त्यानुसार कोणते काम हाती घ्यायचे, याचे नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही ग्रामसभांनी गावाच्या हद्दित बंधारे बांधून जास्तीत जास्त दिवस पाणी टिकून राहिल, याची व्यवस्था केली आहे. ग्रामसभांच्या या कामांना वन विभागाचेही पाठबळ मिळत आहे.आरोग्य व पोषणावर १७ कोटींचा खर्चआदिवासी समाजामध्ये कुपोषणाची समस्या गंभीर आहे. आदिवासी बालके कुपोषीत राहू नये, यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. शासनाकडून प्राप्त होणाºया अबंध निधीपैकी काही निधी आरोग्य, शिक्षण व पोषणावरही खर्च करण्याची सक्ती करण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षात ग्रामसभांनी ६ कोटी ३५ लाख ८ हजार ७०४ रुपये खर्च केले. २०१६-१७ मध्ये ७ कोटी ३५ लाख १८ हजार रुपये तर २०१७-१८ या वर्षात ३ कोटी ३५ लाख ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत. कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी ग्रामसभांच्या वतीने स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जातात.

टॅग्स :forestजंगल