शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

पेसा निधीतून वन्यजीव संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:29 IST

पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना शासनामार्फत लोकसंख्येच्या आधारावर पाच टक्के अबंध निधी मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिला जात आहे. प्राप्त निधीपैकी काही निधी ग्रामसभा वन्यजीव संवर्धनासाठी वापरत आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन कोटींचा खर्च : पूर्वापार चालत आलेल्या आदिवासी व वन्यजीवांमधील नात्याला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना शासनामार्फत लोकसंख्येच्या आधारावर पाच टक्के अबंध निधी मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिला जात आहे. प्राप्त निधीपैकी काही निधी ग्रामसभा वन्यजीव संवर्धनासाठी वापरत आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या निधीतून वन्यजीव संवर्धनासाठी ग्रामसभांच्या मार्फतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.आदिवासी बहुल गावे जंगलांनी वेढली आहेत. आदिवासींनी जंगल व वन्यजीवांचे आजपर्यंत संवर्धन केल्याने वन्यजीव व जंगल टिकून आहे. वन्यजीव व आदिवासी यांचे अतुट नाते आहे. हे नाते आणखी बळकट करण्यासाठी शासनाने ग्रामसभांना प्राप्त होणाºया अबंध निधीपैकी काही निधी वन्यजीव संवर्धनावर खर्च करणे सक्तीचे केले आहे. वन्यजीव व जंगलाचे महत्त्व आदिवासींना माहित असल्याने आदिवासींनी यात कोणतीही कसर न सोडता शासनाकडून प्राप्त निधीपैकी काही निधी वन्यजीव संवर्धनासाठी खर्च केला आहे.२०१५-१६ या वर्षापासून पेसा अंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना पाच टक्के अबंध निधी देण्यास सुरूवात केली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६०० गावांपैकी जवळपास १३०० गावे पेसामध्ये मोडतात. या सर्वच गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासन निधी उपलब्ध करून देत आहे. २०१५-१६ या वर्षात सुमारे १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यापैकी ग्रामसभांनी वन्यजीव संवर्धनावर ६४ लाख ८२ हजार रुपये खर्च केले आहेत. २०१६-१७ या वर्षात १६ कोटी ४२ लाख ६७ हजार ९१६ रुपये प्राप्त झाले. त्यापैकी ६४ लाख ९ हजार रुपये वन्यजीव संवर्धनावर खर्च करण्यात आले आहेत. २०१७-१८ या वर्षात १६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी वन्यजीव संवर्धनावर ६७ लाख १२ हजार ३६५ रुपये खर्च झाले आहेत.७९१ कामांना मंजुरीपेसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामसभांनी आपल्या गावासभोवताल वन्यजीव संवर्धनासाठी २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षात सुमारे ७९१ कामे मंजूर केली. त्यापैकी ४४४ कामे पूर्ण केली आहेत. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला अबंध निधी कशावर खर्च करावा, यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. मात्र त्यानुसार कोणते काम हाती घ्यायचे, याचे नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही ग्रामसभांनी गावाच्या हद्दित बंधारे बांधून जास्तीत जास्त दिवस पाणी टिकून राहिल, याची व्यवस्था केली आहे. ग्रामसभांच्या या कामांना वन विभागाचेही पाठबळ मिळत आहे.आरोग्य व पोषणावर १७ कोटींचा खर्चआदिवासी समाजामध्ये कुपोषणाची समस्या गंभीर आहे. आदिवासी बालके कुपोषीत राहू नये, यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. शासनाकडून प्राप्त होणाºया अबंध निधीपैकी काही निधी आरोग्य, शिक्षण व पोषणावरही खर्च करण्याची सक्ती करण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षात ग्रामसभांनी ६ कोटी ३५ लाख ८ हजार ७०४ रुपये खर्च केले. २०१६-१७ मध्ये ७ कोटी ३५ लाख १८ हजार रुपये तर २०१७-१८ या वर्षात ३ कोटी ३५ लाख ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत. कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी ग्रामसभांच्या वतीने स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जातात.

टॅग्स :forestजंगल