शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:30 PM

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देहातपंप व विहिरींवर गर्दी : ऐन उन्हाळ्यात निर्माण होणार गंभीर समस्या; गावासभोवतालचे पाण्याचे स्रोत आटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.पाण्याचा उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर चालली आहे. पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. शहरी भागात पाणीपुरवठा योजना असल्या तरी ग्रामीण भागात मात्र पाणी पुरवठा योजना नाहीत. त्यामुळे विहिरी किंवा हातपंपांच्या भरवशावर पाण्याची गरज भागवावी लागते. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. महिन्याच्या शेवटी आता उग्र रूप धारण केले आहे. पाणी मिळत नसल्याने हातपंप व विहिरी यांच्यासमोर पाण्याचे भांडे धरलेल्या महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे.आपल्या वॉर्डातील हातपंप व विहीर आटल्यानंतर गावातील ज्या हातपंपाला पाणी अधिक आहे. अशा हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात होते. मे-जून या कालावधीत कडक उन्हाळा तापतो. त्यामुळे या कालावधीत पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे पाळीव प्राणी आहेत. पावसाळा व हिवाळ्यात ही जनावरे तलाव, नाला येथील पाणी पिऊन येतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बाहेर तहान भागविणे शक्य होत नाही. परिणामी जनावरे घरीच येऊन तहान भागवत असल्याने पाण्याची समस्या वाढली आहे. पाणी भरण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.पाणी पुरवठा योजना नावापुरत्याचग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनाने लाखो रूपये खर्चून काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बांधून दिल्या आहेत. मात्र अनेक ग्राम पंचायती वीज बिल भरण्यास सक्षम नसल्याने संबंधित पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही पाणी पुरवठा योजनांमध्ये किरकोळ बिघाड निर्माण झाला आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याची ऐपतही ग्राम पंचायतीमध्ये नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. योजना बांधून झाल्यानंतर कंत्राटदार काही दिवस स्वत: योजना चालविते. तोपर्यंत योजना चालविली जाते. त्यानंतर गावकरी पाणी पट्टी भरीत नाही. परिणामी ग्राम पंचायत आर्थिक अडचणीत येत असल्याने वीज बिल रखडून वीज पुरवठा खंडित होतो.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई