शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पाणी समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:15 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : भूजल विभागाचे अधिकारी आष्टीत दाखल

ऑनलाईन लोकमतआष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाणी व्यवस्था करण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मागील एक महिन्यापासून आष्टी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नोवाईकांना पिण्यासाठी तसेच बाह्य कामाच्या वापरासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत, ग्रामीण रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाºयांना आष्टीत पाठविले व येथे बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले.भूजल विभागाच्या अधिकारी आष्टीच्या रुग्णालयाला भेट देऊन परिसरातील गोची पाणी केली. बोअरवेलसाठी रुग्णालयाच्या पढील भागात जागा निश्चित करून त्या ठिकाण्ीा बोअरवेल खादण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आष्टीच्या रुग्णालय परिसरात यापूर्वी तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आले. मात्र तिन्ही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे रुग्णालयात पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली. मात्र आता जिल्हाधिकारी सिंह यांनी दखल घेतल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे. लोकमतने पाणीटंचाईबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णालयात अतिरिक्त नळ कनेक्शन दिले. त्यामुळे रुग्णांना पाण्याची सुविधा होईल, अशी आशा वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बोअरवेल खोदताना तसेच जागेची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात सभोवतालच्या ३० ते ४० गावातील रुग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना येथे सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे.गडचिरोलीतील समस्या सुटणारमागील १५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी रूग्णालयात बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, न.प.च्या अधिकाºयांची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी