शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्प भरभराटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:46 PM

चामोर्शी तालुक्याच्या तळोधी येथील काही बचतगटाच्या ३३ महिलांनी एकत्र येऊन गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केला. सदर प्रकल्पाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा संकलित करून या कचऱ्यापासून हजारो रूपयांचे खत बनविले जात आहे.

ठळक मुद्देतळोधीतील १३ मजुरांना रोजगार : शेतकरी संघ व माविमच्या सहभागातून प्रकल्प यशस्वी, गावाची स्वच्छतेकडे वाटचाल

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या तळोधी येथील काही बचतगटाच्या ३३ महिलांनी एकत्र येऊन गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केला. सदर प्रकल्पाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा संकलित करून या कचऱ्यापासून हजारो रूपयांचे खत बनविले जात आहे. सदर प्रकल्पातून एकूण १३ महिला व पुरूषांना नियमित रोजगार मिळत आहे. शिवाय या प्रकल्पातून तळोधीतील या उत्पादक गटाची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महाराष्टÑ ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत चामोर्शी येथे श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र आहे. या केंद्राअंतर्गत तळोधी (मो.) येथे तेजस्वीनी महिला शेतकरी संघ स्थापन करण्यात आला. त्यानंतर कचरा व्यवस्थापन व खत निर्मितीचा प्रकल्प चालविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सदर प्रकल्पाचे एकूण मूल्य ४ लाख ४५ हजार रूपये आहे. एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची, असा प्रश्न महिलांसमोर सुरुवातीला निर्माण झाला. दरम्यान माविम व शेतकरी संघातील महिलांच्या सहभागाने काही रक्कम जुळविण्यात आली. या प्रकल्पासाठी शेतकरी संघाने बिनव्याजी कर्ज स्वरूपात ८० हजार रूपये दिले. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व सदर शेतकरी संघातील महिलांनी साहित्याची जुळवाजुळव करून ८० हजार रूपयांच्या वस्तूंची व्यवस्था केली. त्यानंतर माविमच्या चामोर्शी येथील लोक संचालित केंद्राच्या वतीने १ लाख ४० हजार रूपये पाच वर्षांनंतर परत करण्याच्या अटीवर या प्रकल्पासाठी देण्यात आले. अशा प्रकारे सदर प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ३ लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आली.सदर प्रकल्प स्थापन होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला. सुरुवातीला वर्षभर या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. पोस्टर, बॅनर तसेच बैठका घेऊन या प्रकल्पाचे काय फायदे आहेत, हे नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यानंतर लोकांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येकी ५०० रूपये काढून शेतकरी संघातील ३३ महिलांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला दुसºया एका लोकसंचालित साधन केंद्राकडून सात ते आठ महिन्यासाठी घंटागाडी भाडेस्वरूपात घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करून घंटागाडी प्राप्त केली. सदर घंटागाडीसाठी बारमाही एक मजूर लावण्यात आला. सदर मजूर दररोज गावात फिरून लोकांकडील कचरा संकलित करीत आहे. सदर कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्पातून सदर शेतकरी संघाने आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यात ५० ते ६० हजार रूपये किंमतीच्या खताची विक्री केली. तसेच यावर्षी अलिकडेच या शेतकरी संघाने २२ हजारांचे खत विकले आहे. सद्य:स्थितीत या संघाकडे ५० हजार रूपये किंमतीचा कम्पोस्ट व जैविक खत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हातगाडी चालविणाऱ्या मजुराला प्रतिमहिना तीन हजार रूपये मानधन दिले जात आहे. १३ मजुरांना ४०३ दिवस या प्रकल्पातून रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ८६ हजार ४०० रूपये इतकी मजुरी मजुरांना मिळाली आहे.सदर प्रकल्पाच्या माध्यमातून तळोधीवासीयांना स्वच्छतेची सवय लागली आहे. घरातील व गुरांच्या गोठ्यातील केरकचरा कुठे बाहेर न टाकता तो घंटागाडीत टाकला जात आहे. त्याचे व्यवस्थापन होत असल्याने गावात स्वच्छता आहे. सदर प्रकल्प ना नफा, ना तोटा या तत्वावर सध्या सुरू आहे.‘लोकमत’च्या वृत्तातून झाली प्रकल्पाची उभारणीतळोधीतील ३ लाख ४९ लाखांच्या गांढूळ खत निर्मिती व वास्तू शेडच्या दुरावस्थेबाबत सप्टेंबर २०१५ मध्ये लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या बातमीची दखल घेऊन माविम, बतगटाच्या महिला व लोकसंचालित साधन केंद्राने महिलांची बैठक बोलावून हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.असे तयार होते गावातच खतकचरा व्यवस्थापन व खत निर्मितीच्या प्रकल्पासंदर्भात तेजस्वीनी महिला शेतकरी संघातील ३३ महिला जागरूक आहेत. घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलित केला जातो. त्यानंतर संघातील महिला या कचºयाचे विलगिकरण करतात. कचऱ्याची तपासणी करून काच, टीन, प्लास्टिक वस्तू, सुका व ओला कचरा वेगळा करतात. जमा झालेला सदर कचरा गावातील टाक्यांमध्ये टाकला जातो. सुरुवातीला ओला कचरा टाकून त्यावर शेणाचे पाणी सोडले जाते. त्यावर हलकिशी माती फिरविली जाते. त्यानंतर पुन्हा ओला कचरा टाकून झाकून ठेवल्या जाते. उन्हाळ्यात टाक्यातील कचरा सुकु नये यासाठी पाणी सोडले जाते. सदर कचरा कुजल्यानंतर तो चहापत्तीसारखा बनतो. त्यानंतर ५ ते ५० किलोच्या बॅगा तयार करून कम्पोस्ट व जैविक खत विकले जाते. सध्या ५ रूपये किलो दराने कम्पोस्ट तर १५ रूपये किलो दराने जैविक खत विकले जात आहे.