दवाखाना बनला गुरांचा गोठा
By Admin | Updated: July 16, 2014 00:10 IST2014-07-16T00:10:28+5:302014-07-16T00:10:28+5:30
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. या दवाखान्यात मोकाट जनावरांनी आश्रय घेतला असल्याने दवखान्यात दुर्गंधी निर्माण झाली असून

दवाखाना बनला गुरांचा गोठा
आरोग्य सेवा : सुभाषग्राम दवाखान्याची दूरवस्था
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. या दवाखान्यात मोकाट जनावरांनी आश्रय घेतला असल्याने दवखान्यात दुर्गंधी निर्माण झाली असून गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सुभाषग्राम परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सुभाषग्राम येथे स्वास्थ केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र या दवाखान्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणचे आरोग्य अधिकाऱ्याचे पद मागील आठ महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना येथून ५ किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागत आहे. सदर आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी राहत नाही. मात्र बाहेरचा दरवाजा उघडा असल्याने मोकाट जनावरे या दवाखान्याच्या वऱ्हांड्यामध्ये जाऊन आश्रय घेत आहेत. रात्रभर याच ठिकाणी थांबल्याने जनावरांचे मलमुत्र जमा होऊन दुर्गंधी निर्माण झाली आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्यात यावे. अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सुभाषग्रामचे सरपंच बेबीराणी कृतनिया, उत्तम मंडल, सुनित बिश्वास, तरूण रॉय, गौतम चक्रवती, त्रिदेव मुजूमदार, निलू रॉय यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)