वस्त्या-तांड्यांवरही सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:45+5:30
गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आले आहेत. गावाहेरील बांध्यांमध्ये वस्ती व तांडे उभारून वास्तव्य करीत आहेत.

वस्त्या-तांड्यांवरही सतर्कता
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. शहरांपासून गावपातळीवर सूचनांचे पालन केले जात आहे. एवढेच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकीतून सर्वजन प्रयत्न करीत आहेत.
गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आले आहेत. गावाहेरील बांध्यांमध्ये वस्ती व तांडे उभारून वास्तव्य करीत आहेत. या अस्थायी नागरिकांना वैैयक्तिक स्वच्छता तसेच जनसमुदायाच्या संपर्कात न येण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. कोरोना विषाणू अधिक काळ टिकून राहू नये. त्याचे समूळ उच्चाटण व्हावे, तसेच ग्रामीण भागात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
वैरागड परिसरात बाहेरगावाहून येऊन अस्थायी स्वरूपात वास्तव्य करणाºया या वस्तीला कर्मचाºयांनी भेट देऊन त्यांच्या नोंदी घेतल्या. तसेच त्यांना आरोग्यविषयक समस्या जाणवत आहे की नाही, याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या नोंदी घेऊन मोठ्या जनसमुदायाशी संपर्क टाळण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, वैरागडसह कढोली, मानापूर, देलनवाडी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात बाहेरगावाहून अस्थायी स्वरूपात भटक्या जमातीचे लोक काम करण्याकरिता येतात.